शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र कुठल्या नशेने झिंगला आहे?

By सुधीर लंके | Updated: October 11, 2023 08:07 IST

नाशिक, पुण्यासारखी शहरे अमली पदार्थांमुळे गाजत आहेत. शाळेजवळील गुटख्याची टपरी हटवल्याने नगरमध्ये मुख्याध्यापकावर प्राणघातक हल्ला झाला. चाललेय काय?

सुधीर लंके, निवासी संपादक, लोकमत, अहमदनगर

सामाजिक कार्यकर्ते व अहमदनगर शहरातील सीताराम सारडा विद्यालयाचे मुख्याध्यापक हेरंब कुलकर्णी यांच्यावर दोन दिवसांपूर्वी प्राणघातक हल्ला झाला. शाळेसमोरील गुटख्याची टपरी त्यांनी प्रशासनाच्या मदतीने हलवली. या बाबीचा सूड उगविण्यासाठी टपरीचालकाने थेट सुपारी देऊन त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. शिक्षक हा गाव सुधारण्यासाठी भूमिका घेणारा हवा. बनगरवाडी कादंबरीने तेच सांगितले. ‘पिंजरा’ चित्रपटातील सुरुवातीचा शिक्षकही असाच गावाला वळण लावणारा दाखविला आहे; पण येथे एक शिक्षक ‘शाळेच्या शंभर यार्ड परिसरात गुटखा, तंबाखू विकता येत नाही’ या सरकारच्या आदेशाचेच पालन करतो म्हणून ‘टार्गेट’ होतो. या हल्ल्याचा सर्व स्तरातून निषेध झाला. मुख्यमंत्र्यांनी कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधून त्यांना धीर दिला. कारवाई करण्याचे आश्वासन दिले; पण या घटनेचे मूळ महाराष्ट्र समजून घेईल का? आपल्या गावातील शिक्षकावर हल्ला होत असताना अहमदनगर महापालिकेने काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही.  आपली गावे, शहरे यांना वळण लागावे ही गरज मुळात समाजाला वाटते आहे का, हा प्रश्न यातून निर्माण होतो. सध्या पुणे व नाशिक ही दोन शहरे अमली पदार्थांच्या विक्रीमुळे गाजत आहेत. अमली पदार्थ विक्रीचा सूत्रधार असलेला आरोपी ललित पाटील हा रुग्ण म्हणून ससून रुग्णालयात उपचार घेत होता. तेथून तो अमली पदार्थांचे रॅकेट चालवत होता ही बाब समोर आली आहे. गरीब रुग्णांना सरकारी दवाखाने लवकर बेड देत नाहीत; पण ललित पाटीलसाठी तो कायम राखीव होता. त्याच्यावर उपचाराची गरज आहे, असे अहवाल डॉक्टरांनी दिले व त्याला महिनोन्महिने ससूनमध्ये ठेवले. यासाठी तो रुग्णालय प्रशासनाला दर दिवशी ७० हजार रुपये मोजत होता, असे धक्कादायक खुलासेही समोर आले आहेत; पण एवढे होऊनही ससूनच्या अधिष्ठात्यासह कुणाचेही काही वाकडे झालेले नाही. ललित पाटील व त्याचा भाऊ महागडे अमली पदार्थ बनवत होते. त्यांच्या नाशिकमधील कारखान्यावरही या आठवड्यात पोलिसांनी छापे टाकून ३०० कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीचा ‘एमडी’ (मेफेड्रोन पावडर) हा अमली पदार्थ जप्त केला आहे. पुणे व नाशिक ही दोन शहरे यानिमित्ताने चर्चेत आली आहेत. ‘माओ’ म्हणाला होता, ‘कॅच देम यंग’. जगभरातील बहुतांश चळवळींचा व प्रशासनाचाही हा अजेंडा राहिलेला आहे की ‘कॅच देम यंग’. याचा अर्थ तरुणांना जवळ करा; पण अमली पदार्थ विक्रेते व व्यसनांचा व्यापार करणाऱ्यांचाही ‘तरुण’ हाच अजेंडा दिसतो आहे. नाशिकमध्ये ‘एमडी’ या अमली पदार्थाला तरुण महाविद्यालयीन मुले बळी पडत आहेत म्हणून नागरिक चिंतेत आहेत. गत आठवड्यात नाशिक शहरात एक फलकच लागला होता ‘उडता पंजाब, सडता नाशिक’. पंजाबमध्ये मुले मोठ्या प्रमाणावर नशेच्या आहारी गेले. त्यावर ‘उडता पंजाब’ हा चित्रपट साकारला. ‘एमडी’ हा अमली पदार्थ सेवन केला की माणूस त्या नशेत धुंद होतो व हवी ती कृत्ये करतो अशी ही झिंग आहे. पुण्यात व नाशिकमध्ये जे रॅकेट समोर आले त्यात राजकीय आरोप- प्रत्यारोपही सुरू आहेत. राजकारण्यांचाच अवैध धंद्यांना वरदहस्त आहे, असा आरोप झाला आहे. गुटखा व मावाबंदी असली तरी या बाबी राजरोस विकल्या जातात. या मागील कारण उघड आहे.

राजकारणासाठी पैसा लागतो. हा पैसा बहुधा समाजाला झिंगवत ठेवतच उभारावा लागतो. समाज झिंगत राहिला तर कदाचित राजकारण निर्धोक चालत असावे. राजकारण तसेच समाज या दोन्ही ठिकाणची मूल्यव्यवस्था हरवली आहे. त्यामुळे ही झिंग आणखी चढत जाणार. हेरंब कुलकर्णी यांनी अनेक शाळांचा अभ्यास करून एक पुस्तक लिहिले आहे, ‘शाळा आहे; पण शिक्षण नाही’. तेच वास्तव असावे. ससून रुग्णालय आरोपीला ड्रग्ज विकण्यासाठी हातभार लावत असेल तर संबंधितांनी नेमकी कुठली पदवी घेतली आहे, हा प्रश्न पडतोच. प्रश्न शाळा, महाविद्यालयात मिळणाऱ्या मूल्यांचाही आहे. या संस्था शाबूत राहिल्या तरच मूल्ये टिकतील, अन्यथा झिंग, हल्ले वाढत जाणार. ‘पिंजरा’ चित्रपटाचा उत्तरार्थ हेच सांगतो.

टॅग्स :liquor banदारूबंदीMaharashtraमहाराष्ट्र