शहरं
Join us  
Trending Stories
1
"नॉन-व्हेज खाणारे वाईट आहेत, असं मी म्हणत नाही, पण..."; पंतप्रधान मोदी संसदेत नेमकं काय बोलले?
2
“मोदी सरकार काय लपवायचा प्रयत्न करत आहे?”; SIR वरून काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेंचा सवाल
3
याला म्हणतात 'इंटरनॅशनल बेइज्जती'! रशियन तरुणींना कोणत्या देशाचे तरुण सर्वाधिक आवडतात? पाकिस्तानी ब्लॉगरचा VIDEO पाहून हसू आवरणार नाही!
4
VIDEO : रोहित-गंभीर यांच्यात वाद? ड्रेसिंग रुममधील व्हायरल व्हिडिओमुळे रंगली चर्चा
5
SIR वरुन पश्चिम बंगालमध्ये तणाव वाढला; कोलकात्यात शेकडो BLO चे तीव्र आंदोलन...
6
“CM असताना अडीच तासांपेक्षा जास्त कधी झोपलो नाही, विरोधकांची झोप उडवली”: एकनाथ शिंदे
7
संसदेच्या हिवाळी अधिवेशनात 'वंदे मातरम्'वर 10 तास चर्चा; PM मोदी सहभागी होणार...
8
“आमच्याकडे झालेल्या निवडणुका सर्वांत निष्पक्ष होत्या”; राहुल गांधींना मित्र पक्षाचा घरचा अहेर
9
तीन स्मार्ट मैत्रिणी अन् महिन्याला लाखोंची कमाई ! ब्रम्होसची माहिती देत पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या निशांतला केवळ तीन वर्षांची शिक्षा
10
लैंगिक शोषणाच्या तक्रारींची भिती दाखवणाऱ्या प्राध्यापकाला इतकी सौम्य शिक्षा कशी? चार प्राध्यापकांची केली होती फसवणूक
11
IND vs SA: रोहित शर्मासोबत एअरपोर्टवर नेमकं काय घडलं? विराट कोहलीही टक लावून बघतच बसला...
12
डिजिटल अरेस्टवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; देशभरातील सर्व प्रकरणे CBI कडे सोपवली
13
“आयोगाने पारदर्शी, प्रामाणिकपणे...”; निवडणुका स्थगित होताच असीम सरोदेंनी केली मोठी मागणी
14
पोर्टेबल लॅब, टॉयलेट, पाणी, अदृश्य सेना...; कुठल्याही देशात जाताना काय काय सोबत घेऊन फिरतात पुतिन?
15
Video: Kiss घेण्याचा मोह...; प्रेमी जोडप्याचे मालगाडी खाली बसून 'नको ते' चाळे अन् अचानक... 
16
हृदयद्रावक! शेतीसाठी घेतलं १५ लाखांचं कर्ज पण पुराने पीक उद्ध्वस्त, शेतकऱ्याने मृत्यूला कवटाळलं
17
Travel : मुंबईजवळची 'ही' ठिकाणं पाहिल्यावर गोवाही विसराल! न्यू इअर सेलिब्रेशनसाठी बेस्ट रोमँटिक डेस्टिनेशन्स
18
मामला 'गंभीर' है...! वारंवार बोलावूनही विजयाच्या जल्लोषात सहभागी झाला नाही कोहली, नेमकं घडलं काय? बघा Video
19
“मीरा-भाईंदर मेट्रोचे डोंगरी कारशेड रद्द, लवकर अधिसूचना”; प्रताप सरनाईक यांनी दिली माहिती
20
दत्त जयंती २०२५: तुम्ही ‘श्रीदत्त अथर्वशीर्ष’ म्हणता का? कायमची कृपा होते; पुण्य लाभते!
Daily Top 2Weekly Top 5

एटीएम कार्ड वापरणे झाले महाग, कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2025 07:19 IST

आर्थिक व्यवहार अधिकृत पद्धतीने व्हावेत आणि रोकड रकमेतल्या अनधिकृत व्यवहारांना आळा बसावा, या दिशेने टाकलेले हे आणखी एक पाऊल आहे.

- दिलीप फडके, ग्राहक हक्क चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते

भारतीय रिझर्व्ह बँकेने १ मेपासून एटीएम कार्डच्या वापराबद्दल काही नवे नियम अंमलात आणले आहेत. वरवर पाहता या नव्या नियमांमुळे बँक ग्राहकांना एटीएम कार्डचा वापर करताना अधिक शुल्क द्यावे लागणार आहे असे दिसत असले तरी या बदलाचे स्वरुप तेवढ्यापुरतेच मर्यादित आहे, असे मानता येणार नाही. असा बदल करताना रिझर्व्ह बँक आणि शासनाच्या विचारांची दिशा स्पष्ट दिसते आहे, असेच म्हणावे लागते.

