शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
2
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
3
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
4
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
5
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
6
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
7
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
8
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
9
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
10
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
11
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
12
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
13
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
14
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
15
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
16
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
17
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
18
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
19
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

अन्यायाविरोधात लढणाऱ्या ‘निर्भया’ आणि साठा प्रश्नांची कहाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2026 07:28 IST

‘नव्याने जन्मेन मी’ म्हणणारी निर्भया प्रत्येक आंदोलनाच्या रूपाने पुन्हा भेटत असते. प्रश्न एवढाच उरतो की, अत्याचारांचा हा सिलसिला कधी थांबणार?

- डॉ. नीलम गोऱ्हे, उपसभापती, महाराष्ट्र विधान परिषद 

गेल्या काही दशकांचा आढावा घेतला तर आपल्या लक्षात येते की, साधारणपणे दर आठ ते नऊ वर्षांनी महिलांवरील अत्याचाराविरोधात एक मोठे जनआंदोलन उभे राहिलेले दिसते. या आंदोलनांनी केवळ रस्त्यावरची लढाई लढली नाही, तर देशाच्या कायदेशीर चौकटीतही मूलभूत बदल घडवून आणले. या संघर्षाची पाळेमुळे ‘मथुरा’ बलात्कार प्रकरणात आढळतात. पोलिस कोठडीत झालेल्या या अत्याचाराच्या प्रकरणात जेव्हा कनिष्ठ न्यायालयाने पोलिसांना निर्दोष सोडले, तेव्हा देशभरात संतापाची लाट उसळली. महिला संघटनांच्या वतीने सर्वोच्च न्यायालयाला हजारो पत्र पाठवून दाद मागण्यात आली. या अभूतपूर्व प्रतिसादानंतरच बलात्कारविरोधी कायद्यात सुधारणा करण्याची प्रक्रिया खऱ्या अर्थाने सुरू झाली.

असाच एक महत्त्वाचा लढा राजस्थानमधील भवरीदेवी यांच्या निमित्ताने उभा राहिला. बालविवाह थांबवण्याचे धाडसी प्रयत्न केल्यामुळे सूडबुद्धीने त्यांच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. मात्र, सामाजिक संघटनांच्या पाठबळामुळे भवरीदेवींनी खचून न जाता, अन्यायाविरोधातील एक जिवंत प्रतीक म्हणून स्वतःला झोकून दिले. त्यांच्या या जिद्दीने महिलांना कामाच्या ठिकाणी सुरक्षितता देणाऱ्या कायद्यांचा पाया रचला.

सन २०१२च्या डिसेंबर महिन्यात दिल्लीत घडलेल्या ‘निर्भया’ प्रकरणाने तर संपूर्ण देशाला हादरवून सोडले. एका चालत्या बसमध्ये झालेल्या अमानूष अत्याचाराने जनसामान्यांच्या भावनांचा बांध फुटला. दिल्लीच्या कडाक्याच्या थंडीत मेणबत्त्या घेऊन निघालेले मोर्चे आणि पोलिसांच्या बॅरिकेट्सवर चढून तरुण पिढीने दिलेला लढा आंतरराष्ट्रीय पातळीवर गाजला. दुर्दैवाने, दहा - अकरा दिवसांच्या संघर्षानंतर निर्भयाचा मृत्यू झाला, पण तिने पेटवलेली  मशाल विझली नाही.

या आंदोलनानंतर नियुक्त करण्यात आलेल्या जस्टिस वर्मा समितीच्या शिफारशींमुळे कायद्यात तीन महत्त्वाचे बदल झाले. पहिले म्हणजे, बलात्कार पीडित महिलेच्या वैद्यकीय तपासणीसाठी निश्चित प्रोटोकॉल तयार करण्यात आला. दुसरे, खून आणि बलात्कार अशा ‘दुर्मिळातील दुर्मीळ’ प्रकरणात फाशीच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आणि तिसरे म्हणजे, पीडितेची ओळख व नाव पूर्णपणे गोपनीय ठेवण्याचे कडक नियम लागू झाले.

आज ‘निर्भया’ या नावाने अनेक नाटके आणि सामाजिक उपक्रम राबवले जातात. काही ठिकाणी या नावाचा वापर दुर्दैवाने मार्केटिंगसाठीही झाले, पण ‘निर्भया’ हे नाव आता केवळ एका व्यक्तीचे राहिले नसून ते अत्याचाराविरूद्धच्या धैर्याचे प्रतीक बनले आहे. आजही अनेक निर्भया आपल्या समाजात न्यायासाठी लढताना दिसतात. कायद्याचे नियम कडक झाले असले तरी आजही आरोपींना शिक्षा होईपर्यंत अनेक तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागते.‘नव्याने जन्मेन मी’ म्हणणारी निर्भया प्रत्येक आंदोलनाच्या रुपाने आपल्याला पुन्हा भेटत असते. प्रश्न फक्त एवढाच उरतो की, या आंदोलनांना यश मिळून महिलांवरील अत्याचारांचा हा सिलसिला नेमका कधी थांबणार? हा प्रश्न आजही अनुत्तरितच आहे.    neeilamgorhe@gmail.com

टॅग्स :Molestationविनयभंग