शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
2
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
3
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
4
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
5
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
6
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
7
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
8
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
9
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
10
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
11
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
12
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!
13
Pune Rave Party: "तुमच्या तर दिव्याखालीच अंधार"; चित्रा वाघांनी सुप्रिया सुळे, रोहिणी खडसेंना सुनावले
14
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
15
आजारी लेकीला रुग्णालयात घेऊन चाललेले वडील, BMW ची धडक; मन हेलावून टाकणारी घटना
16
"कोणी ड्रममध्ये भरत आहे तर कोणी...", शिव ठाकरेला वाटते लग्नाची भीती, म्हणाला- "हा तर कर्मा..."
17
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
18
दुबईत सोनं खरंच स्वस्त मिळतं? भारतात आणण्याचे नियम काय? किती टॅक्स लागतो? सर्व काही जाणून घ्या
19
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
20
भन्साळींच्या या सिनेमासाठी २ मराठी अभिनेत्यांनीही दिलेली ऑडिशन, वैभव तत्ववादीने मारली 'बाजी'

महाराष्ट्र कुठल्या नशेने झिंगला आहे?

By सुधीर लंके | Updated: October 11, 2023 08:07 IST

नाशिक, पुण्यासारखी शहरे अमली पदार्थांमुळे गाजत आहेत. शाळेजवळील गुटख्याची टपरी हटवल्याने नगरमध्ये मुख्याध्यापकावर प्राणघातक हल्ला झाला. चाललेय काय?

सुधीर लंके, निवासी संपादक, लोकमत, अहमदनगर

सामाजिक कार्यकर्ते व अहमदनगर शहरातील सीताराम सारडा विद्यालयाचे मुख्याध्यापक हेरंब कुलकर्णी यांच्यावर दोन दिवसांपूर्वी प्राणघातक हल्ला झाला. शाळेसमोरील गुटख्याची टपरी त्यांनी प्रशासनाच्या मदतीने हलवली. या बाबीचा सूड उगविण्यासाठी टपरीचालकाने थेट सुपारी देऊन त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. शिक्षक हा गाव सुधारण्यासाठी भूमिका घेणारा हवा. बनगरवाडी कादंबरीने तेच सांगितले. ‘पिंजरा’ चित्रपटातील सुरुवातीचा शिक्षकही असाच गावाला वळण लावणारा दाखविला आहे; पण येथे एक शिक्षक ‘शाळेच्या शंभर यार्ड परिसरात गुटखा, तंबाखू विकता येत नाही’ या सरकारच्या आदेशाचेच पालन करतो म्हणून ‘टार्गेट’ होतो. या हल्ल्याचा सर्व स्तरातून निषेध झाला. मुख्यमंत्र्यांनी कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधून त्यांना धीर दिला. कारवाई करण्याचे आश्वासन दिले; पण या घटनेचे मूळ महाराष्ट्र समजून घेईल का? आपल्या गावातील शिक्षकावर हल्ला होत असताना अहमदनगर महापालिकेने काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही.  आपली गावे, शहरे यांना वळण लागावे ही गरज मुळात समाजाला वाटते आहे का, हा प्रश्न यातून निर्माण होतो. सध्या पुणे व नाशिक ही दोन शहरे अमली पदार्थांच्या विक्रीमुळे गाजत आहेत. अमली पदार्थ विक्रीचा सूत्रधार असलेला आरोपी ललित पाटील हा रुग्ण म्हणून ससून रुग्णालयात उपचार घेत होता. तेथून तो अमली पदार्थांचे रॅकेट चालवत होता ही बाब समोर आली आहे. गरीब रुग्णांना सरकारी दवाखाने लवकर बेड देत नाहीत; पण ललित पाटीलसाठी तो कायम राखीव होता. त्याच्यावर उपचाराची गरज आहे, असे अहवाल डॉक्टरांनी दिले व त्याला महिनोन्महिने ससूनमध्ये ठेवले. यासाठी तो रुग्णालय प्रशासनाला दर दिवशी ७० हजार रुपये मोजत होता, असे धक्कादायक खुलासेही समोर आले आहेत; पण एवढे होऊनही ससूनच्या अधिष्ठात्यासह कुणाचेही काही वाकडे झालेले नाही. ललित पाटील व त्याचा भाऊ महागडे अमली पदार्थ बनवत होते. त्यांच्या नाशिकमधील कारखान्यावरही या आठवड्यात पोलिसांनी छापे टाकून ३०० कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीचा ‘एमडी’ (मेफेड्रोन पावडर) हा अमली पदार्थ जप्त केला आहे. पुणे व नाशिक ही दोन शहरे यानिमित्ताने चर्चेत आली आहेत. ‘माओ’ म्हणाला होता, ‘कॅच देम यंग’. जगभरातील बहुतांश चळवळींचा व प्रशासनाचाही हा अजेंडा राहिलेला आहे की ‘कॅच देम यंग’. याचा अर्थ तरुणांना जवळ करा; पण अमली पदार्थ विक्रेते व व्यसनांचा व्यापार करणाऱ्यांचाही ‘तरुण’ हाच अजेंडा दिसतो आहे. नाशिकमध्ये ‘एमडी’ या अमली पदार्थाला तरुण महाविद्यालयीन मुले बळी पडत आहेत म्हणून नागरिक चिंतेत आहेत. गत आठवड्यात नाशिक शहरात एक फलकच लागला होता ‘उडता पंजाब, सडता नाशिक’. पंजाबमध्ये मुले मोठ्या प्रमाणावर नशेच्या आहारी गेले. त्यावर ‘उडता पंजाब’ हा चित्रपट साकारला. ‘एमडी’ हा अमली पदार्थ सेवन केला की माणूस त्या नशेत धुंद होतो व हवी ती कृत्ये करतो अशी ही झिंग आहे. पुण्यात व नाशिकमध्ये जे रॅकेट समोर आले त्यात राजकीय आरोप- प्रत्यारोपही सुरू आहेत. राजकारण्यांचाच अवैध धंद्यांना वरदहस्त आहे, असा आरोप झाला आहे. गुटखा व मावाबंदी असली तरी या बाबी राजरोस विकल्या जातात. या मागील कारण उघड आहे.

राजकारणासाठी पैसा लागतो. हा पैसा बहुधा समाजाला झिंगवत ठेवतच उभारावा लागतो. समाज झिंगत राहिला तर कदाचित राजकारण निर्धोक चालत असावे. राजकारण तसेच समाज या दोन्ही ठिकाणची मूल्यव्यवस्था हरवली आहे. त्यामुळे ही झिंग आणखी चढत जाणार. हेरंब कुलकर्णी यांनी अनेक शाळांचा अभ्यास करून एक पुस्तक लिहिले आहे, ‘शाळा आहे; पण शिक्षण नाही’. तेच वास्तव असावे. ससून रुग्णालय आरोपीला ड्रग्ज विकण्यासाठी हातभार लावत असेल तर संबंधितांनी नेमकी कुठली पदवी घेतली आहे, हा प्रश्न पडतोच. प्रश्न शाळा, महाविद्यालयात मिळणाऱ्या मूल्यांचाही आहे. या संस्था शाबूत राहिल्या तरच मूल्ये टिकतील, अन्यथा झिंग, हल्ले वाढत जाणार. ‘पिंजरा’ चित्रपटाचा उत्तरार्थ हेच सांगतो.

टॅग्स :liquor banदारूबंदीMaharashtraमहाराष्ट्र