शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-भाजपा आणि डावे, निवडणुकीत कट्टर विरोधक आले एकत्र, या पक्षाविरोधात केली आघाडी   
2
पुतिन यांच्या भारत भेटीने का खूश झाला आहे पाकिस्तानचा 'हा' शेजारी देश? काय फायदा होणार?
3
कुटुंबाला भेटायला निघालेल्या पोलीस अधिकाऱ्याला वाटेतच मृत्यूनं गाठलं; कार अपघातात पेटली अन् जागीच...
4
बाबरी मशिदीच्या पायाभरणीवरून बंगालमध्ये वाद, विटा घेऊन निघाले हुमायूं कबीर यांचे समर्थक  
5
अनिल अंबानी यांची आणखी १,१२० कोटींची मालमत्ता जप्त; मुदत ठेवी, शेअर्सचाही समावेश
6
SMAT 2025 : डॉक्टरांमुळे इंदूरमध्ये क्रिकेटर्सची गैरसोय! आता पुण्यात रंगणार टी-२० चा थरार; कारण...
7
संबंध नसलेल्यांचे एसआरएवर नियंत्रण, राजकारण्यांना उच्च न्यायालयाचा टोला
8
IndiGo: पाणी नाही, जेवण नाही, कॅप्टनही गायब; इंडिगोच्या प्रवाशानं काढलेला व्हिडीओ एकदा बघाच!
9
Accident: अयोध्येला जाणाऱ्या भाविकांच्या वाहनाला अपघात, जळगावची महिला ठार
10
१२ डिसेंबरपासून उघडतोय 'हा' आयपीओ; आतापासूनच ₹३५० च्या नफ्यावर पोहोचलाय GMP
11
एसयूव्ही कार्स खरेदी करण्यासाठी सुवर्णकाळ! 'या' मॉडेल्सवर मिळतोय बंपर डिस्काउंट; एकीवर तर ३.२५ लाखांची सूट
12
Dhurandar Box Office: रणवीर सिंगच्या 'धुरंदर'ने पहिल्याच दिवशी धुव्वा उडवला! बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
13
Airfares Soar: मुंबई-पुणे विमानासाठी मोजा ६७,५०० रुपये; अन्य कंपन्यांनी प्रवाशांना प्रचंड लुटले
14
लग्नाचे कायदेशीर वय गाठलेले नसले तरीही ते दोघे स्वेच्छेने लिव्ह-इनमध्ये राहू शकतात; उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निकाल
15
५३१ धावांचं आव्हान, सातव्या विकेटसाठी विक्रमी भागीदारी, विंडीजकडून जोरदार पाठलाग, अखेरीस असा लागला निकाल  
16
महायुतीत आधी लढाई, आता नरमाई; भाजप-शिंदेसेनेत आता होणार चर्चा
17
धक्कादायक माहिती! गुजरातमधील मतदार याद्यांत १७ लाख मृतांची नावे
18
घटस्फोटाच्या ४ महिन्यानंतर मराठमोळ्या अभिनेत्रीने बांधली दुसऱ्यांदा लग्नगाठ, फोटो आला समोर
19
इंडिगोमुळे प्रवासी बेजार, थेट ठोठावलं सुप्रीम कोर्टाचं दार; CJI सूर्य कांत यांच्या घरी गेले याचिकाकर्ते! म्हणाले...
20
Suryakumar Yadav: सूर्यकुमार यादवचा मोठा पराक्रम, टी-२० क्रिकेटमध्ये मुंबईकडून खेळताना रचला इतिहास!
Daily Top 2Weekly Top 5

असा गाढवपणा आम्ही पुन्हा पुन्हा करू !

By गजानन दिवाण | Updated: August 26, 2020 13:18 IST

परळी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या आवारात वृक्षारोपण केलेले झाड खाऊन या गाढवाने पोलिसांच्या धाकालाच आव्हान दिले. व्हायचे तेच झाले. पोलिसांना घाबरायलाच हवे. त्यांना न घाबरण्याचा उद्दामपणा या गाढवाने केला. मग काय, सापळा लावून या गाढवाला पकडले गेले.

- गजानन दिवाण  ( उपवृत्त संपादक, लोकमत, औरंगाबाद )

शहाण्याने कोर्टाची आणि दवाखान्याची पायरी चढू नये, असे म्हणतात. मी यात पोलीस ठाण्याची भर घालेन. म्हणजे सिग्नल तोडला नाही, असा वाद घालण्यापेक्षा माफी मागावी आणि सुटका करून घ्यावी. म्हणजे पोलिसांचा स्वाभिमान दुखावत नाही आणि आपल्यालाही फुकटचा मनस्ताप होत नाही. गाढवांना हे कसे कळणार? बीड जिल्ह्यात एका गाढवाने हीच चूक केली. गाढवच ते, कुठले काय खावे हे त्याला कसे कळणार? परळी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या आवारात वृक्षारोपण केलेले झाड खाऊन या गाढवाने पोलिसांच्या धाकालाच आव्हान दिले. व्हायचे तेच झाले. पोलिसांना घाबरायलाच हवे. त्यांना न घाबरण्याचा उद्दामपणा या गाढवाने केला. मग काय, सापळा लावून या गाढवाला पकडले गेले. ठाण्याच्या आवारातच त्याला डांबण्यात आले. २४ तास अलर्ट असलेल्या सोशल मीडियाच्या नजरेतून हा गाढव कसा सुटेल? मग काय सोशल मीडियावर या गाढवाने चांगलाच गोंधळ घातला. काहींनी त्याच्या जमानतीचीदेखील तयारी सुरू केली. हा सारा प्रकार लक्षात येताच पोलिसांनी शहाणपणा दाखवत गाढवाला सोडून दिले. असे काही घडलेच नाही, हे पोलिसांचे म्हणणे. खरे-खोटे पोलिसांना आणि त्या गाढवालाच ठाऊक!

