शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
2
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
3
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
4
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
5
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
6
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
7
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
8
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
9
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
10
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
11
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
12
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
13
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
14
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
15
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
16
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
17
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
18
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
19
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
20
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप

विजयाचे ‘वरुड पॅटर्न’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2018 01:02 IST

निवडणुकीत जी व्यक्ती विजय मिळवते तो विजय त्या व्यक्तीच्या कार्यकर्तृत्वाचा असला पाहिजे की निवडणूक जिंकण्याच्या तंत्राचा? अर्थातच कार्यकर्तृत्वाचा असला पाहिजे. पण, दुर्दैवाने आजच्या निवडणुका या निवडणूक जिंकण्याच्या तंत्रावर जिंकल्या जात आहेत. हे तंत्र ज्याला साधले तो सत्ताधीश. मग त्यात ती सत्ता सांभाळण्याची क्षमता आहे की नाही, याकडे बघायला कुणाकडेच वेळ नाही.

निवडणुकीत जी व्यक्ती विजय मिळवते तो विजय त्या व्यक्तीच्या कार्यकर्तृत्वाचा असला पाहिजे की निवडणूक जिंकण्याच्या तंत्राचा? अर्थातच कार्यकर्तृत्वाचा असला पाहिजे. पण, दुर्दैवाने आजच्या निवडणुका या निवडणूक जिंकण्याच्या तंत्रावर जिंकल्या जात आहेत. हे तंत्र ज्याला साधले तो सत्ताधीश. मग त्यात ती सत्ता सांभाळण्याची क्षमता आहे की नाही, याकडे बघायला कुणाकडेच वेळ नाही. म्हणूनच मेघालयात फक्त दोन आमदार असलेला पक्ष सत्तास्थापनेत महत्त्वाची भूमिका वठवतो आणि तब्बल २१ आमदार जिंकून जनाधार आपल्यासोबत आहे हे सिद्ध करणारा पक्ष विरोधी बाकावर बसतो. निवडणूक व त्यासाठी आवश्यक असलेले राजकारण मग ते दिल्लीच्या तख्ताचे असो वा गल्लीतल्या संस्थेचे. आजच्या निवडणुका अशाच जिंकण्याच्या तंत्रावर जिंकल्या जात आहेत. हे ‘तंत्र’ नव्याने आठवण्याचे कारण अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या मध्यवर्ती नियामक मंडळाची निवडणूक आहे. काल-परवाच या निवडणुकीचा निकाल लागला. नागपुरातून तीन जागांकरिता सात उमेदवार रिंगणात होते. यापैकी नागपूर शाखेचे नरेश गडेकर, शेखर बेंद्रे, प्रमोद भुसारी अपेक्षेनुसार विजयी झाले. यामध्ये रंगसेवक पॅनलचे अनिल चणाखेकर, सलीम शेख या अनुभवी रंगकर्मींना पराभवाचे तोंड बघावे लागले. दिलीप देवरणकर व दिलीप ठाणेकर यांना मिळालेली अनुक्रमे १११ व २८ मतेही फारच बोलकी आहेत. ही निवडणूकही तंत्राने जिंकण्यात आल्याची चर्चा आता रंगत आहे. या तंत्राचे गोड नामकरणही झाले आहे. ‘वरुड पॅटर्न’. हा ‘वरुड पॅटर्न’ नेमका काय आहे आणि तो या निवडणुकीत कसा चालला, याची कथाही नाटकाइतकीच रंजक आहे. वरुडच्या एका शाळेतील तब्बल ७९ जण नाट्य परिषदेचे मतदार आहेत. विशेष म्हणजे, या सगळ्यांचा पत्ताही सारखाच आहे. यातल्या ६६ जणांनी या निवडणुकीत मतदान केले. आजूबाजूच्या शहरात नाटकाची फारशी चर्चा नसताना वरुडसारख्या छोट्या गावातील एकाच शाळेत इतके मतदार असणे व त्यांनी या निवडणुकीत व्यापक सक्रियता दाखवणे, यात काहीच वावगे नाही. प्रश्न हा आहे की यातल्या किती जणांना नाटक नावाचा प्रकार माहिती आहे? जे उमेदवार मैदानात होते त्यांचे जवळपास १०० नातेवाईकही या निवडणुकीत मतदार होते. याचा अर्थ निवडणूक डोळ्यापुढे ठेवूनच मतदारांची संख्या पद्धतशीर वाढविण्यात आली आणि निवडणुकीत ती मते आपल्याकडे वळती करण्यात आली, असे म्हणण्याला पूर्ण वाव आहे. खंत एकाच गोष्टीची की या निवडणुकीत तंत्र जिंकले पण नाटक हरले. नाटक जिंकले असते तर नागपूर-विदर्भातील नवोदित रंगकर्मींचा आवाज ‘मध्यवर्ती’पर्यंत पोहोचवता आला असता. ‘वरुड पॅटर्न’ने हा आवाजच दडपून टाकला आहे.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रElectionनिवडणूक