शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

कोण म्हणतो आम्ही आळशी आहोत?

By admin | Updated: July 14, 2017 23:55 IST

खरे म्हणजे आम्ही भारतीय स्थितप्रज्ञ आहोत. ‘ठेविले अनंते तैसेचि राहावे’ या संत वचनाचे आम्ही शब्दश: पालन करतो

खरे म्हणजे आम्ही भारतीय स्थितप्रज्ञ आहोत. ‘ठेविले अनंते तैसेचि राहावे’ या संत वचनाचे आम्ही शब्दश: पालन करतो. कारण संत जे काही सांगून गेले ते जीवनाचे सार आहे, असे आम्ही समजतो आणि घरीदारी, अवतीभवती जे काही चालले आहे त्याकडे स्थितप्रज्ञ वृत्तीने पाहतो, यात आमचे चुकते काय? वास्तवात असा प्रश्नही आम्हाला पडत नाही, एवढे आम्ही आमच्या स्थितप्रज्ञ वृत्तीत रममाण झालो आहोत. आता आमच्या या स्वभावधर्माला कोणी आळशीपणा म्हणत असेल तर म्हणोत बापडे. कारण त्यांच्या अज्ञानाची आम्हाला कीव येते. आमच्या संतांची वचने त्रिकालाबाधित सत्य आहेत हे अशा पामरांना कोण समजावून सांगणार? स्टॅनफोर्ड विद्यापीठाने असाच एक शोध आम्हा भरतभूमीवासीयांबद्दल लावला आहे. तो म्हणजे आम्ही आळशी आहोत आणि आमचा आळशीपणा ठरविला तो आम्ही रोज किती पावले चालतो या निकषावर. आता हे त्यांना कोण सांगणार की तुमचे निकषच चुकीचे आहेत. चालण्याचा आणि आळशीपणाचा संबंध येतोच कुठे? फक्त चालतो तो आळशी नसतो असेच म्हणायचे तर पूूर्वी आमचे पिताश्री कार्यालयात पायी जात, आता आम्हीही कार्यालयात जातो ते चारचाकीतून. त्यांच्यापेक्षा कमी काम करतो असे मुळीच नाही. पूर्वी आमच्याकडे बहुतेक जण पायी चालत असत; पण त्यामुळे वेळ वाया जायचा. आता वाहने वापरून आम्ही तो वाचवतो. अगदी कोपऱ्यावरच्या दुकानातून दुधाची पिशवी आणायची असेल तर दुचाकी वापरतो आणि वेळ वाचवतो. वाचवलेला वेळ आम्ही दूरचित्रवाणी पाहून सामान्य ज्ञान वाढविण्यात घालवतो. बसून-बसून मन शिणले की टी. व्ही. पाहणे हा आमच्या दृष्टीने आराम असतो. आता तुम्ही आळशी म्हणत असाल तर नाईलाज आहे. वाचवलेला वेळ घालविण्यासाठी आम्ही मोबाईल न्याहाळत बसतो. तोंडाला फेस येईपर्यंत फेसबुकवर रेंगाळतो. यातही श्रम होतात, पण त्याने आमचा मेंदू तरतरीत राहतो; पण वेळ घालविण्याच्या अनेक कल्पना आम्हाला स्फुरतात. तासन्तास बसून आम्ही राजकारणावर चर्चा करतो आणि पंतप्रधानांपासून सरपंचांपर्यंत सर्वांना मार्गदर्शन करीत असतो. अशी ही आमची क्रियाशीलता त्या स्टॅनफोर्ड विद्यापीठाला दिसली नाही. आमच्या डोक्यावर वैचारिक कामाचे किती ओझे आहे हे त्यांना काय कळणार? मोदींनी ट्रम्प यांच्याशी दोस्ती करावी असे आम्हीच सुचविले होते. शेतकऱ्यांना कर्जमाफी न देता सगळी शेती फडणवीसांनीच कसायला घ्यावी, अशी आमची कल्पना आहे. यातून शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतीलच. शिवाय फडणवीसांच्या मागचा रोजचा शेतकऱ्यांचा ताप कमी होईल. आमच्या म्हणण्याची कोणतेच नेते दखल घेत नाहीत हा भाग अलहिदा, म्हणून आमचे कार्य आम्ही थांबविणार नाही. आमच्या न चालण्याने देशाच्या औद्योगिक विकासात भरत पडते. देशात ८० टक्के दुचाकी वाहने आहेत आणि दरवर्षी त्यांचा खप वाढतोच. गेल्या वर्षी १ कोटी ७५ लाख ८९ हजार ५११ वाहनांची विक्री झाली. २०१५-१६ शी तुलना केली तर ११ हजार वाहनांची विक्री वाढली. समजा सगळ्यांनीच पायी चालण्याचे ठरविले तर दुचाकी वाहनांची मागणी कमी होईल आणि उद्योग क्षेत्राला त्याचा फटका बसेल. देशाचा विचार केला तर देशात २१ कोटी २३ हजार २८९ वाहने असून, त्यापैकी १२.१७ टक्के वाहने एकट्या महाराष्ट्रात आहेत. टक्केवारीत येथे महाराष्ट्र देशात अव्वल आहे. असायलाच पाहिजे. कारण आमचे राज्य पुरोगामी आणि उद्योगात आघाडीवर असणारे राज्य म्हणून उगाचच ओळखले जात नाही. महाराष्ट्रात २ कोटी ५५ लाख ६२ हजार १७५ वाहने आहेत. वाहनांमुळे प्रदूषण वाढते, न चालल्याने मधुमेह, लठ्ठपणा, हृदयरुग्ण वाढतात हे जरी खरे असले तरी उपचारासाठी शहरा-शहरांतून अत्याधुनिक इस्पितळे आहेतच. मधुमेहाचे पाच कोटी रुग्ण असतील, पण उपचार आहेतच ना. न चालण्याने लठ्ठपणा वाढतो आणि लठ्ठपणाची समस्या समाजात वाढत चालली; पण ज्यांना वजन कमी करायचे ते घाम गाळतात, रोज सकाळ, संध्याकाळ फिरायला जातात. भारतीय माणूस रोज ४२९७ पावले तर महिला ३६८४ पावले चालतात. हाँगकाँगचा माणूस ६८८० तर अमेरिकेचा ४७७४ पावले चालतो. आमची हजार, दीड हजार पावले होतात कमी, म्हणजे लगेच आम्ही आळशी ठरतो का? आमच्याकडच्या महिलांना घरातच इतकी कामे असतात की त्यांचे घरातून बाहेर पडणे होत नाही. तरी घरातल्या घरात त्या इतकी पावले चालतात याचाही या अंगाने स्टॅनफोर्डने विचार करायला पाहिजे होता. या विद्यापीठाने मुंबईच्या माणसाचा अभ्यास करावा तो केला तर त्यांना चक्करच येईल. मुंबईकर नुसता चालत नाही तर तो उठल्यापासून झोपेपर्यंत सुसाट पळतच असतो. वर्षानुवर्षे नव्हे तर पिढ्यान्पिढ्या मुंबईकर धावत पळत असतो, याची दखल या विद्यापीठाने घेऊ नये हे नवलच. भलेही आम्ही चालत नसलो तरी जगाच्या तुलनेत कुठे कमी आहोत. सॉफ्टवेअरमध्ये आघाडी आहे, दूध उत्पादनातही मागे नाही, तीच अवस्था उद्योग, कृषी क्षेत्राची आहे. आमचे संरक्षण दल जगात तिसऱ्या क्रमांकाचे आहे, एवढेच काय लोकसंख्येतही दुसऱ्या क्रमांकावर असलो तरी २०२५ पर्यंत चीनला मागे टाकून सर्वात पुढे जाणार असे देशोदेशीच्या विद्यापीठांनी भाकीत केले आहे. आता तुम्हीच सांगा आम्ही आळशी कसे?