शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: माजी मंत्री तानाजी सावंत यांचा बंगला पाण्याखाली; दोन-दोन टोयोटा फॉर्च्युनर पुरात बुडाल्या...
2
जीएसटीने आणखी अवघड केले...! पार्ले-जी बिस्कीट पुडा ५ रुपयांचा आता ४.४५ ला, १ रुपयाचे चॉकलेट ८८ पैशांना...
3
Gold Silver Price Today: आजही सोन्या-चांदीचे भाव नव्या विक्रमी पातळीवर; सोन्याच्या दरात प्रति तोळा ₹१,३४३ तर चांदी ₹१,१८१ ने महागली
4
...म्हणून डोंबिवलीत काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याला भाजपाच्या कार्यकर्त्यांनी नेसवली साडी, व्हिडीओ व्हायरल
5
"निरपराध लोकांची काय चूक होती? आम्ही निषेध करणार"; हवाई हल्ल्यात ३० जणांचा मृत्यू, पाकिस्तानमधील जनता संतापली
6
GST कपातीनंतर सरकारची आणखी एक गुड न्यूज! २५ लाख महिलांना मिळणार मोफत गॅस कनेक्शन
7
ओला दुष्काळ जाहीर करणार का? देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'त्याकरिता जेवढ्या पद्धतीची..."
8
"...ही चांगली गोष्ट नाही!"; राहुल गांधी यांच्या 'मत चोरी' संदर्भातील आरोपांवरून शरद पवार यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
9
Maharashtra Rain Alert: नवरात्रोत्सवात पावसाचाच 'गरबा', जाता जाता तडाखा देणार; IMD कडून सतर्कतेचा इशारा
10
Viral Video : घर नव्हे हा तर अजूबा! अवघ्या ५२ इंचांच्या दोन मजली घरात डोकावून बघाल, तर हादरून जाल!
11
उडणाऱ्या कारचा जगातील पहिलाच अपघात; दोन फ्लाइंग कार एकमेकांवर आदळल्या, एक बनली आगीचा गोळा...
12
बिहारमध्ये NDAचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, हा पक्ष लढवणार सर्वाधिक जागा
13
अतूट बंध! महागडे गिफ्टस नको तर 'या' ८ गोष्टींनी फुलवा नातं, आयुष्यभर राहा एकमेकांचे सोबती
14
Maharashtra Rain: संपूर्ण आठवडा पावसाचा, शुक्रवारनंतर मुसळधार पावसाची शक्यता, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र
15
नवरात्री २०२५: विनायक चतुर्थी कधी? व्रताचा संकल्प करा; गणपती पूजन ठरेल वरदान, कायम कृपा-लाभ!
16
USA Hanuman Statue: आता अमेरिकेचा हनुमानावरही आक्षेप; म्हणाले, 'खोट्या देवांची मूर्ती....'
17
Navratri 2025: नवरात्रीत लावलेला अखंड दिवा घालवतो 'अकाल मृत्यू'ची भीती; मात्र... 
18
"आधी नवरा गेला, आता मुलगी..."; विद्यार्थिनीचा शाळेत संशयास्पद मृत्यू, आईने फोडला टाहो
19
नवरात्री २०२५: अखंड ज्योत संकल्प केला, अचानक दिवा विझला तर...; देवी कोप-अशुभ-अवकृपा होईल का?
20
आर अश्विन पुन्हा मैदानात दिसणार; निवृत्तीनंतर परदेशातील ४ संघाकडून खेळण्याची ऑफर!

कर्जमाफीचे शेपूट! राजकीय गाजावाजा होतो अन् प्रत्यक्ष शेतकऱ्यांना दिलासा मिळत नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2023 10:57 IST

अतिवृष्टीने उभ्या पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागपूरला नुकत्याच झालेल्या विधिमंडळाच्या अधिवेशनात केली आहे. त्याच्या याद्या तयार होणार, त्यांना मंजुरी मिळणार आणि मग निधी पाठविला जाणार हे लांबलचक शेपूट कधी संपतच नाही. 

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा शेवट होतच नाही. सध्या दोन कर्जमाफी योजनांची पूर्तता न होता अनेक शेतकरी वंचित राहिले आहेत. दरम्यान, प्रोत्साहन अनुदान योजना ही कर्ज भरणाऱ्यांना देण्यात येणारी रक्कमही अद्याप सर्व शेतकऱ्यांना मिळालेली नाही. दरम्यान, अतिवृष्टीने उभ्या पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागपूरला नुकत्याच झालेल्या विधिमंडळाच्या अधिवेशनात केली आहे. त्याच्या याद्या तयार होणार, त्यांना मंजुरी मिळणार आणि मग निधी पाठविला जाणार हे लांबलचक शेपूट कधी संपतच नाही. 

