शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

अविश्वासाचे वातावरण घातक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2018 21:49 IST

केरळमधील पूरग्रस्तांना मदतीसाठी राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांचा एक दिवसाचा पगार देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. मानवीय दृष्टीकोनातून हा निर्णय घेतला आहे.

मिलिंद कुलकर्णीकेरळमधील पूरग्रस्तांना मदतीसाठी राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांचा एक दिवसाचा पगार देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. मानवीय दृष्टीकोनातून हा निर्णय घेतला आहे. परदु:ख आपले मानण्याची भारतीय संस्कृती आहे. आमच्या संतांनी, महापुरुषांनी हाच विचार समाजात रुजविण्यासाठी प्रयत्न केले आहेत. परंतु या मदतीसाठी एक दिवसाचा पगार देण्यास नकार देण्याची भूमिका जळगाव जिल्ह्यातील जामनेर आणि अमळनेर येथील कर्मचाºयांनी घेतली आहे. सरकारी कर्मचाºयांची ही भूमिका धक्कादायक आणि आश्चर्यजनक आहे. संपूर्ण जगातून पूरग्रस्तांसाठी मदतीचा ओघ सुरु असताना आपलेच देशबांधव नकाराची भूमिका घेत असतील, तर ते दुर्देवी आहे. पण अधिक तपशीलात गेले तर त्या कर्मचाºयांची त्या मागील भूमिका लक्षात घ्यायला हवी. एका मागणीसाठी त्यांनी ही टोकाची भूमिका घेतली आहे. २००५ नंतर शासकीय सेवेत रुजू झालेल्या कर्मचाºयांना १९८२-८४ ची जुनी पेन्शन योजना नाकारुन त्याऐवजी नवीन अंशदायी पेन्शन योजना (डीसीपीएस) लागू केली आहे. नवीन पेन्शन योजना कर्मचाºयांच्या फायद्याची नाही; जुनीच लागू करा, अशी त्यांची गेल्या पाच वर्षांपासून मागणी आहे. वेगवेगळी आंदोलने करुनही राज्य सरकार दखल घेत नसल्याने त्यांनी हा पवित्रा घेतला आहे. जुनी पेन्शन हक्क संघटना स्थापन केली असून त्यामाध्यमातून आंदोलने केली जात आहे. केरळ पूरग्रस्तांना मदतीला आमचा विरोध नाही; मदतनिधी महाराष्टÑ सरकारला देण्याऐवजी आम्ही थेट केरळच्या मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करु, अशी भूमिका त्यांनी जाहीर केली आहे. ही भूमिका घेण्यासाठी त्यांनी दोन कारणे नमूद केली आहेत. पहिले कारण म्हणजे, राज्यातील १७ लाख कर्मचाºयांकडून एक दिवसाचा पगार म्हणजे सुमारे २५० कोटी रुपये होतात. आणि सरकार यातून केवळ २५ कोटी रुपये केरळला देतील, उर्वरित रकमेचा हिशोब सरकार देईल काय? हा अविश्वास का वाटतो, यासाठी त्यांनी दुसरे कारण स्पष्ट केले आहे. काही महिन्यांपूर्वी दुष्काळी निधी, शेतकरी कर्जमाफीसाठी म्हणून पगार कपात झाली होती. आम्ही शेतकºयांची मुले असल्याने या कपातीला विरोध केला नाही. परंतु वास्तव असे आहे की, ज्या कारणासाठी ही कपात केली गेली, त्या शेतकºयांपैकी १० टक्के शेतकºयांनाही या कर्जमाफीचा लाभ झालेला नाही. सरकार पगार कपात करते परंतु त्याकारणासाठी खर्च करीत नाही, हा अनुभव असल्याने केरळ पूरग्रस्त निधीसाठी आमचा नकार आहे, अशी संघटनेची भूमिका आहे. संघटनेचे पदाधिकारी तालुका पातळीवर पंचायत समिती कार्यालयात निवेदने देत आहेत. मात्र त्यांची भूमिका समजून घेणे, सरकारची बाजू जोरकसपणे मांडणे अशा गोष्टी होताना दिसत नाही. पूरग्रस्तांना मदतीस नकार असा संदेश समाजात झपाट्याने जातो, पण त्यांची भूमिका पोहोचत नाही. यापूर्वी शेतकरी संपाविषयी असेच झाले होते. दूध रस्त्यावर ओतण्याच्या निर्णयावर समाजातून टीका झाली. परंतु असे आंदोलन करताना शेतकºयाला आनंद होत असेल काय, हा विचार कुणी केला नाही. शेतकरी अशी टोकाची भूमिका घ्यायला बाध्य होण्यासारखी परिस्थिती नेमकी काय आहे? ती दूर कशी करता येईल, याचा विचार होत नाही. सरकार आणि कर्मचारी, सरकार आणि शेतकरी शेतकरी, सरकार आणि समाजघटक असे आमने-सामने येऊन अविश्वासाचे वातावरण तयार होणे निकोप लोकशाही आणि राज्य व्यवस्थेच्या दृष्टीने घातक आहे. दोघांनीही सामंजस्याची भूमिका घेतली तर असे प्रसंग टाळता येऊ शकतात. समाजातील कोणत्याही घटकाने टोकाची भूमिका घेईपर्यंत सरकार आणि प्रशासनाने वेळकाढूपणा करु नये. संवेदनशीलतेने प्रश्न समजून घ्यावा, निराकरणासाठी पारदर्शकपध्दतीने कार्यवाही करायला हवी.

टॅग्स :Kerala Floodsकेरळ पूरJalgaonजळगाव