शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
3
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
4
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
5
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
6
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
7
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
8
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
9
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
10
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
11
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
12
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
13
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
14
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
15
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
16
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
17
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
18
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
19
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
20
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत

आजचा अग्रलेख: स्वयंघोषित देशभक्तांच्या डोळ्यात झणझणीत अंजन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2022 16:59 IST

Today's Editoril: भारतात नुकत्याच जाहीर झालेल्या पाचव्या राष्ट्रीय आरोग्य सर्वेक्षणाच्या अहवालातूनही तीच वस्तुस्थिती अधोरेखित झाली. भारतातील सर्वच धर्मातील स्त्रिया आता पूर्वीच्या तुलनेत कमी बालकांना जन्म देत असल्याचे या अहवालावरून स्पष्ट झाले आहे.

मुले ही देवाने दिलेली भेट आहे, अशी बहुतांश धर्मांची मान्यता आहे. प्रत्यक्ष देवाने दिलेल्या भेटीला नाही कसे म्हणायचे? त्यामुळे होतील तेवढी मुले होऊ देण्याची रूढी जगाच्या सर्वच भागांमध्ये अगदी गत शतकापर्यंत चालत आली होती. पुढे विज्ञानाचा विकास आणि आधुनिक शिक्षणाचा प्रसार वाढत गेला तशी जागृती निर्माण होत गेली आणि जगाच्या काही भागांमध्ये लोकसंख्या वाढीवर आपोआप नियंत्रण येत गेले. विशेषतः अमेरिका व युरोपातील सुखवस्तू देशांमध्ये ही प्रक्रिया जास्त वेगाने झाली. तुलनेत आशिया आणि आफ्रिका खंडातील गरीब देशांमध्ये मात्र अद्यापही जन्मदर जास्त आहे. अर्थात शिक्षणाचा प्रसार आणि समृद्धीच्या आगमनासोबत त्या देशांमध्येही जन्मदर घटताना दिसत आहे. भारतात नुकत्याच जाहीर झालेल्या पाचव्या राष्ट्रीय आरोग्य सर्वेक्षणाच्या अहवालातूनही तीच वस्तुस्थिती अधोरेखित झाली. भारतातील सर्वच धर्मातील स्त्रिया आता पूर्वीच्या तुलनेत कमी बालकांना जन्म देत असल्याचे या अहवालावरून स्पष्ट झाले आहे.

काही देशांनी लोकसंख्या नियंत्रणासाठी कुटुंब नियोजन कार्यक्रमही राबविले. समस्त भारतीयांसाठी अभिमानाची बाब म्हणजे जगातील पहिला कुटुंब नियोजन कार्यक्रम भारताने १९५२ मध्ये सुरू केला. पुढे चीनने बलपूर्वक कुटुंब नियोजन कार्यक्रम राबवीत `एक कुटुंब, एक मूल’ धोरण स्वीकारले. काळ जसा पुढे सरकला तसे त्याचे दुष्परिणामही समोर आले. भारताने मात्र नागरिकांवर कोणतीही जोर-जबरदस्ती न करता एकूण प्रजनन दर दोनवर आणण्यात यश प्राप्त केले आहे. चवथ्या राष्ट्रीय आरोग्य सर्वेक्षण अहवालानुसार तो दर २.२ एवढा होता. प्रजनन दरात सातत्याने होत असलेली घट हे येत्या काही दशकात लोकसंख्या स्थिर होण्याचे सुचिन्ह आहे. देशातील प्रत्येक समस्येसाठी, विशेषतः मोठ्या प्रमाणावरील गरिबी आणि कमकुवत पायाभूत सुविधांसाठी, वाढत्या लोकसंख्येकडे बोट दाखविण्याचा परिपाठ रूढ झाला आहे. ते बऱ्याच बाबतीत सत्यही आहे; परंतु त्याचा लाभ घेत, विशिष्ट धर्माच्या लोकांवर लोकसंख्या वाढीसाठी शरसंधान साधण्याचा, त्यांच्या देशनिष्ठेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचा गोरखधंदा, काही स्वयंघोषित देशभक्तांनी सुरू केला आहे. अशांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालण्याचे काम पाचव्या राष्ट्रीय आरोग्य सर्वेक्षणाच्या अहवालाने केले आहे, कारण सदर अहवालानुसार सर्वच धर्मांचा प्रजनन दर घटला आहे. एका धर्माचा प्रजनन दर घटला आणि दुसऱ्या एखाद्या धर्माचा प्रजनन दर वाढला, असे अजिबात घडलेले नाही. उलट ज्यांच्याकडे लोकसंख्या वाढीच्या दृष्टीने सतत संशयाच्या नजरेने बघितले जाते, त्या मुस्लिमांमधील प्रजनन दर घट देशात सर्वाधिक आहे! मुस्लिमांचा प्रजनन दर देशाच्या प्रजनन दरापेक्षा नेहमीच अधिक होता आणि आजही तसा तो आहेच; पण चवथ्या व पाचव्या राष्ट्रीय आरोग्य सर्वेक्षणांदरम्यान झालेली प्रजनन दरातील घट मुस्लिमांमध्ये सर्वाधिक म्हणजे ९.९ टक्के एवढी आहे! ही घट यापुढेही अशीच कायम राहिल्यास, लवकरच लोकसंख्येतील मुस्लिम समुदायाची टक्केवारी स्थिर होईल.

मुस्लिम समुदाय एक दिवस बहुसंख्याक होईल आणि भारताचे इस्लामीकरण होईल, ही काही घटकांकडून निर्माण केली जात असलेली भीती अनाठायी व निराधार असल्याचे दाखवून देण्याचे कामच, पाचव्या राष्ट्रीय आरोग्य सर्वेक्षणाच्या अहवालाने केले आहे. अधिक जन्मदराचा संबंध धर्माशी नव्हे, तर शिक्षण आणि समृद्धीच्या अभावाशी असल्याचे तज्ज्ञांनी वेळोवेळी सांगितले आहे. पूर्वी मुस्लिम समुदायात आधुनिक शिक्षण घेण्याचे प्रमाण फार कमी होते. गरिबीचे प्रमाणही मोठे होते. गत काही काळात या समुदायातही आधुनिक शिक्षणाचे, उच्च शिक्षणाचे प्रमाण वाढले आहे. स्वाभाविकच गरिबीही घटू लागली आहे. त्याचेच प्रतिबिंब मुस्लिम प्रजनन दरातील घसरणीत उमटलेले दिसते. आज देशात जे मुस्लिम आहेत, त्यांनी फाळणीच्या वेळी भारतातच राहण्याचा पर्याय स्वीकारला होता. त्यांना या देशातच राहायचे आहे, या देशातच प्रगती करायची आहे. इतर समुदायांनी, विशेषतः बहुसंख्याक समुदायानेही, ही वस्तुस्थिती समजून घेण्याची गरज आहे. एकमेकांकडे सतत संशयाच्या नजरेने बघितल्याने ना कोणत्या समुदायाचे भले होईल, ना देशाचे! कुणालाही लोकसंख्या वाढवून या देशावर कब्जा करायचा नाही, हे आता सुस्पष्ट झाले आहे. तेव्हा तमाम भारतीयांनी सगळ्या शंका-कुशंकांना फाटा देऊन देशासाठी अग्रेसर होणे, यातच देशहित आहे. तीच खरी देशभक्ती आहे!

टॅग्स :Indiaभारत