शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
4
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
5
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
6
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
7
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
8
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
9
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
10
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
11
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
12
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
13
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
14
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
15
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
16
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
17
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
18
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
19
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
20
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा

विजयाचे ‘वरुड पॅटर्न’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2018 01:02 IST

निवडणुकीत जी व्यक्ती विजय मिळवते तो विजय त्या व्यक्तीच्या कार्यकर्तृत्वाचा असला पाहिजे की निवडणूक जिंकण्याच्या तंत्राचा? अर्थातच कार्यकर्तृत्वाचा असला पाहिजे. पण, दुर्दैवाने आजच्या निवडणुका या निवडणूक जिंकण्याच्या तंत्रावर जिंकल्या जात आहेत. हे तंत्र ज्याला साधले तो सत्ताधीश. मग त्यात ती सत्ता सांभाळण्याची क्षमता आहे की नाही, याकडे बघायला कुणाकडेच वेळ नाही.

निवडणुकीत जी व्यक्ती विजय मिळवते तो विजय त्या व्यक्तीच्या कार्यकर्तृत्वाचा असला पाहिजे की निवडणूक जिंकण्याच्या तंत्राचा? अर्थातच कार्यकर्तृत्वाचा असला पाहिजे. पण, दुर्दैवाने आजच्या निवडणुका या निवडणूक जिंकण्याच्या तंत्रावर जिंकल्या जात आहेत. हे तंत्र ज्याला साधले तो सत्ताधीश. मग त्यात ती सत्ता सांभाळण्याची क्षमता आहे की नाही, याकडे बघायला कुणाकडेच वेळ नाही. म्हणूनच मेघालयात फक्त दोन आमदार असलेला पक्ष सत्तास्थापनेत महत्त्वाची भूमिका वठवतो आणि तब्बल २१ आमदार जिंकून जनाधार आपल्यासोबत आहे हे सिद्ध करणारा पक्ष विरोधी बाकावर बसतो. निवडणूक व त्यासाठी आवश्यक असलेले राजकारण मग ते दिल्लीच्या तख्ताचे असो वा गल्लीतल्या संस्थेचे. आजच्या निवडणुका अशाच जिंकण्याच्या तंत्रावर जिंकल्या जात आहेत. हे ‘तंत्र’ नव्याने आठवण्याचे कारण अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या मध्यवर्ती नियामक मंडळाची निवडणूक आहे. काल-परवाच या निवडणुकीचा निकाल लागला. नागपुरातून तीन जागांकरिता सात उमेदवार रिंगणात होते. यापैकी नागपूर शाखेचे नरेश गडेकर, शेखर बेंद्रे, प्रमोद भुसारी अपेक्षेनुसार विजयी झाले. यामध्ये रंगसेवक पॅनलचे अनिल चणाखेकर, सलीम शेख या अनुभवी रंगकर्मींना पराभवाचे तोंड बघावे लागले. दिलीप देवरणकर व दिलीप ठाणेकर यांना मिळालेली अनुक्रमे १११ व २८ मतेही फारच बोलकी आहेत. ही निवडणूकही तंत्राने जिंकण्यात आल्याची चर्चा आता रंगत आहे. या तंत्राचे गोड नामकरणही झाले आहे. ‘वरुड पॅटर्न’. हा ‘वरुड पॅटर्न’ नेमका काय आहे आणि तो या निवडणुकीत कसा चालला, याची कथाही नाटकाइतकीच रंजक आहे. वरुडच्या एका शाळेतील तब्बल ७९ जण नाट्य परिषदेचे मतदार आहेत. विशेष म्हणजे, या सगळ्यांचा पत्ताही सारखाच आहे. यातल्या ६६ जणांनी या निवडणुकीत मतदान केले. आजूबाजूच्या शहरात नाटकाची फारशी चर्चा नसताना वरुडसारख्या छोट्या गावातील एकाच शाळेत इतके मतदार असणे व त्यांनी या निवडणुकीत व्यापक सक्रियता दाखवणे, यात काहीच वावगे नाही. प्रश्न हा आहे की यातल्या किती जणांना नाटक नावाचा प्रकार माहिती आहे? जे उमेदवार मैदानात होते त्यांचे जवळपास १०० नातेवाईकही या निवडणुकीत मतदार होते. याचा अर्थ निवडणूक डोळ्यापुढे ठेवूनच मतदारांची संख्या पद्धतशीर वाढविण्यात आली आणि निवडणुकीत ती मते आपल्याकडे वळती करण्यात आली, असे म्हणण्याला पूर्ण वाव आहे. खंत एकाच गोष्टीची की या निवडणुकीत तंत्र जिंकले पण नाटक हरले. नाटक जिंकले असते तर नागपूर-विदर्भातील नवोदित रंगकर्मींचा आवाज ‘मध्यवर्ती’पर्यंत पोहोचवता आला असता. ‘वरुड पॅटर्न’ने हा आवाजच दडपून टाकला आहे.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रElectionनिवडणूक