शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

महाराष्ट्र कुठल्या नशेने झिंगला आहे?

By सुधीर लंके | Updated: October 11, 2023 08:07 IST

नाशिक, पुण्यासारखी शहरे अमली पदार्थांमुळे गाजत आहेत. शाळेजवळील गुटख्याची टपरी हटवल्याने नगरमध्ये मुख्याध्यापकावर प्राणघातक हल्ला झाला. चाललेय काय?

सुधीर लंके, निवासी संपादक, लोकमत, अहमदनगर

सामाजिक कार्यकर्ते व अहमदनगर शहरातील सीताराम सारडा विद्यालयाचे मुख्याध्यापक हेरंब कुलकर्णी यांच्यावर दोन दिवसांपूर्वी प्राणघातक हल्ला झाला. शाळेसमोरील गुटख्याची टपरी त्यांनी प्रशासनाच्या मदतीने हलवली. या बाबीचा सूड उगविण्यासाठी टपरीचालकाने थेट सुपारी देऊन त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. शिक्षक हा गाव सुधारण्यासाठी भूमिका घेणारा हवा. बनगरवाडी कादंबरीने तेच सांगितले. ‘पिंजरा’ चित्रपटातील सुरुवातीचा शिक्षकही असाच गावाला वळण लावणारा दाखविला आहे; पण येथे एक शिक्षक ‘शाळेच्या शंभर यार्ड परिसरात गुटखा, तंबाखू विकता येत नाही’ या सरकारच्या आदेशाचेच पालन करतो म्हणून ‘टार्गेट’ होतो. या हल्ल्याचा सर्व स्तरातून निषेध झाला. मुख्यमंत्र्यांनी कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधून त्यांना धीर दिला. कारवाई करण्याचे आश्वासन दिले; पण या घटनेचे मूळ महाराष्ट्र समजून घेईल का? आपल्या गावातील शिक्षकावर हल्ला होत असताना अहमदनगर महापालिकेने काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही.  आपली गावे, शहरे यांना वळण लागावे ही गरज मुळात समाजाला वाटते आहे का, हा प्रश्न यातून निर्माण होतो. सध्या पुणे व नाशिक ही दोन शहरे अमली पदार्थांच्या विक्रीमुळे गाजत आहेत. अमली पदार्थ विक्रीचा सूत्रधार असलेला आरोपी ललित पाटील हा रुग्ण म्हणून ससून रुग्णालयात उपचार घेत होता. तेथून तो अमली पदार्थांचे रॅकेट चालवत होता ही बाब समोर आली आहे. गरीब रुग्णांना सरकारी दवाखाने लवकर बेड देत नाहीत; पण ललित पाटीलसाठी तो कायम राखीव होता. त्याच्यावर उपचाराची गरज आहे, असे अहवाल डॉक्टरांनी दिले व त्याला महिनोन्महिने ससूनमध्ये ठेवले. यासाठी तो रुग्णालय प्रशासनाला दर दिवशी ७० हजार रुपये मोजत होता, असे धक्कादायक खुलासेही समोर आले आहेत; पण एवढे होऊनही ससूनच्या अधिष्ठात्यासह कुणाचेही काही वाकडे झालेले नाही. ललित पाटील व त्याचा भाऊ महागडे अमली पदार्थ बनवत होते. त्यांच्या नाशिकमधील कारखान्यावरही या आठवड्यात पोलिसांनी छापे टाकून ३०० कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीचा ‘एमडी’ (मेफेड्रोन पावडर) हा अमली पदार्थ जप्त केला आहे. पुणे व नाशिक ही दोन शहरे यानिमित्ताने चर्चेत आली आहेत. ‘माओ’ म्हणाला होता, ‘कॅच देम यंग’. जगभरातील बहुतांश चळवळींचा व प्रशासनाचाही हा अजेंडा राहिलेला आहे की ‘कॅच देम यंग’. याचा अर्थ तरुणांना जवळ करा; पण अमली पदार्थ विक्रेते व व्यसनांचा व्यापार करणाऱ्यांचाही ‘तरुण’ हाच अजेंडा दिसतो आहे. नाशिकमध्ये ‘एमडी’ या अमली पदार्थाला तरुण महाविद्यालयीन मुले बळी पडत आहेत म्हणून नागरिक चिंतेत आहेत. गत आठवड्यात नाशिक शहरात एक फलकच लागला होता ‘उडता पंजाब, सडता नाशिक’. पंजाबमध्ये मुले मोठ्या प्रमाणावर नशेच्या आहारी गेले. त्यावर ‘उडता पंजाब’ हा चित्रपट साकारला. ‘एमडी’ हा अमली पदार्थ सेवन केला की माणूस त्या नशेत धुंद होतो व हवी ती कृत्ये करतो अशी ही झिंग आहे. पुण्यात व नाशिकमध्ये जे रॅकेट समोर आले त्यात राजकीय आरोप- प्रत्यारोपही सुरू आहेत. राजकारण्यांचाच अवैध धंद्यांना वरदहस्त आहे, असा आरोप झाला आहे. गुटखा व मावाबंदी असली तरी या बाबी राजरोस विकल्या जातात. या मागील कारण उघड आहे.

राजकारणासाठी पैसा लागतो. हा पैसा बहुधा समाजाला झिंगवत ठेवतच उभारावा लागतो. समाज झिंगत राहिला तर कदाचित राजकारण निर्धोक चालत असावे. राजकारण तसेच समाज या दोन्ही ठिकाणची मूल्यव्यवस्था हरवली आहे. त्यामुळे ही झिंग आणखी चढत जाणार. हेरंब कुलकर्णी यांनी अनेक शाळांचा अभ्यास करून एक पुस्तक लिहिले आहे, ‘शाळा आहे; पण शिक्षण नाही’. तेच वास्तव असावे. ससून रुग्णालय आरोपीला ड्रग्ज विकण्यासाठी हातभार लावत असेल तर संबंधितांनी नेमकी कुठली पदवी घेतली आहे, हा प्रश्न पडतोच. प्रश्न शाळा, महाविद्यालयात मिळणाऱ्या मूल्यांचाही आहे. या संस्था शाबूत राहिल्या तरच मूल्ये टिकतील, अन्यथा झिंग, हल्ले वाढत जाणार. ‘पिंजरा’ चित्रपटाचा उत्तरार्थ हेच सांगतो.

टॅग्स :liquor banदारूबंदीMaharashtraमहाराष्ट्र