शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

पक्षसंघटना अन् सरकारचा जबरदस्त मेळ फडणवीस-पाटील जोडगोळीमुळे शक्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2019 04:40 IST

स्वत:च्या राहण्या-बोलण्यातून स्वयंसेवकत्व जपतानाच राजकारणातील व्यवहार सांभाळण्याचे कसब फार कमी स्वयंसेवक नेत्यांना जमते, आजच्या परिस्थितीत चंद्रकांतदादा त्याबाबत ‘अग्रेसर’ आहेत. ...

स्वत:च्या राहण्या-बोलण्यातून स्वयंसेवकत्व जपतानाच राजकारणातील व्यवहार सांभाळण्याचे कसब फार कमी स्वयंसेवक नेत्यांना जमते, आजच्या परिस्थितीत चंद्रकांतदादा त्याबाबत ‘अग्रेसर’ आहेत. सामान्य कार्यकर्त्यांशी त्यांनी नेहमीच नाळ जपली आहे. भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती ही तीन महिन्यांनी होणाऱ्या विधानसभा निवडणुका समोर ठेवून करण्यात आली आहे. केंद्रात राज्यमंत्री झाल्यानंतर रावसाहेब दानवे यांना प्रदेशाध्यक्षपद सोडावे लागणार हे अपेक्षितच होते.

दानवे यांची कारकिर्द यशस्वी ठरली, असेच म्हणावे लागेल. गेल्या पावणेपाच वर्षांत ग्रामपंचायतींपासून लोकसभेपर्यंत भाजपला जे दमदार यश राज्यात मिळाले, त्याचे श्रेय नि:संशय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जात असले, तरी त्यास पक्षसंघटनेची उत्तम साथ देण्याचे काम दानवे यांनी केले. आता त्यांच्या जागी चंद्रकांत पाटील आले आहेत. दोघेही भिन्न प्रवृत्तीचे नेते आहेत. दानवे यांनी वागण्या-बोलण्यातील रांगडेपण हे नीती म्हणून स्वीकारल्याचे जाणवायचे, तर चंद्रकांतदादा यांनी वागण्या-राहण्यातील साधेपणा हे नीती म्हणून स्वीकारल्याचे दिसते. चंद्रकांतदादा दिसतात, तितके साधे नक्कीच नाहीत. ‘हे मुख्यमंत्री सहा महिन्यांच्या वर टिकणार नाहीत,’ असे छातीठोकपणे सांगणाऱ्यांना देवेंद्र फडणवीस यांनी चारीमुंड्या चित तर केलेच, पण ‘मी पुन्हा येईन महाराष्ट्राच्या नवनिर्मितीसाठी’ असा निर्धारही त्यांनी बोलून दाखविला. त्याचप्रमाणे, ‘मागच्या दाराने आलेल्या स्वयंसेवक चंद्रकांत पाटलांना राजकारणातलं काय कळतं’ असे हिणवणाºयांच्या गडांना हादरे देण्याचे काम चंद्रकांतदादांनी पश्चिम महाराष्ट्रात करून दाखविले. हिणवणारे हे लोक राजकारणाची मक्तेदारी असलेले घराणेशहा आहेत. त्यांना चंद्रकांतदादांनी धडकी भरविली. भाजप ज्या ठिकाणी तिसºया, चवथ्या क्रमांकावर असायचा, त्या पश्चिम महाराष्ट्रात क्रमांक एकवर आणण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका आहे. त्यांचा पिंड संघ स्वयंसेवकाचा आहे, पण हे स्वयंसेवकत्व जपताना राजकारणातील व्यवहारही ते तितकाच उत्तम साधतात.

‘चंद्रकांतदादांच्या दरवाजातून कोणीही विन्मुख जात नाही,’ असे कौतुक स्वत: मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत केले होते. राजकारण हे राजकारणाच्याच अंगाने खेळायचे असते आणि ते खेळताना स्वयंसेवकामधील बुजरेपणा, नीतीनियम बाजूला ठेवायचे असतात, हे तंत्र साधण्यात दादा ‘अग्रेसर’ आहेत. राजकारणात साम-दाम-दंड-भेद वापरताना स्वत:वर ‘बिघडलेला स्वयंसेवक’ं अशी टीकाही ओढावून घेता कामा नये, याचे अचूक भान त्यांना असते. भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांचे ते निकटवर्ती आहेत. संघ आणि संघ परिवारातील संघटनांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. अनेकांना माहिती नसेल, पण दादा कोणत्याही गाव-शहरात गेले की, तेथील विद्यार्थी परिषदेच्या जुन्या कार्यकर्त्याकडे जाऊन जेवतात, त्यांची विचारपूस करतात आणि त्यांना काय हवे-नको तेही बघतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांचे अत्यंत स्रेहाचे आणि विश्वासाचे संबंध आहेत. ‘तुम्ही म्हणताय ते मला पटतंय, पण मला एकदा याबाबत मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करावी लागेल,’ असे धोरणात्मक निर्णयचा विषय आला की ते हमखास सांगतात. राज्यात क्रमांक दोनचे मंत्री होताना त्यांना असा संयम कामी आला आहे. मुख्यमंत्र्यांना परोक्ष वा अपरोक्ष आव्हान देण्याची भाषा ते कधीही करत नाहीत. आता ते प्रदेशाध्यक्ष झाल्याने आगामी निवडणुकीचा सर्वार्थाने भार एकट्या मुख्यमंत्र्यांवर पडणार नाही.
पक्षसंघटना आणि सरकार यांचा जबरदस्त मेळ असणे, हे निवडणुकीतील यशासाठी आवश्यक असते. तो मेळ फडणवीस-पाटील जोडगोळीमुळे शक्य होणार असल्याने, भाजपच्या दृष्टीने चंद्रकांतदादांची नियुक्ती योग्य अशीच आहे. मुंबई भाजपचे अध्यक्षपद पाचव्यांदा आमदार असलेले मंगलप्रभात लोढा यांना देऊन मंत्रिपदाने हुलकावणी दिलेल्या एका ज्येष्ठ नेत्याला पक्षाने थोडा का होईना, पण न्याय दिला आहे. त्यांच्या रूपाने पक्षाने एक आश्वासक हिंदी भाषिक चेहराही दिला आहे. त्यांचा स्वभाव सौम्य असला, तरी पक्षासाठी झोकून काम करण्याची त्यांची पद्धत सर्वांनाच ज्ञात आहे़ मंगलप्रभात लोढा यांचे शिवसेनेसोबतही चांगले संबंध आहेत़

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस