शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

विजयाचे ‘वरुड पॅटर्न’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2018 01:02 IST

निवडणुकीत जी व्यक्ती विजय मिळवते तो विजय त्या व्यक्तीच्या कार्यकर्तृत्वाचा असला पाहिजे की निवडणूक जिंकण्याच्या तंत्राचा? अर्थातच कार्यकर्तृत्वाचा असला पाहिजे. पण, दुर्दैवाने आजच्या निवडणुका या निवडणूक जिंकण्याच्या तंत्रावर जिंकल्या जात आहेत. हे तंत्र ज्याला साधले तो सत्ताधीश. मग त्यात ती सत्ता सांभाळण्याची क्षमता आहे की नाही, याकडे बघायला कुणाकडेच वेळ नाही.

निवडणुकीत जी व्यक्ती विजय मिळवते तो विजय त्या व्यक्तीच्या कार्यकर्तृत्वाचा असला पाहिजे की निवडणूक जिंकण्याच्या तंत्राचा? अर्थातच कार्यकर्तृत्वाचा असला पाहिजे. पण, दुर्दैवाने आजच्या निवडणुका या निवडणूक जिंकण्याच्या तंत्रावर जिंकल्या जात आहेत. हे तंत्र ज्याला साधले तो सत्ताधीश. मग त्यात ती सत्ता सांभाळण्याची क्षमता आहे की नाही, याकडे बघायला कुणाकडेच वेळ नाही. म्हणूनच मेघालयात फक्त दोन आमदार असलेला पक्ष सत्तास्थापनेत महत्त्वाची भूमिका वठवतो आणि तब्बल २१ आमदार जिंकून जनाधार आपल्यासोबत आहे हे सिद्ध करणारा पक्ष विरोधी बाकावर बसतो. निवडणूक व त्यासाठी आवश्यक असलेले राजकारण मग ते दिल्लीच्या तख्ताचे असो वा गल्लीतल्या संस्थेचे. आजच्या निवडणुका अशाच जिंकण्याच्या तंत्रावर जिंकल्या जात आहेत. हे ‘तंत्र’ नव्याने आठवण्याचे कारण अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या मध्यवर्ती नियामक मंडळाची निवडणूक आहे. काल-परवाच या निवडणुकीचा निकाल लागला. नागपुरातून तीन जागांकरिता सात उमेदवार रिंगणात होते. यापैकी नागपूर शाखेचे नरेश गडेकर, शेखर बेंद्रे, प्रमोद भुसारी अपेक्षेनुसार विजयी झाले. यामध्ये रंगसेवक पॅनलचे अनिल चणाखेकर, सलीम शेख या अनुभवी रंगकर्मींना पराभवाचे तोंड बघावे लागले. दिलीप देवरणकर व दिलीप ठाणेकर यांना मिळालेली अनुक्रमे १११ व २८ मतेही फारच बोलकी आहेत. ही निवडणूकही तंत्राने जिंकण्यात आल्याची चर्चा आता रंगत आहे. या तंत्राचे गोड नामकरणही झाले आहे. ‘वरुड पॅटर्न’. हा ‘वरुड पॅटर्न’ नेमका काय आहे आणि तो या निवडणुकीत कसा चालला, याची कथाही नाटकाइतकीच रंजक आहे. वरुडच्या एका शाळेतील तब्बल ७९ जण नाट्य परिषदेचे मतदार आहेत. विशेष म्हणजे, या सगळ्यांचा पत्ताही सारखाच आहे. यातल्या ६६ जणांनी या निवडणुकीत मतदान केले. आजूबाजूच्या शहरात नाटकाची फारशी चर्चा नसताना वरुडसारख्या छोट्या गावातील एकाच शाळेत इतके मतदार असणे व त्यांनी या निवडणुकीत व्यापक सक्रियता दाखवणे, यात काहीच वावगे नाही. प्रश्न हा आहे की यातल्या किती जणांना नाटक नावाचा प्रकार माहिती आहे? जे उमेदवार मैदानात होते त्यांचे जवळपास १०० नातेवाईकही या निवडणुकीत मतदार होते. याचा अर्थ निवडणूक डोळ्यापुढे ठेवूनच मतदारांची संख्या पद्धतशीर वाढविण्यात आली आणि निवडणुकीत ती मते आपल्याकडे वळती करण्यात आली, असे म्हणण्याला पूर्ण वाव आहे. खंत एकाच गोष्टीची की या निवडणुकीत तंत्र जिंकले पण नाटक हरले. नाटक जिंकले असते तर नागपूर-विदर्भातील नवोदित रंगकर्मींचा आवाज ‘मध्यवर्ती’पर्यंत पोहोचवता आला असता. ‘वरुड पॅटर्न’ने हा आवाजच दडपून टाकला आहे.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रElectionनिवडणूक