शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
3
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
4
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
5
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
6
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
7
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
8
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
9
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
10
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
11
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
12
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
13
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
14
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
15
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
16
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
17
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
18
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
19
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
20
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...

बा निसर्गा, काऊन सतावून रायला रे बापा? निवडणुकीच्या धामधुमीतून वेळ काढत तातडीच्या मदतीची व दिलाशाची खरी गरज

By किरण अग्रवाल | Updated: March 3, 2024 15:40 IST

Saransh: रब्बी हंगामातील पिके हाताशी आली असताना अवकाळीने ती जमीनदोस्त केली, त्यामुळे बळीराजा पुन्हा संकटात सापडला आहे. या नुकसानीचे पंचनामे तातडीने करून संबंधितांना दिलासा दिला जाणे गरजेचे आहे.

- किरण अग्रवालरब्बी हंगामातील पिके हाताशी आली असताना अवकाळीने ती जमीनदोस्त केली, त्यामुळे बळीराजा पुन्हा संकटात सापडला आहे. या नुकसानीचे पंचनामे तातडीने करून संबंधितांना दिलासा दिला जाणे गरजेचे आहे.

यकतं पयलेच बेजार हाव, वावरात धळ अगाईत नाई अन् खिशात पैसा नाई. त्यात निसर्गानं असा अबलखेपना केला राजा. अवकानी पान्यानं हाता तोंडाशी येल घासयी हिसकावून नेला हो भाऊ ! हरबरा यकदम झोपला, गवू पुरा नीजला, पपया गेल्या झळून... सांगा कोनाच्या तोंडाक्ळे पाहाव आता ? काय जीव द्याव, बेज्याच गोठ झाली बावा... अशा मानसिकतेने बळीराजा बेजार झाला आहे, कारण नुकत्याच होऊन गेलेल्या अवकाळी पावसाने त्याची होती नव्हती ती आशाही मातीत मिळविली आहे.

चालू आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसाच्या फटक्याने रब्बीची हाती आलेली व सोंगणीवरची पिके आडवी झालीत. गारपीटच अशी होती की गहू व हरभरा तर झोपलाच, टरबूज व संत्रा आदी फळ पिकांचेही मोठे नुकसान झाले आणि आंब्याचा मोहोरही गळून पडला. भाजीपाला देखील जमीनदोस्त झाला. डोकं काम करेना, असे हे अवकाळी संकट ओढवले. मुळात यंदा पावसाच्या लहरीपणामुळे तसाही बळीराजा संकटात होता. मागे जुलै व नोव्हेंबर मध्येही अवकाळी पाऊस व गारपिटीचा फटका परिसराला बसून गेला असून त्यातही मोठे नुकसान झाले होते. आता रब्बीच्या पिकावर त्याची थोडीफार आशा होती तर तीदेखील या अवकाळी पावसाने मातीत मिळवली.

निसर्ग का सतावतो आहे, असा उद्विग्न करणारा प्रश्न यातून निर्माण होतोय खरा; पण त्याचे उत्तरही मनुष्याजवळच आहे. पर्यावरणाच्या ऱ्हासाशी संबंधित त्या जागतिक कारनांची चर्चा येथे करण्याची गरज नाही, मात्र निसर्गाची ही अवकृपा बळीराजाच्या मुळावर उठली आहे हे खरे. राज्यात सर्वाधिक नुकसान बुलढाणा जिल्ह्यातील सुमारे 21हजारपेक्षा अधिक हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे झाले असून अकोला जिल्ह्यात 17 हजार हेक्टरवरील पिकांना फटका बसला आहे. थोडे थोडके नव्हे तर, मोठे नुकसान आहे हे. वाशिम जिल्ह्यातही गारा पडल्या. मंगरूळपीर, कारंजा, मानोरासह मोठा परिसर त्यात झोडपला गेला, पण जिल्हा प्रशासनाने प्राथमिक अंदाजात सहापैकी चक्क पाच तालुक्यांमध्ये नुकसान निरंक दाखवून नुकसानग्रस्तांच्या जखमेवर जणू मीठच चोळले आहे. प्रशासनाची कागदं रंगविणारे अधिकारी व कर्मचारी ही शेतकऱ्यांचीच मुलं असताना असे व्हावे हे आश्चर्यजनकच नव्हे, संतापजनकही आहे.

निसर्गाने नागविलेला बळीराजा जेव्हा प्रशासन अगर व्यवस्थांकडूनही दुर्लक्षला जातो तेव्हा त्याचे दुःख सर्वाधिक असते. सोंगणीला आलेला गहू असो, की काढणीला आलेला हरभरा; गारपिटीच्या दणक्यात पूर्णपणे मातीमोल झाल्याचे ढळढळीत दिसत असताना प्रशासनाकडून नुकसानीचे अहवाल निरंक दर्शविले जाणार असतील तर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा वाली कोण? अपवाद वगळता बहुतेक लोकप्रतिनिधी त्यांच्या राजकीय ''जोडतोड''मध्ये गुंतलेले दिसत आहेत. मुंबईत सुरू असलेल्या अधिवेशनात ते असल्याने त्यांना दोषही देता येऊ नये. गावाकडे असलेल्यांनी मात्र तातडीने धाव घेत प्रशासनाला त्वरित पंचनाम्याच्या सूचना केल्या व नुकसानग्रस्तांना धीर दिला हे उल्लेखनीयच.

संकट ओढवल्यानंतरचा दिलासा व तातडीची मदत काहीशी फुंकर घालण्याचे काम नक्कीच करतात, पण त्यातही कंजूशी होताना दिसून येते हाच यासंदर्भातील खरा मुद्दा आहे. गेल्यावेळी अतिवृष्टी व तीन महिन्यांपूर्वी अवकाळीचा फटका बसला. त्यावेळीही मोठे नुकसान झाले होते, मात्र तेव्हाची नुकसानभरपाई देखील अजून अनेकांना मिळालेली नाही. मुळात ही भरपाई अशी मिळते तरी किती, पण त्यासाठीही चकरा माराव्या लागणार असतील व प्रतीक्षा करावी लागत असेल तर ती दिलासादायक कशी ठरावी? पण, या अनुभवात बदल होताना दिसत नाही. नुकत्याच झालेल्या अकोला जिल्हा परिषदेच्या वार्षिक सभेतही सदस्यांनी नुकसान भरपाईची मागणी केली खरी, पण त्यासाठी पाठपुरावाही गरजेचा आहे. बुलढाणा, वाशिमच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील लोकप्रतिनिधींनीही याकडे लक्ष द्यायला हवे.

सारांशात, अवकाळी पावसाने बळीराजाची स्वप्ने मातीत मिळविली असून त्यांना तातडीच्या मदतीची व दिलाशाची खरी गरज आहे. संभाव्य निवडणुकीच्या धामधूमीतून थोडा वेळ काढत शासन व प्रशासन या दोन्ही घटकांनी याबाबत गतिमानतेने कार्यवाही करणे अपेक्षित आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्रMaharashtraमहाराष्ट्र