शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

बाबासाहेब, काय हे?

By admin | Updated: April 20, 2017 02:38 IST

राज्याचे मुख्य माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांच्यावर औरंगाबादेत भारिपच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला. त्यांना आणि त्यांच्या पत्नी शिवगंगा यांनाही मारहाण केली गेली.

राज्याचे मुख्य माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांच्यावर औरंगाबादेत भारिपच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला. त्यांना आणि त्यांच्या पत्नी शिवगंगा यांनाही मारहाण केली गेली. मुंबईच्या दादर भागातील आंबेडकर भवनाच्या बाबतीत गायकवाड यांनी घेतलेल्या भूमिकेचा राग मनात धरून त्यांना ही मारहाण केली गेली. गायकवाड यांनी आंबेडकर भवनच्या बाबतीत जे काही केले ते चूक की बरोबर हा वादाचा आणि चर्चेचा विषय असला तरी त्यांना मारहाण करणे ही कृती अत्यंत खालच्या पातळीवरची आहे. गायकवाड यांच्यावर राग होताच, तो कुठे ना कुठे व्यक्त होणारच होता, अशी जी प्रतिक्रिया भारिपचे नेते प्रा. अविनाश डोळस यांनी दिली, तीदेखील तेवढीच चुकीची आहे. गायकवाड यांचे म्हणणे पटले नसेल तर ते कसे चुकीचे आहे, माहिती आयुक्तांना अशा भूमिका घेता येतात का, असे प्रश्न उपस्थित करून प्रा. डोळस आणि त्यांच्या पक्षाला सनदशीर मार्ग अवलंबता आले असते. पण तसे न करता आमच्या विरुद्ध जाल तर फोडून काढू म्हणणे ही तालिबानी वृत्ती झाली. समतेचा आणि शिक्षणाचा पाया घालणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना डोळस आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी केलेली कृती कशी मान्य होणार? आज जर बाबासाहेब असते तर ते या सगळ्यावर कसे वागले असते, त्यांची प्रतिक्रिया काय घडली असती? याचे उत्तरही प्रा. डोळसांनी द्यायला हवे. एरव्ही टीकाटिप्पणी करताना पुढे असणारे पक्षाचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी या सगळ्या प्रकाराबद्दल बाळगलेले मौन हेही अक्षम्य आहे. आज आंबेडकरी जनतेला शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणे, त्यांचे जीवनमान उंचावणे, त्यांच्यासाठी उच्च आणि परदेशी शिक्षणासाठीचे वातावरण गावागावांत तयार करण्याची गरज असताना ते काहीही न करता अशी मारहाण करत जर कार्यकर्ते फिरू लागले तर त्यातून समाजाची घोर उपेक्षा होईल त्याचे काय? बाबासाहेबांनी ‘शिका आणि संघटित व्हा’ असा नारा दिला. मिळालेली विद्या समाजाच्या भल्यासाठी वापरावी हे त्यांना अभिप्रेत होते. ‘विद्या विनयेन शोभते’ असेही एक वचन आहे. ज्याच्याजवळ विद्या असते, ज्ञान असते तो कायम नम्र असतो असा त्याचा सरळ अर्थ. पण या कृतीने तो अर्थदेखील निरर्थक ठरला आहे. बाबासाहेबांनाही या कृतीचा पश्चाताप झाला असता. प्रकाश आंबेडकरांना काय वाटले, ते मात्र अजूनही समजलेले नाही..!