आता बँक ग्राहकांना स्वतःच्या बँकेच्या एटीएमवर दरमहा वित्तीय आणि बिगरवित्तीय व्यवहारांसह पाच व्यवहार मोफत करता येतील. महानगरांमध्ये इतर बँकांच्या एटीएमवर दरमहा तीन मोफत व्यवहार करता येतील. मेट्रो नसलेल्या शहरांमध्ये इतर बँकांच्या एटीएमवर दरमहा पाच मोफत व्यवहार करता येतील. या मोफत व्यवहारांच्या नंतर होणाऱ्या एटीएम कार्डच्या व्यवहारांवर वेगळे शुल्क लागणार आहे. अर्थात, असे शुल्क याअगोदरदेखील लागत असे. पण, आता ते वाढले आहे. आता अशा वाढीव प्रत्येक वापरासाठी २३ रुपये इतका आकार द्यावा लागणार आहे. अर्थात प्रत्येक बँकेने यासंदर्भात स्वत:ची काहीशी वेगळी शुल्करचना केलेली आहे. तथापि, त्यात फारसा मूलभूत स्वरुपाचा फरक नाही.

१ मे २०२५ पासून भारतीय रिझर्व्ह बँकेने  एटीएम इंटरचेंज फीमध्ये वाढ केली आहे. या बदलामुळे ग्राहकांच्या एटीएम वापरावर थेट परिणाम होणार आहे. एटीएम इंटरचेंज फी म्हणजे, एटीएम वापरणाऱ्या ग्राहकाच्या बँकेला (इशुअर बँक) दुसऱ्या बँकेच्या एटीएमचा वापर केल्याबद्दल दुसऱ्या बँकेला (अक्वायरर बँक) दिलेली फी. ही फी बँक ग्राहकांकडून थेट वसूल करत नाही. परंतु, ती बँकांच्या ऑपरेशनल खर्चाचा भाग समजली जाते. ग्राहकाने दुसऱ्या बँकेच्या एटीएम कार्डचा वापर करून पैसे काढले, म्हणजेच खाते एका बँकेत आहे, परंतु दुसऱ्या बँकेच्या एटीएममधून पैसे काढले तर ग्राहकांना तीन व्यवहारांनंतर स्वतंत्र पैसे द्यावे लागू शकतात. मेट्रो शहरात दर महिन्याला दुसऱ्या बँकेच्या एटीएममधून ३ व्यवहार मोफत केले जाऊ शकतील. महानगराबाहेरील शहरात दुसऱ्या बँकेच्या एटीएममधून पाच वेळा व्यवहार करता येतील.

या बदलामुळे बँकेचे एटीएम कार्ड वापरणे काहीसे महाग होणार असल्याने ग्राहकांना अधिक जागरुकतेने एटीएम कार्डचा वापर करावा लागणार आहे. ग्राहकांना त्यांच्या मोफत व्यवहारांची माहिती ठेवावी लागेल. डिजिटल व्यवहारांमध्ये अतिरिक्त शुल्क नसते. नियम बदलामुळे ग्राहकांना बँकेतून जास्त वेळा रोख रक्कम काढण्याऐवजी यूपीआय, नेट बँकिंग किंवा कार्ड पेमेंटकडे वळण्याची प्रेरणा मिळू शकते. हे अधिक सुरक्षित आणि ट्रॅक करण्यास सोपे आहे.  

ग्रामीण, आर्थिकदृष्ट्या दुर्बल व ज्येष्ठ नागरिकांसाठी नवे नियम काहीसे जाचक ठरू शकतात. अशा खातेदारांसाठी एटीएम कार्डच्या मोफत वापरांची संख्या वाढवली आणि यासाठी सवलतीच्या विशेष योजना लागू केल्या तर या बदलांचा जाच काहीसा कमी होऊ शकेल. जसे जनधन खातेधारक, वृद्ध नागरिक, दिव्यांग व सरकारी योजनांच्या लाभार्थ्यांसाठी पूर्णपणे शुल्कमुक्त किंवा कमी दरात एटीएम सेवा उपलब्ध करून देण्याचा विचार करणे आवश्यक आहे. डिजिटल पेमेंटमध्ये वाढ होण्यासाठी गावपातळीवर प्रशिक्षण मोहिमा राबविल्या जाणे आवश्यक आहे. ग्रामीण भागात पोस्ट ऑफिसचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो. त्यामुळे पोस्ट ऑफिस एटीएमच्या वापरावर अतिरिक्त सवलत दिल्यास ग्राहकांना सहज सेवा मिळू शकते.

१ मेपासून एटीएम कार्ड वापराबद्दलचे नवे नियम म्हणजे देशातले आर्थिक व्यवहार अधिकाधिक औपचारिक किंवा अधिकृत पद्धतीने व्हावेत आणि रोकड रकमेत होणारे अनधिकृत व्यवहार कमीतकमी व्हावेत, या दिशेने शासन व रिझर्व्ह बँक यांनी टाकलेले आणखी एक पाऊल आहे, असे म्हणता येईल.     pdilip_nsk@yahoo.com

टॅग्स :atmएटीएमbankबँक