शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
4
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
5
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
6
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
7
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
8
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
9
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
10
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
11
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
12
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
13
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
14
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
15
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
16
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
17
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
18
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
19
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
20
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ

ती २४ वर्षं... ही २४ वर्षं...; त्या मंतरलेल्या कालखंडाचे हे स्मरण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2021 08:57 IST

‘लोकमत’चे संस्थापक - संपादक, ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी जवाहरलाल दर्डा यांचा आज २४ वा स्मृतिदिन... त्या मंतरलेल्या कालखंडाचे हे स्मरण !

मधुकर भावे, लोकमतचे निवृत्त संपादक

बघता-बघता २४ वर्षं झाली. बाबूजींचा आज २४ वा स्मृतिदिन. बाबूजींच्या सोबत दिवस उगवल्यापासून दिवस मावळेपर्यंत - २४ वर्षे वावरलो. माणूस म्हणून बाबूजी किती मोठे आहेत, हे त्या २४ वर्षांतील प्रत्येक दिवशी अगदी सहजपणे समजत गेलं. हे मोठेपण त्यांनी कधी स्वत:हून सांगितलं नाही, त्यांनी मदत केलेली शेकडो माणसं समोर आहेत, त्यांच्यामुळे घरकुल मिळालेली कित्येक माणसं आहेत, त्यांच्यामुळे बॉम्बे हॉस्पिटलसारख्या दर्जेदार रुग्णालयात उपचार घेऊन बरे झालेले शेकड्यांनी आहेत. पण बाबूजींनी डाव्या हाताचं उजव्या हाताला कळू दिलं नाही.  बाबूजींचं हे मोठेपण अगदी शेवटच्या दिवसापर्यंत मी पाहिलं. प्रत्येकाला एक दिवस जायचं हे असतंच! मृत्यू हा महोत्सव आहे, असं विनोबा सांगत आणि बाबूजी त्याचाच उच्चार करत. मी ज्या २४ वर्षांत बाबूजींना पाहिलं, त्या २४ वर्षांत ‘लोकमत’चा वटवृक्ष झाला. त्याच्या पारंब्या महाराष्ट्रभर पसरल्या. बाबूजी मंत्री म्हणून सगळ्याच मुख्यमंत्र्यांना हवे होते. त्या काळात त्यांनी केलेल्या कामाची यादी इतकी मोठी आहे की, आज अशी कामं होत नाहीत. कार्यकर्त्यांच्या खांद्यावर कोणी हात टाकत नाही. पक्ष न बघता  मदत करण्याचा विषय तर आता सोडूनच द्या. बाबूजींनी ना कधी जातीचा विचार केला, ना कधी पक्षाचा विचार केला. त्यांनी फक्त कामाचा विचार केला. स्वातंत्र्य चळवळीत या माणसानं १८ महिने तुरुंगवास भोगला, त्याच स्वातंत्र्यसेनानीला विधानसभेत ‘स्वातंत्र्यसैनिक नसल्याबद्दल’ विखारी टीका सहन करावी लागली... स्वातंत्र्यासाठी तुरुंगात राहण्याच्या त्यागापेक्षाही ही जहरी टीका शांतपणे पचविण्यासाठी लागणारी स्थितप्रज्ञता फार मोठी असावी लागते, हे सोपं काम नाही. ‘समोरच्या बाकावरील ज्या मित्रांनी स्वातंत्र्य चळवळीत कसलाही भाग घेतलेला नाही, त्यांना मी १८ महिने तुरुंगवास भोगला, हे सांगण्याची मला गरज वाटत नाही’... बाबूजींच्या या एका वाक्याने सारं सभागृह अवाक् झालं आणि दुसऱ्या दिवशी चुकीच्या माहितीवरून बाबूजींवर आरोेप  केल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करायला हेच आमदार आले तेव्हा कालचा विषय विसरुन त्यांना हात धरुन नाश्ता करायला बसवणारे बाबूजी मी पाहिलेले आहेत.ज्यांनी टीका केली, ती माणसं लक्षात राहिली नाहीत; बाबूजींचा त्याग लक्षात राहिला.  ‘हे स्वातंत्र्य कोणाकरिता...’ - १९४७ सालच्या १५ ऑगस्टला ‘नवे जग’ या मासिकासाठी लिहिलेला पहिलाच अग्रलेख बाबूजींची मानसिकता सांगून गेला होता. त्याच बाबूजींनी १५ ऑगस्ट १९९७ला म्हणजेच स्वातंत्र्याला ५० वर्षे पूर्ण झाली, तेव्हा लिहिलेला अग्रलेख त्यांच्या सामाजिक उंचीची साक्ष देतो. दुर्दैवाने महाराष्ट्राला बाबूजींची सामाजिक, वैचारिक उंची पुरेशी समजली नाही आणि चिंतनशील प्रकृतीही उमजली नाही...आज बाबूजी नाहीत. तसे ते अकाली गेले. ७४ वर्षं  हे काही जाण्याचं वय नव्हे. या गोष्टी कोणाच्याच हातात नसतात, हेच खरं ! गेली २३ वर्षं दर २५ नोव्हेंबरला मी यवतमाळच्या प्रेरणास्थळावर  जातो. आज चोवीसावं वर्ष. या २४ वर्षांत समाधीस्थळावर, प्रेरणास्थळावर प्रत्येकवर्षी  चौफेर महाराष्ट्रातली माणसं आली. आदरांजली वाहून गेली. बाबूजींचं मोठेपण सांगून गेली.तत्कालीन उपराष्ट्रपती भैरवसिंह शेखावत, नारायणदत्त तिवारी, अशोक गेहलोत, नितीन गडकरी, मनोहर जोशी, सुधाकरराव नाइक, विलासराव देशमुख, देवेंद्र फडणवीस, अरुण गुजराथी, दिग्विजय सिंह, नरपत भंडारी, अजित जोगी, सुब्बारामी रेड्डी, आदी राजकीय नेते... गौतम सिंघानिया, नौदलप्रमुख विष्णू भागवत, विख्यात वैज्ञानिक रघुनाथराव माशेलकर, पत्रकार कुमार केतकर यांच्यासारखे मान्यवर आले... पंडित जसराज, पंडित हरिप्रसाद चौरसिया, पंडित राजन-साजन मिश्रा, उस्ताद राशिद खान, निलाद्रीकुमार,  पंडित विश्वमोहन भट यांच्यासारखे कलावंत आले. यावर्षी २०२१मध्ये महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल भगतसिंह कोश्यारी,  सदाप्रसन्न सुशीलकुमार शिंदे येत आहेत आणि त्यांच्यासोबत हजारो रुग्णांना केवळ आपल्या ‘दोन अंगठ्याच्या’ ऊर्जेने जीवनदान देणारे प्रख्यात धन्वंतरी डॉ. गोवर्धनलाल पाराशर येत आहेत...बाबूजींच्या सोबत गेलेली २४ वर्षं डोळ्यासमोर आहेत, जणू बाबूजीच समोर आहेत आणि ते गेल्यानंतरची ही २४ वर्षं... आयुष्याची ही ४८ वर्षं आगळीवेगळी आहेत.

टॅग्स :Freedom Fighter Jawaharlal Dardaस्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डाJawaharlal Dardaजवाहरलाल दर्डाLokmatलोकमत