शहरं
Join us  
Trending Stories
1
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
2
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
3
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
4
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
5
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
6
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
7
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
8
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
9
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
10
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
11
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
12
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
13
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
14
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
15
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
16
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
17
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
18
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
19
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
20
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...

चालता-बोलता संदर्भ ग्रंथ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 04:10 IST

पत्रकारांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांचा चालता-बोलता संदर्भ ग्रंथ म्हणूनच आबासाहेब ऊर्फ अ‍ॅड. धनंजय माने ओळखले जातात...!

- राजा मानेपत्रकारांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांचा चालता-बोलता संदर्भ ग्रंथ म्हणूनच आबासाहेब ऊर्फ अ‍ॅड. धनंजय माने ओळखले जातात...!अनेक माणसं आपल्याभोवती वावरत असतात. त्यांचं ‘वनमॅन आर्मी’ शैलीतील काम मात्र बºयाच वेळा आपल्या लक्षातही येत नाही. अशाच शैलीत सोलापूर जिल्ह्यात गेली चार तपं कार्यरत असलेलं नाव म्हणजे आबासाहेब तथा धनंजय एकनाथ माने!वकिली व्यवसायात राहून स्वत:च्याच आचारसंहितेबरहुकूम जीवनाची वाटचाल करताना वाचन, अभिरुची संपन्नता आणि सामाजिक जबाबदारीचे भान कशा पद्धतीने राखले जाऊ शकते, याचे उदाहरण म्हणूनच आबासाहेबांकडे आज पाहिले जाते. वयाची सहासष्टी ओलांडलेल्या या माणसाने आपल्या ज्ञान व वाचनसमृद्धीच्या बळावर अनेक क्षेत्रातील मान्यवरांचा चालता-बोलता संदर्भ ग्रंथ ठरण्याचे आपसूक कार्य केले आहे.राजकारण असो वा आंतरराष्टÑीय इतिहास, त्याचे सर्व संदर्भ त्यांना जणू तोंडपाठच! या गुणाला प्रेमळ आणि निरपेक्ष स्वभावाची जोड मिळाल्याने सर्वच क्षेत्रात त्यांच्यावर प्रेम करणारा खूप मोठा गोतावळा तयार झाल्याचा अनुभव आपल्याला येतो. करमाळा तालुक्यातील शेळगाव हे माने कुटुंबाचे मूळ गाव. शिक्षण आणि व्यवसायाच्या निमित्ताने पुढे हे कुटुंब सोलापूरला स्थलांतरित झाले. सोलापूर नगरपालिका असताना १९६३-६४ साली त्यांचे पिताश्री अण्णासाहेब तथा अ‍ॅड. ए. तु. माने हे नगराध्यक्ष होते. वकिली आणि राजकारणात त्यांच्या नावाचा दबदबा होता. कडक शिस्तीचे आणि कल्पक असलेल्या अण्णासाहेबांनी त्या काळात सोलापूर नगरपालिकेचे रूपांतर महापालिकेत व्हावे, असा ठरावही केला होता. वडिलांचा असा संपन्न वारसा लाभलेल्या आबासाहेबांचे शालेय शिक्षण दमाणी हायस्कूल तर महाविद्यालयीन शिक्षण दयानंद महाविद्यालयात झाले. बी. एस्सी.ची पदवी घेतल्यानंतर त्यांनी कायद्याच्या अभ्यासासाठी मुंबईच्या शासकीय विधी महाविद्यालयात प्रवेश घेतला. तेथूनच त्यांनी कायद्याची पदवी संपादन केली. कायदा विश्वात ते बॅ. शरदचंद्र बोस आणि कैलासनाथ काटजू यांना आपले गुरू मानतात. शिकत असतानाच त्यांचे वडील अण्णासाहेबांना कर्करोगाने ग्रासले अन् सर्वच कर्तव्यांची जबाबदारी आबासाहेबांवर येऊन पडली. ती जबाबदारी समर्थपणे सांभाळताना व्यवसायात सामाजिक मूल्य असणाºया खटल्यांमध्ये त्यांनी सदैव विशेष भूमिका बजावण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. गोरगरिबांच्या खटल्यांमध्ये विनामूल्य काम करण्याचे तत्त्व अंगीकारले.१९७५ पासून सक्रिय झालेल्या अ‍ॅड. धनंजय माने यांच्याकडे आज चार हजारांहून अधिक ग्रंथसंपदा असलेले ग्रंथालय आहे. इंग्रजीसह विविध भाषांमधील अनेक संदर्भ संकलित करण्याचा त्यांना छंद आहे. माणूस मोठा होतो, त्यात समाजाचा खूप मोठा वाटा असतो. त्यामुळे आपण केलेल्या कमाईचा ५० टक्के वाटा समाजाला दिला पाहिजे, या तत्त्वाचे ते समर्थक आहेत. त्याच कारणाने प्रसिद्धीपासून दूर ठेवून कॅन्सरग्रस्त तसेच गरीब विद्यार्थ्यांसाठी ते आर्थिक मदत करीत असतात. याच कार्यात त्यांची पत्नी सौ. रेखा, चिरंजीव अ‍ॅड. जयदीप, सून नेहा यांचा सहभाग असतो. त्यांच्या दोन्ही कन्या अभियंता असून, त्यापैकी गीतांजली साळोखे ही अमेरिकेत तर दीप्ती जाधव ही मुंबईत संशोधन करते आहे. जिल्ह्यातील पत्रकारांबरोबरच विविध क्षेत्रातील व्यक्तींचा चालता-बोलता संदर्भ ग्रंथ म्हणूनच आबासाहेबांकडे पाहिले जाते.

टॅग्स :Solapurसोलापूर