शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
3
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
4
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
5
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
7
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
8
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
9
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
10
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
11
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
12
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
13
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
14
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
15
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
16
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
17
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
18
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
19
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
20
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन

लॉरेन्स बिश्नोई टोळीला मोकाट कोणी सोडले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2024 10:23 IST

‘पाच कोटी दे, तर काळविटाला मारल्याचा गुन्हा माफ करतो’ असा मेसेज थेट सलमान खानला पाठविणाऱ्या लॉरेन्स बिश्नोईने हातपाय कसे पसरले?

रवींद्र राऊळ, मुक्त पत्रकार -चित्रपटाच्या पडद्यावर ‘देमार’ हाणामारी करून खलनायकाला धडा शिकवणारा बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता सलमान खान याला कुख्यात लॉरेन्स बिश्नोई टोळीपासून वाचवण्यासाठी मुंबई पोलिस सध्या जिवाचे रान करत आहेत. सलमानचे निकटवर्तीय माजी राज्यमंत्री बाबा सिद्दिकी यांच्या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई टोळीने स्वीकारल्याने मुंबई पोलिस चांगलेच हबकले आहेत. लॉरेन्स बिश्नोई टोळीची सुरुवात कुठे होते आणि तिचा शेवट कुठे होतो याचा थांगपत्ता कुठल्याच यंत्रणेला लागत नाही. भारतातील माफिया टोळ्यांच्या इतिहासात अवघ्या ३१ वर्षांच्या तरुणाने इतक्या अल्पावधीत जगाच्या पाठीवरच्या अनेक देशात आपल्या टोळीचा कारभार पसरविल्याचे दुसरे उदाहरण नाही. म्हणूनच ही टोळी नेस्तनाबूत कशी करायची या यक्षप्रश्नाचे उत्तर सध्या तपास यंत्रणा शोधत आहेत.  लॉरेन्स बिश्नोईचा चौदा वर्षांचा गुन्हेगारीचा प्रवास पाहिला तर ‘देमार’ हिंदी सिनेमाच्या तोंडात मारील, अशी ‘स्टोरी’ समोर येते. गेल्या काही वर्षांत लॉरेन्स बिश्नोई हे नाव भारताच्या अंडरवर्ल्डमध्ये उदयाला आले आणि सध्या अनेक देशांमध्ये त्याची चर्चा आहे. कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो हेही सध्या लॉरेन्स बिश्नोई या नावाने कमालीचे परेशान आहेत.  भारताचे राजनैतिक अधिकारी लॉरेन्स बिश्नोईच्या मदतीने खलिस्तानवाद्यांना लक्ष्य करीत आहेत, असे ट्रुडो म्हणतात. वर्षभराने तिथे निवडणुका होणार आहेत. कॅनडाच्या लोकसंख्येपैकी दोन टक्क्यांहून अधिक शीख समुदाय आहे. ट्रुडो यांना त्यातील खलिस्तान समर्थकांचा पाठिंबा हवा आहे. मागील निवडणुकीत ट्रुडो यांच्या पक्षाला बहुमत मिळू न शकल्याने ते इतर पक्षांच्या पाठिंब्यावर सरकार चालवत आहेत. तिथल्या न्यू डेमोक्रॅटिक पार्टीचा नेता जगमीत सिंग याने गेल्या महिन्यात जस्टिन ट्रुडो यांच्या सरकारचा पाठिंबा काढून घेण्याची घोषणा केल्यावर ट्रुडो यांचे सरकार अस्थिर झाले आहे. 