झाड तोडणे हा गुन्हा आणि ते तोडणारा गुन्हेगार; पण झाडे तोडल्याच्या अशा किती प्रकरणात गुन्हे दाखल झाले आहेत? वनविभागाचाच एक अहवाल पाहा. २०१३ ते २०१८ या पाच वर्षांत राज्यात ५ लाख ६१ हजार ४१० झाडांची बेकायदेशीर तोड झाली. २०१५ ते २०१९ या काळात देशभरातील ९४ लाख ९८ हजार ५१६ झाडे सरकारच्या परवानगीने तोडण्यात आली. झाडांची कत्तल करण्यात तेलंगणा (१५ लाख २६ हजार ६६३) नंतर आपल्याच राज्याचा नंबर लागला. महाराष्ट्राने १३ लाख ४२ हजार ७०३ झाडांवर सरकारच्या परवानगीने कुऱ्हाड चालविली. याच काळात राज्याने ५०२२ हेक्टर वनजमिनीवर नांगर फिरवून वेगवेगळे विकास प्रकल्प आणले. देशात असे जंगल तोडणारे राज्य म्हणून मध्यप्रदेश, ओडिशानंतर महाराष्ट्राने नाव केले. एकट्या मुंबईत विविध विकास प्रकल्पांसाठी २०१० ते २०१६ या काळात २५ हजार झाडे तोडल्याची तक्रार फडणवीस सरकारच्या काळात झाली. औरंगाबादेत गेल्या पाच वर्षांत जवळपास ३० टक्के झाडे तोडली गेली. समृद्धी महामार्गाने तर हजारो झाडांचा बळी घेतला. गेल्या काही वर्षांत रस्ता रुंदीकरणासाठी हजारो झाडांवर कुऱ्हाड चालविली गेली. यातील किती प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल झाले?

सरकारने एकीकडे अशी वृक्षतोड सुरू ठेवली असली तरी त्याचवेळी राज्यात २०२१ पर्यंत ५० कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्टही ठेवले. गेल्यावर्षी तर ३३ कोटी झाडे लावण्याची मोहीम जोरात पार पडली. त्याचे जबरदस्त ब्रॅण्डिंगही झाले. यातील ७७ टक्के झाडे जगली असल्याचा दावा राज्य सरकारने केला. विकासाच्या नावाखाली एकीकडे लाखो झाडांवर कुऱ्हाड चालविली हे खरे असले तरी  त्याचवेळी वृक्षारोपणाची कोटीच्या कोटी उड्डाणे देखील घेतली. त्यावर सरकारने कोट्यवधी रुपयांची उधळण केली म्हणून ओरड का करायची?  लाखो झाडे तोडली आणि कोटींमध्ये लावली. तुम्ही म्हणाल, एक झाड काय देते? एका व्यक्तीला साधारण ७४० किलो ऑक्सिजन लागतो. एक झाड वर्षात १०० किलोपर्यंत ऑक्सिजन देते. एक झाड वर्षभरात २२ किलो कार्बन डायऑक्साईड शोषून घेते. एक झाड ६ टक्क्यांपर्यंत धूर-धुके कमी करते. एक झाड प्रदूषित हवेतून १०८ किलोपर्यंत लहान कण शोषून घेते.  

एका झाडाचे हे महत्त्व आमच्या राज्य सरकारलाही कळते आणि केंद्र सरकारला देखील. ते कसे?  समजा १० हेक्टरवरील झाडे तोडली गेली असतील तर एवढ्याच वनेतर जमिनीवर दुप्पट किंवा तिप्पट झाडे लावायची, हा सरकारी नियम. हे म्हणजे ‘आम के आम गुठलियोें के दाम’. तोडलेल्या झाडांच्या दुप्पट किंवा तिप्पट  झाडे लावली तर तोटा होतो कुठे? हे राज्य सरकारला कळते आणि केंद्रालाही कळते. म्हणून तर तोडलेल्या झाडांची अशी मोठी भरपाई केली जाते. भरपाईचे हे सरकारी गणित आमच्या परळी पोलिसांना कळले नाही. एका गाढवाने झाडाचे पत्ते काय खाल्ले, दिल्या बेड्या ठोकून. त्याला चक्क ठाण्याच्या आवारात आणून बांधले. सोशल मीडियावर या गाढवाने असा काही गोंधळ उडविला की पोलिसांना बेड्या काढणे भाग पडले. भरपाईच्या सरकारी नियमाप्रमाणे गाढवाने एक झाड खाल्ले म्हणून त्याच्या मालकाकडून पोलिसांनी दोन किंवा तीन झाडे लावून घेतली असती तर बिघडले थोडेच असते. 

टॅग्स :Policeपोलिसenvironmentपर्यावरणforestजंगल