शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
3
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
4
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
5
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
6
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
7
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
8
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
9
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
10
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
11
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
12
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
13
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
14
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
15
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
16
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले
17
आंध्र प्रदेशातील बस अपघातातील चालकाला अटक, आग लागल्यानंतर प्रवाशांना सोडून पळून गेला होता
18
पॅरिसमधील संग्रहालयात ‘धूम’स्टाईल चोरी, मौल्यवान रत्ने लांबवली, अखेर असे सापडले चोर  
19
"मी दर महिन्याला एक युद्ध थांबवतो; आता पाकिस्तान-अफगाणिस्तान...," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
20
‘मद्यपान करून गाडी चालवणारे दहशतवादीच’, कुरनूल बस अपघातानंतर हैदराबादच्या पोलीस आयुक्तांचं परखड विधान

झेंडा हातात न घेता स्त्रीमुक्तीसाठी झटणाऱ्या विद्याताई बाळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2020 05:52 IST

एकीकडे लिखाणाच्या माध्यमातून, तर दुसरीकडे प्रत्यक्ष संघटना स्थापन करून विद्याताई स्त्रीवादी चळवळीसाठी सतत प्रयत्न करीत होत्या.

- संजीव साबडे (समूह वृत्त समन्वयक)कोणाचेही निधन दु:खदायकच असते. पण काहींच्या निधनामुळे सारा समाजच हळहळतो आणि शोक व्यक्त करतो. स्त्रीवादी चळवळीसाठी पाच दशकांहून अधिक काळ शांतपणे काम करणाºया विद्या बाळ यांच्या निधनामुळेही साºया समाजालाच दु:ख झाले आहे. विद्यातार्इंनी कधी स्त्रीमुक्ती चळवळीचा आक्रमक झेंडा हाती घेतला नाही, पण त्या महिलांना पुरुषांप्रमाणे समान हक्क मिळावेत, यासाठी विविध माध्यमांद्वारे प्रयत्न करीत राहिल्या. त्या मूळच्या लेखिका असल्या तरी त्यांच्या लिखाणातूनही स्त्रिया, त्यांचे प्रश्न आणि भोगाव्या लागणाºया यातना दिसत असत.त्यांनी सुरू केलेले ‘मिळून सा-याजणी’ हे मासिक तर अतिशय लोकप्रिय होते. केवळ महिलाच नव्हे, तर पुरुषही अतिशय तन्मयतेने ते मासिक आणि एकूणच विद्यातार्इंचे लिखाण वाचत. विद्यातार्इंची स्त्रीवादी चळवळ ही समान हक्कांसाठी असली तरी त्यात पुरुषांचा दु:स्वास कधीच नव्हता. किंबहुना पुरुषांना सोबत घेऊ नच आणि त्यांना बाजू समजावूनच स्त्रियांना समान अधिकार मिळवून देणे शक्य होईल, अशी त्यांची भूमिका होती आणि ती त्या ठामपणे मांडत. त्यामुळे स्त्रीमुक्ती चळवळीचा आक्रमक झेंडा हाती घेतलेल्या काही महिला नेत्या त्यांच्यापासून काहीशा दूर राहिल्या. पण त्याचा एक फायदा झाला आणि तो म्हणजे कोणत्याही चळवळीत वा आंदोलनात नसलेल्या महिलांना आपल्यासोबत घेणे विद्यातार्इंना शक्य झाले.महाराष्ट्रात एक काळ नियतकालिकांचा होता. तेव्हा खूप मराठी नियतकालिके निघत आणि वाचली जात. त्या काळातच किर्लोस्कर, स्त्री व मनोहर ही नियतकालिकेही अत्यंत लोकप्रिय होती. त्यापैकी स्त्री मासिकाच्या विद्याताई संपादकही होत्या. पुढे नियतकालिकांपेक्षा टीव्हीला अधिक महत्त्व आले आणि आर्थिक गणित जमत नसल्याने नियतकालिके बंद पडू लागली. पण त्याच काळात विद्यातार्इंनी ‘मिळून साºयाजणी’ मासिक काढण्याचा निर्णय घेतला. त्या मासिकाचे अधिकाधिक सदस्य व्हावेत, यासाठी त्यांनी त्या काळात खूप प्रयत्न केले. एकीकडे मध्यमवर्गीय महिला आणि दुसरीकडे मोलमजुरी करणाºया, तसेच ग्रामीण भागांतील स्त्रिया यांना एकमेकांशी जोडण्याचा यशस्वी प्रयोग विद्यातार्इंनी या मासिकाद्वारे केला.

