शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
4
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
5
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
6
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
7
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
8
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
9
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
10
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
11
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
12
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
13
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
14
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
15
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
16
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
17
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
18
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
19
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
20
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?

कुणाची संक्रांत कुणावर ?

By सचिन जवळकोटे | Published: January 11, 2018 3:00 AM

संक्रांत जवळ येताच अशोकराव नांदेडकरांनी मुद्दामहून ‘कणकवली’करांना मेसेज पाठविला. ‘तीळगूळ घ्या ऽऽ एकदा तरी गोड बोला,’ मेसेज वाचून गोंधळलेल्या धाकट्या नीतेशनी थोरल्या नीलेशना विचारलं, ‘गोड बोला... हेचो अर्थ काय?

स्थळ पहिलं : कणकवलीसंक्रांत जवळ येताच अशोकराव नांदेडकरांनी मुद्दामहून ‘कणकवली’करांना मेसेज पाठविला. ‘तीळगूळ घ्या ऽऽ एकदा तरी गोड बोला,’ मेसेज वाचून गोंधळलेल्या धाकट्या नीतेशनी थोरल्या नीलेशना विचारलं, ‘गोड बोला... हेचो अर्थ काय?’ थोरलेही दचकले. दोघांनी पिताश्रींना विचारलं. या दोन गुणी लेकरांच्या अनोख्या प्रश्नावर भरपूर डोकं खाजवूनही नारायणरावांना काही उत्तर सापडलं नाही.‘माका पण कळला नाय बाळांनोऽऽ मी पण आयुष्यात कधी गोड बोलाक नाय,’ असं म्हणत त्यांनी देवेंद्रपंतांनाच मेसेज टाकला, ‘याचा अर्थ काय?’ पंतांकडून तत्काळ रिप्लाय आला, ‘गूळ खोबरं घ्याऽऽ नुसतंच गोड-गोड बोला,’ हा मेसेज वाचताना मात्र तिघांच्याही डोक्यात प्रकाश पडला. आपल्याला नुसतं गूळ खोबरं देऊन ठेवलेल्या पंतांच्या गोडऽऽ गोड बोलण्याचा अर्थही त्यांना समजला.स्थळ दुसरं : मातोश्रीउद्धोंच्या मोबाईलची रिंग वाजली, तेव्हा त्यांनी प्रश्नार्थक नजरेनं मिलिंदकडं बघितलं; कारण या मोबाईलवर कुणाचा कॉल घ्यायचा अन् कुणाचा कट करायचा, याचं नियोजन म्हणे मिलिंदच करायचे. कॉल चक्क ‘कृष्णकुंज’वरून आलेला पाहून मोबाईल उचलला गेला. तिकडून खर्ज्या आवाजात एक डॉयलॉग आदळला, ‘नमस्कार. मी राज. तीळ द्याऽऽ गूळही द्याऽऽ गोडही तुम्हीच बोला!’ फोन कट झाला. या संदेशात फक्त घेण्याचीच भाषा होती. देण्याचा कुठं उल्लेखच नव्हता. तेव्हा चिडून उद्धोंनी युवराजांना विचारलं, ‘देण्या-घेण्यात माहीर असणाºया तुमच्या काकांना आज-काल फक्त घ्यायचंच माहितंय वाटतं; परंतु आपण तरी कधी कुणाला काय देतोय?’ त्यावर अल्लडपणे युवराज उत्तरले, ‘हो. देतो कीऽऽ आपल्याच सरकारला तळतळाट अन् शिव्याशाप!’स्थळ तिसरं : वर्षा बंगलादेवेंद्रपंतांना तीळगूळ देण्यासाठी अष्टप्रधान मंडळातील सहकारी उत्साहानं (अन् नाईलाजानंही) जमले. तीळगुळाची पुडी बांधण्यासाठी रद्दीच्या भावात गेलेल्या मुंबई विद्यापीठाची उत्तरपत्रिका विनोदभाऊंनी वापरली. ‘पुढच्या वर्षी बदलणाºया सरकारमध्ये आम्ही दोघं असणार की नाही?’ असा सवाल महादूदादा अन् सदाभाऊंनी केला, मात्र मोबाईल पाहण्यात गुंतलेल्या गिरीशरावांनी लक्ष दिलं नाही. बहुधा रात्रीची क्लिप पाहण्यात ते व्यस्त असावेत. चंद्रकांतदादांनी खुणावताच त्यांच्या लाडक्या यल्लप्पानं तातडीनं पोतं भरून तीळ-गूळ आणलं. हे भरगच्च पोतं म्हणजे ‘खड्डेमुक्त महाराष्ट्र’चीच कृपा. (म्हणजे चांगल्या रस्त्यावरून आलेल्या गाडीतलं पोतं टिकलं हो. उगाच नसता गैरसमज नसावा.) असो.इकडं सुभाषबापू सांगू लागले, ‘मी लोकांचं मंगल करणारा मंत्री. त्यामुळं पालिकेत बाहेरच्यांना गूळ देईन, मात्र घरच्या मालकांना तीळही देणार नाही,’ हे ऐकून सोलापुरातील ‘विजयकुमार अन् दिलीपराव’ अनेकांना आठवले. या सर्व धांदलीत कुणाच्या तरी लक्षात आलं की इथं पंकजाताईच आल्या नाहीत. गर्दीतल्या एकानं त्यांना कॉल केला, ‘ताई.. तीळ-गूळ द्यायला कधी येणार?’ तेव्हा तिकडून दचकून विचारणा झाली, ‘कुठला गूळ.. चिक्कीतला का?’ मात्र, नेटवर्क खराब झाल्यानं पुढचा आवाज ऐकू आला नाही.

टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाणUddhav Thackerayउद्धव ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसNarayan Raneनारायण राणे