- संजीव साबडे (समूह वृत्त समन्वयक)कोणाचेही निधन दु:खदायकच असते. पण काहींच्या निधनामुळे सारा समाजच हळहळतो आणि शोक व्यक्त करतो. स्त्रीवादी चळवळीसाठी पाच दशकांहून अधिक काळ शांतपणे काम करणाºया विद्या बाळ यांच्या निधनामुळेही साºया समाजालाच दु:ख झाले आहे. विद्यातार्इंनी कधी स्त्रीमुक्ती चळवळीचा आक्रमक झेंडा हाती घेतला नाही, पण त्या महिलांना पुरुषांप्रमाणे समान हक्क मिळावेत, यासाठी विविध माध्यमांद्वारे प्रयत्न करीत राहिल्या. त्या मूळच्या लेखिका असल्या तरी त्यांच्या लिखाणातूनही स्त्रिया, त्यांचे प्रश्न आणि भोगाव्या लागणाºया यातना दिसत असत.त्यांनी सुरू केलेले ‘मिळून सा-याजणी’ हे मासिक तर अतिशय लोकप्रिय होते. केवळ महिलाच नव्हे, तर पुरुषही अतिशय तन्मयतेने ते मासिक आणि एकूणच विद्यातार्इंचे लिखाण वाचत. विद्यातार्इंची स्त्रीवादी चळवळ ही समान हक्कांसाठी असली तरी त्यात पुरुषांचा दु:स्वास कधीच नव्हता. किंबहुना पुरुषांना सोबत घेऊ नच आणि त्यांना बाजू समजावूनच स्त्रियांना समान अधिकार मिळवून देणे शक्य होईल, अशी त्यांची भूमिका होती आणि ती त्या ठामपणे मांडत. त्यामुळे स्त्रीमुक्ती चळवळीचा आक्रमक झेंडा हाती घेतलेल्या काही महिला नेत्या त्यांच्यापासून काहीशा दूर राहिल्या. पण त्याचा एक फायदा झाला आणि तो म्हणजे कोणत्याही चळवळीत वा आंदोलनात नसलेल्या महिलांना आपल्यासोबत घेणे विद्यातार्इंना शक्य झाले.महाराष्ट्रात एक काळ नियतकालिकांचा होता. तेव्हा खूप मराठी नियतकालिके निघत आणि वाचली जात. त्या काळातच किर्लोस्कर, स्त्री व मनोहर ही नियतकालिकेही अत्यंत लोकप्रिय होती. त्यापैकी स्त्री मासिकाच्या विद्याताई संपादकही होत्या. पुढे नियतकालिकांपेक्षा टीव्हीला अधिक महत्त्व आले आणि आर्थिक गणित जमत नसल्याने नियतकालिके बंद पडू लागली. पण त्याच काळात विद्यातार्इंनी ‘मिळून साºयाजणी’ मासिक काढण्याचा निर्णय घेतला. त्या मासिकाचे अधिकाधिक सदस्य व्हावेत, यासाठी त्यांनी त्या काळात खूप प्रयत्न केले. एकीकडे मध्यमवर्गीय महिला आणि दुसरीकडे मोलमजुरी करणाºया, तसेच ग्रामीण भागांतील स्त्रिया यांना एकमेकांशी जोडण्याचा यशस्वी प्रयोग विद्यातार्इंनी या मासिकाद्वारे केला.
झेंडा हातात न घेता स्त्रीमुक्तीसाठी झटणाऱ्या विद्याताई बाळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2020 05:52 IST