एकीकडे लिखाणाच्या माध्यमातून, तर दुसरीकडे प्रत्यक्ष संघटना स्थापन करून विद्याताई स्त्रीवादी चळवळीसाठी सतत प्रयत्न करीत होत्या. त्यांनी ‘नारी समता मंच’ ही संघटना स्थापन केली. अशिक्षित महिलांपर्यंत पोहोचण्यासाठी अशी संघटना गरजेची आहे, हे त्यांनी हेरले होते. त्यामुळे या संघटनेद्वारे त्या अनेक गावांमध्ये पोहोचू शकल्या. पण केवळ संघटना गावांमध्ये पोहोचून उपयोग नाही, प्रत्यक्ष महिलांनीही बोलायला हवे, आपला त्रास, जाच बोलून दाखवायला हवा, असे त्यांचे म्हणणे होते. त्यातूनच विद्यातार्इंनी ‘बोलते व्हा’ची स्थापना केली. त्याद्वारे अनेक महिला खरोखरच बोलत्या झाल्या. विद्याताई काही काळ आकाशवाणीवरही काम करीत होत्या. त्यांचे वक्तृत्व उत्तमच होते. पण वक्तृत्व उत्तम असण्यापेक्षा आपले म्हणणे लोकांपर्यंत पोहोचणे अधिक महत्त्वाचे आहे, या विचारातूनच त्यांनी भाषणशैली बदलली. त्यामुळे विद्यातार्इंचे भाषण एकतर्फी होत नसे. समोरच्या प्रेक्षकांशी, महिलांशी त्या भाषणातून संवाद साधत.आपल्या चळवळीत पुरुषांना जोडून घेण्यासाठी त्यांनी २००८ साली पुरुष संवाद केंद्राची स्थापना केली. आपल्या चळवळीविषयी पुरुषांना काय वाटते, त्यांचे काय म्हणणे व प्रश्न आहेत, हे समजून घेण्याबरोबरच स्त्रीवादी चळवळीविषयीचे गैरसमज दूर करण्यावर त्यांनी भर दिला. पुण्यातील मंजुश्री सारडा या महिलेची तिचा नवरा व सासºयाने हुंड्यासाठी विष देऊ न हत्या केल्याचे प्रकरण खूप गाजले होते. अशी अनेक प्रकरणे आजही पाहायला मिळतात. त्यामुळे विद्यातार्इंनी ‘मी एक मंजुश्री’ प्रदर्शन गावागावांत नेले.विद्यातार्इंचा सारा प्रवास गमतीदार होता. जनसंघाचे नेते रामभाऊ म्हाळगी यांच्या आग्रहास्तव त्यांनी १९७४ मध्ये महापालिकेची निवडणूक लढवली. त्यात त्यांचा पराभव झाला. पण त्या पक्षाचा विचारही विद्यातार्इंना मानवला नसावा. लगेचच १९७५ साल हे आंतरराष्ट्रीय महिला वर्ष म्हणून जाहीर झाले. त्यानिमित्ताने महिलांच्या कामात स्वत:ला गुंतवून टाकणाºया विद्याताई पुढे कोणत्याही पक्षात गेल्या नाहीत. पण त्या प्रकारचे कार्य करणाºया मृणाल गोरे, अहिल्या रांगणेकर, प्रमिला दंडवते या डाव्या विचारांच्या नेत्यांशी त्यांची प्रत्यक्ष व राजकीय जवळीक झाली. ती त्यांच्या चळवळीसाठी उपयोगाचीच ठरली.

टॅग्स :Vidya Balविद्या बाळ