महाविद्यालयीन शिक्षण घेतलेला बिश्नोई हा सोशल मीडियावरील पोस्ट आणि व्हिडीओबाजीत पारंगत आहे. आपल्याकडील अनेक आयुधांपैकी सध्याच्या या प्रभावी आयुधाचा पुरेपूर फायदा घेत त्याने आपल्या टोळीचा व्याप वायुवेगाने वाढवला. धमक्या देण्यासाठी तो थेट ई-मेल पाठवतो किंवा सोशल मीडियाचा वापर करतो. आधीच्या पिढीतील गुंडांनी हा बेधडक मार्ग वापरला नव्हता. सोशल मीडियावर व्हायरल झालेले त्याचे अनेक व्हिडीओ त्याने तुरुंगात चित्रित केल्याचा आरोप होतो. काही व्हिडीओत तो जवानांना दीपावलीच्या शुभेच्छा देताना दिसतो तर कधी मृत जवानांना श्रद्धांजली वाहताना दिसतो. कधी शायरी म्हणताना पाहायला मिळतो. आपली प्रतिमा समाजात देशप्रेमी म्हणून उभी करण्याचा त्याचा आटापिटा असतो. सलमान खानने काळविटाची शिकार केल्याचे प्रकरण १९९८ साली घडले तेव्हा अवघ्या पाच वर्षांचा असलेल्या लॉरेन्स बिश्नोईने शिकारीबद्दल सलमान खानने बिश्नोई समाजाची माफी मागावी, अशी मागणी करावी हाही समाजात आपली कट्टरपंथी प्रतिमा तयार करण्याचा त्याचा प्रयत्न आहे. त्याआड आपली कृष्णकृत्ये झाकली जातील असा बिश्नोईचा समज असल्याचा आरोप पोलिस अधिकारी करतात.   पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला याच्या हत्येतील मुख्य आरोपी असलेल्या लॉरेन्स बिश्नोईचे व्हिडीओ तुरुंगात चित्रित झाले नसल्याचा खुलासा करण्यासाठी पंजाबच्या पोलिस महासंचालकांनी पत्रकार परिषद घेतली. त्यानंतर तिसऱ्याच दिवशी लॉरेन्स बिश्नोईने आणखी एक व्हिडीओ व्हायरल करून आपण तुरुंगातच व्हिडीओ चित्रित करत असल्याचे पुरावेच दिले. त्यात त्याने त्याची बराकच दाखवली आणि मोबाइल तुरुंगात त्याच्या हातात पोहोचल्याचे सिद्ध झाले. व्यवस्था आपल्यासमोर कशी झुकते हे दाखवण्याची एकही संधी तो अजिबात दवडत नाही. दोन डझनाहून अधिक गुन्हे दाखल असलेल्या लॉरेन्स बिश्नोईचे हे उपद्व्यापच गुंड प्रवृत्तीच्या तरुणांमध्ये त्याची लोकप्रियता वाढवत आहेत.

बिश्नोई टोळीत असलेल्या सातशे जणांपैकी अनेकांच्या स्वत:च्या टोळ्या आहेत आणि त्या टोळ्या घेऊन ते लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीत सहभागी झाले आहेत. देश-विदेशातील सर्वांशी तो वेगवेगळ्या ॲपच्या माध्यमातून संपर्कात राहतो. सलमान खानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आणि बाबा सिद्दिकी यांची हत्या करणाऱ्या  गुंडांनी ते  बिश्नोईच्या इशाऱ्यावरून कोणतीही जोखीम घेऊन आपले लक्ष्य साध्य करत असल्याचे दाखवून दिले आहे. ही टोळी देशातील नऊ राज्ये आणि अमेरिका, अझरबैजान, पोर्तुगाल, संयुक्त अरब अमिरात, कॅनडा आणि रशियामध्ये हातपाय पसरेपर्यंत कोणतीच यंत्रणा तिला का रोखू शकली नाही, या प्रश्नाच्या उत्तरातून अनेक धक्कादायक बाबी स्पष्ट होतील.

‘शत्रुत्व संपवून जिवंत राहण्यासाठी सलमान खानने पाच कोटी रूपयांची खंडणी द्यावी, नाहीतर त्याची अवस्था  बाबा सिद्दिकी यांच्यापेक्षाही वाईट होईल. हे हलक्यात घेऊ नका’, असा लिहिलेला व्हॉट्सॲप मेसेज नुकताच मुंबई वाहतूक पोलिसांना मिळालाय. 

काळविटाच्या शिकारीने दुखावलेला लॉरेन्स आता मात्र काही कोटींच्या मोबदल्यात सारे मिटवायला तयार कसा होतो, असा प्रश्न पोलिसांना पडलाय. सलमानकडे लॉरेन्सने फक्त पाच कोटीच मागावेत, हेही अनेकांना खटकते आहे. ही (किरकोळ) रक्कम पाहता तो मेसेज खरेच त्याच्या टोळीकडूनच आलाय का, याची तपासणी पोलिस करत आहेत.ravirawool66@gmail.com

टॅग्स :Salman Khanसलमान खानPoliceपोलिस