शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत काँग्रेसला चौथा धक्का बसणार?; वर्षा गायकवाडांना उमेदवारी दिल्याने बडा नेता नाराज
2
शाहू महाराज एका पक्षाच्या दावणीला बांधले गेले; मोदींच्या सभेपूर्वी राजेश क्षीरसागरांचा हल्लाबोल
3
Virat Kohli ने ३ नंबर 'या' फलंदाजासाठी सोडावा, स्वत: चौथ्या क्रमांकावर बॅटिंगला यावं, Harbhajan Singh चा सल्ला
4
इथे २८७ धावाही Safe नाहीत! गोलंदाजांची केविलवाणी अवस्था, भारताला कसा सापडणार 'बॉलिंग'स्टार?
5
राहुल गांधींच्या DNA वर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आक्षेपार्ह टीका करणाऱ्या LDF च्या आमदारावर गुन्हा दाखल
6
'महाराष्ट्रातला शेतकरी मेला पाहिजे, पण गुजरातचा...'; कांदा निर्यातीवरुन राऊतांची पंतप्रधानांवर टीका
7
बेंजामिन नेतन्याहू म्हणजे 'गाझाचे कसाई'; तुर्कस्थानच्या राष्ट्राध्यक्षांची इस्रायलच्या पंतप्रधानांवर बोचरी टीका
8
TMKOC Sodhi Missing: तारक मेहता फेम 'सोढी' किडनॅप? पोलिसांनी दाखल केली केस; CCTV समोर
9
ठाण्यामध्ये साक्षात नरेंद्र मोदी जरी उभे राहिले तरी विजय आमचाच होणार, ठाकरे गटाने महायुतीला डिवचले
10
Motilal Oswal Financial Share Price : १ वर ३ बोनस शेअर्स देण्याची घोषणा, ३३४% वाढला कंपनीचा नफा; वर्षभरात स्टॉक ३१५% वाढला
11
Investment Tips : महिलांसाठी कमालीची आहे 'ही' सरकारी स्कीम, मिळतंय जबरदस्त व्याज; जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी
12
महामुंबईत पहिल्याच दिवशी ३८९ अर्जांची विक्री; सोमवारनंतर बहुतांश उमेदवार अर्ज भरणार
13
'जुनं फर्निचर' मध्ये दिसला असता सलमान खान? महेश मांजरेकरांनी केला खुलासा
14
उत्तराखंडमधील जंगलांमध्ये भीषण वणवा, नैनीतालच्या हायकोर्ट कॉलनीपर्यंत पोहोचली आग, लष्कराला पाचारण
15
बेपत्ता होण्यापूर्वी 'तारक मेहता' फेम गुरुचरणने केला होता शेवटचा मेसेज, अभिनेत्याने दिली माहिती, म्हणाला...
16
Patanjali Foods 'हा' व्यवसाय खरेदी करण्याच्या तयारीत, काय आहे बाबा रामदेव यांच्या कंपनीचा प्लान?
17
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२४, व्यापारात दिवस लाभदायी ठरेल, सहल - प्रवास होतील
18
‘जय भवानी’बाबत उद्धवसेनेचा फेरविचार अर्ज फेटाळला; आता पुढे काय?
19
'तारक मेहता' फेम मिस्टर सोढीने बेपत्ता होण्याच्या आधी केली होती पोस्ट, २ दिवसांपासून फोनही आहे बंद

लालूंचे काय होणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2017 2:45 AM

डोळे मिटून किती दिवस दूध प्यायचे, हे त्या त्या मांजरानेच ठरवायचे असते. मालक बदलला किंवा मालकाची नियत बदलली की धपाटा ठरलेला असतो.