राज्यात २०१४ मध्ये सत्तांतर झाल्यानंतर मुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीस असताना २०१६ मध्ये 'छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना' जाहीर करण्यात आली. त्या योजनेचे निकष निश्चित करण्यासाठी दोन वर्षांचा कालावधी गेला आणि प्रत्यक्षात थकबाकीदार शेतकऱ्यांच्या याद्या तयार होऊन कर्जमाफी होईपर्यंत लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या. आचारसंहितेमुळे कर्जमाफी थांबली गेली. ऑक्टोबर २०१९ मध्ये पुन्हा सत्तांतर झाले. महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर येताच त्यांनी 'छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना पूर्ण न करता ती गुंडाळून ठेवून 'महात्मा जोतिराव फुले कर्जमाफी योजना जाहीर केली.

पहिल्या कर्जमाफी योजनेतून सुमारे सहा लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला नव्हता. त्याची रक्कम पाच हजार नऊशे कोटी रुपये होती. दरम्यान, महाविकास आघाडी सरकारच्या महात्मा फुले कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी सुरू झाली. ती शेतकऱ्यांना सरसकट देण्यात आली. ही प्रक्रिया दोन वर्षांत पूर्ण करण्यात आली. कर्ज थकविणाऱ्यांना माफी मिळते आणि नियमित कर्ज फेडणाऱ्यांना कोणताही लाभ मिळत नाही. त्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने लावून धरली. ती मान्य झाली आणि वेळेवर कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये प्रोत्साहन रक्कम देण्याचा निर्णय झाला. 

कर्जमाफीचा गाजावाजा करायचा, मात्र त्याचा लाभ वेळेवर मिळेल याची शाश्वती नसते. फडणवीस सरकार सत्तेवर असताना छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेद्वारे सहा लाख शेतकऱ्यांना पाच हजार नऊशे कोटी रुपये द्यायचे राहूनच गेले. त्यानंतर दोन सरकारे सत्तेवर आली. देवेंद्र फडणवीस अर्थखात्यासह उपमुख्यमंत्रिपदावर विराजमान झाले. मध्यंतरीच्या काळात दुसरी कर्जमाफी योजना महाविकास आघाडी सरकारने जाहीर केली. त्याची अंमलबजावणी झाली. नियमित कर्ज भरणाऱ्यांनाही प्रोत्साहन अनुदान देण्यात आले. 

राज्यकर्ते घोषणा करण्यात वाकबगार असतात. त्याचा प्रचार अन् प्रसारही करतात. प्रत्यक्षात प्रशासकीय पातळीवर कामे होत नाहीत. फडणवीस यांनी कर्जमाफी योजना जाहीर केल्यानंतर दोन वर्षे त्याचे निकष निश्चित होत नव्हते. शेतकऱ्यांना कर्जमाफी म्हणजे बड्या शेतकऱ्यांना घबाड मिळणार आहे. ऐपत असूनही कर्जाचे हप्ते भरलेले नाहीत, शेती आहे; पण त्याचबरोबर नोकरदारही आहे. अशांना कर्जमाफी कशासाठी द्यायची? अशा एक ना अनेक शंका-कुशंका उपस्थित करण्यात आल्या. त्यामुळे शेतकऱ्यांची कर्जमाफी कागदावरच राहिली आहे. शेतीसाठी कर्जपुरवठा करण्याचे उद्दिष्ट जिल्हा प्रशासनांना दिले जाते आणि ते थकल्यावर माफीसाठी लवकर निर्णय घेतला जात नाही. 

पश्चिम महाराष्ट्रात ऊस उत्पादक शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. सहकारी साखर कारखान्यांकडे ऊस पाठविताच सोसायटीच्या याद्यांनुसार कर्जाची रक्कम परस्पर कापून घेतली जाते. परिणामी कर्जवसुलीचे प्रमाण चांगले राहते. शिवाय या विभागात अल्पभूधारक तसेच छोटे शेतकरी अधिक आहेत. त्यांना विविध निकषांचा लाभ होतो. याउलट विदर्भ-मराठवाड्यात कोरडवाहू शेती अधिक आणि क्षेत्र अधिक असल्याने निकष लावताना अडचणी निर्माण होतात. शेतकऱ्यांना तुटपुंजे उत्पादन मिळते. त्याला चांगला दर मिळाला तर कर्जाची परतफेड करता येते. 

थेट हातात पैसा पडला तर तो खर्च होऊन जातो. इतर खर्चही सातत्याने वाढत आहेत. परिणामी विदर्भ-मराठवाड्यातील शेतकरी दरवर्षी अडचणीत येतो. अशा पद्धतीने कर्जमाफीची योजना राबविली तर त्याचा उद्देशही साध्य होत नाही किंबहुना कर्जपुरवठा करणाऱ्या सोसायट्या आणि बँकांदेखील अडचणीत येतात. त्यामुळेच राष्ट्रीयीकृत बँकांची शेतीसाठी कर्जपुरवठा करण्याची इच्छा नसते. कर्जमाफीचा राजकीय गाजावाजा अधिक होतो आणि प्रत्यक्ष शेतकऱ्यांना दिलासा मिळत नाही, हेच या योजनेवरून स्पष्ट दिसते.

टॅग्स :Farmerशेतकरी