डोळे मिटून किती दिवस दूध प्यायचे, हे त्या त्या मांजरानेच ठरवायचे असते. मालक बदलला किंवा मालकाची नियत बदलली की धपाटा ठरलेला असतो. त्यामुळे दूध पीत असतानाच हा सारा भवतालही पाहता यावा लागतो. राजकारण्यांचेही असेच असते. सत्ता ताब्यात आली रे आली की, डोळे मिटून दूध न पिणारा राजकारणी सध्या अपवादानेच सापडतो; मात्र हे करीत असतानाच ज्याची नजर भवतालही टिपत असते तो यशस्वी राजकारणी ठरतो. नाही तर त्याचा लालूप्रसाद यादव होतो. चारा घोटाळ्याशी संबंधित २१ वर्षांपूर्वी दाखल केल्या गेलेल्या फौजदारी खटल्यात सीबीआयच्या विशेष न्यायालयाने बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्टÑीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांना दोषी ठरविले. पोलिसांनी तातडीने त्यांना तुरुंगातही टाकले. न्यायालय ३ जानेवारी रोजी त्यांना शिक्षा सुनावेल. शासकीय तिजोरीतून १९९१ ते १९९७ या काळात खोटी बिले दाखवून ८९.२७ लाख रुपये काढून अपहार केल्याचा हा खटला होता. चारा न पुरवताच कंत्राटदारांच्या नावे पैसे काढले जात असल्याचे माहीत असूनही त्याकडे कानाडोळा केला हा लालूंवरील आरोप सिद्ध झाला. यात त्यांना सात वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते. सीबीआय अधिकारी जोगिंदरसिंग, अमित खरे, राकेश अस्थाना, यू. एन. बिश्वास असे जिगरबाज अधिकारी लाभले म्हणून या घोटाळ्याचा असा निकाल समोर आला. या घोटाळ्याच्या ३३ पैकी सहा खटल्यांमध्ये लालू आरोपी होते. त्यापैकी दोन खटल्यांमध्ये ते दोषी ठरले आहेत. अन्य चार खटल्यांचे कामकाज अजून सुरूच आहे. बिहारच्या राजकारणात या निकालामुळे फारसा फरक पडेल असे अजिबात वाटत नाही. लालूंचे तुरुंगात जाणे बिहारला नवे नाही. चैबासा तिजोरीतून ३७.५ कोटी रुपयांच्या अपहारप्रकरणी लालूंना पाच वर्षांची कैद झाली होती. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत लालूंनी बिहार विधानसभा निवडणुकीत आपल्या पक्षाच्या म्हणजे राष्टÑीय जनता दलाच्या सर्वाधिक जागा निवडून आणल्या होत्या. लालूंवर कितीही आरोप झाले आणि ते सिद्ध झाले तरी बिहारमधील यादव आणि मुस्लीम समाज पाठीशी आहे तोपर्यंत लालूंना चिंता नाही. मुलगा तेजस्वी यादव यांना राजकीय वारस जाहीर करून याआधीच लालूंनी राज्यातील भविष्याची चिंता मिटविली आहे. हे दोन्ही समाज नितीशकुमार वा मोदींच्या भाजपला मतदान करतील, अशी अलीकडच्या काळात तीळमात्रही शक्यता नाही, त्यामुळे बिहारमध्ये लालूंच्या पक्षाला मरण नाही. राहिला प्रश्न केंद्राचा. घोटाळ्यांच्या मालिकेची ही शर्यत पूर्ण करता करता केंद्रात पोहोचणे तसे त्यांना सोपे नाही. लालू आणि एकूणच मोदी विरोधकांना हाच मोठा फटका असणार आहे. अलीकडेच झालेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष बाजीगर ठरला. मोदींच्या विजयापेक्षा राहुल गांधी यांचा निसटता पराभव अधिक चर्चेचा ठरला. पुढे २-जी घोटाळ्यातून ए. राजा आणि कनिमोळी सुटले. इकडे महाराष्टÑात ‘आदर्श’मधून अशोक चव्हाण यांना दिलासा मिळाला. मोदी विरोधकांची मोट अशी घट्ट होत असतानाच लालूंचा हा निकाल आला. गुजरात-हिमाचल प्रदेशची निवडणूक झाली. आता पाच महिन्यांत कर्नाटक निवडणुकीचे धूमशान आहे. कर्नाटकनंतर मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये निवडणुकीचा फड रंगणार आहे. हे होता होता २०१९ साली लोकसभेचा महासंग्राम होणार आहे. या महासंग्रामात मोदींशी टक्कर देण्यासाठी विरोधकांनी आतापासून मोट बांधण्यास सुरुवात केली आहे. चारा घोटाळ्यात लालूंच्या तुरुंगात जाण्यामुळे या मोटीचे बळ काहीसे कमी झाले आहे.

टॅग्स :Lalu Prasad Yadavलालूप्रसाद यादव