शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
3
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
4
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
5
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
6
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
7
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
8
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
9
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
10
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
11
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
12
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
13
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
14
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
15
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
16
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
17
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
18
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
19
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
20
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले

... शेवटी विद्यार्थी हित परमोच्च समजायला हवे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2024 07:31 IST

खुल्या अर्थव्यवस्थेच्या अंगीकारानंतर निर्माण झालेला नवश्रीमंत वर्ग आणि त्यांचे अनुकरण करणाऱ्या मध्यमवर्गाने भरभरून आश्रय दिल्याने कोचिंग क्लासेस हा शिक्षणाचा आवश्यक घटक होऊन बसला.

लपूनछपून शिकवणीला जाणे, गुरुकिल्ली नामक पाठ्यपुस्तकेतर पुस्तक चोरून वापरणे ते अमुकतमुक क्लासला जातो असे मिरवणे, हा प्रवास भारतीय पालक आणि पाल्यांनी काही दशकांत पूर्ण केला. कालांतराने शिक्षण क्षेत्राने असे काही वळण घेतले की, कोचिंग क्लासेस शिक्षणाचा अपरिहार्य भाग होऊन बसला! त्यातूनच पूर्वी कुणी स्वप्नातही विचार केला नसेल असा कोचिंग क्लासेसचा एक नवा उद्योगच देशात उभा राहिला. रग्गड पैका मोजून भारतीय क्रिकेट संघाचे प्रायोजकत्व स्वीकारण्यापर्यंत आणि कोट्यवधी रुपये आकारणाऱ्या बॉलिवूड सुपरस्टार्सना जाहिरातींमध्ये घेण्यापर्यंत त्या उद्योगाने मजल मारली.

खुल्या अर्थव्यवस्थेच्या अंगीकारानंतर निर्माण झालेला नवश्रीमंत वर्ग आणि त्यांचे अनुकरण करणाऱ्या मध्यमवर्गाने भरभरून आश्रय दिल्याने कोचिंग क्लासेस हा शिक्षणाचा आवश्यक घटक होऊन बसला. पुढे त्याची व्याप्ती एवढी वाढली की, आठव्या-नवव्या इयत्तेपासूनच वैद्यकीय आणि अभियांत्रिकी अभ्यासक्रम प्रवेश परीक्षांसाठी तयारी सुरू करण्याची मजल गाठली गेली.  अगदी कोवळ्या वयात विद्यार्थ्यांवर स्पर्धेचे ओझे लादले गेले. अनेकांचे बालपण त्यामुळे कोमेजून गेले. तो ताण अगदीच असहनीय होऊन काहींनी आत्महत्येचा मार्ग पत्करला! त्याला आळा घालण्यासाठी आता केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने पुढाकार घेतला आहे.

विद्यार्थी आत्महत्यांचे वाढते प्रकार, कोचिंग क्लासेसमध्ये आग लागण्याचे प्रकार, आवश्यक सुविधांचा अभाव, तसेच अध्यापनासाठी अवलंबिण्यात येत असलेल्या पद्धतींसंदर्भात शिक्षण मंत्रालयाकडे तक्रारी झाल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर, तालुका मुख्यालयांपासून महानगरांपर्यंत पेव फुटलेल्या खासगी कोचिंग क्लासेसच्या नियमनासाठी मंत्रालयाने गुरुवारी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली. त्यानुसार, आता वयाची सोळा वर्षे पूर्ण होण्याच्या आता विद्यार्थ्याला कोचिंग क्लासला प्रवेशच देता येणार नाही. इतरही बऱ्याच बाबींचा त्यामध्ये समावेश आहे. या मार्गदर्शक तत्त्वांचा मोठाच धक्का कोचिंग क्लासेसच्या वर्तुळाला, तसेच पालकांनाही बसला आहे. त्यावर अनुकूल व प्रतिकूल प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत; पण सरकारने घालून दिलेल्या नियमांमुळे अंतत: विद्यार्थ्यांचेच भले होईल, अशी अपेक्षा  गैर ठरू नये.

विद्यार्थ्यांना कोवळ्या वयात तीव्र स्पर्धेला तोंड द्यायला भाग पाडणे, त्यांच्या भावनिक व सामाजिक विकासासाठी हानिकारक सिद्ध होऊ शकते. सर्वोत्तम कामगिरी बजावण्याच्या दबावातून येणाऱ्या प्रचंड ताणामुळे अनेक विद्यार्थ्यांना चिंता, तणाव आणि नैराश्यालाही सामोरे जावे लागते. त्याचा प्रतिकूल परिणाम त्यांच्या एकूणच शैक्षणिक प्रवासावर होण्याची दाट शक्यता असते. बहुतांश कोचिंग क्लासेसमध्ये सर्व भर अपेक्षित प्रश्न आणि त्यांच्या उत्तरांचा सराव करून घेण्यावर असतो. त्यामुळे विषयांचा गाभा असलेल्या संकल्पना समजून घेण्याची कुवतच विद्यार्थ्यांच्या ठायी निर्माण होत नाही. सोळा वर्षांपेक्षा कमी वयाच्या विद्यार्थ्यांमध्ये तीव्रतम स्पर्धेला सामोरे जाण्यासाठी आवश्यक ती प्रगल्भताही निर्माण झालेली नसते.

परिणामी, ज्या परीक्षेच्या तयारीसाठी कोचिंग क्लासमध्ये प्रवेश घेतला, त्या परीक्षेत जरी उत्तम गुण मिळाले, तरी पुढे ज्या व्यावसायिक अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यात येतो, तो विद्यार्थ्याला अतिशय जड वाटू लागतो.  त्यामुळे केंद्र सरकारने घेतलेला निर्णय किमान वरकरणी तरी स्वागतार्ह वाटतो. अर्थात अद्याप या निर्णयाचे सर्वच संभाव्य परिणाम समोर आलेले नाहीत.  कायदे, नियमांना बगल देत, कोणत्याही परिस्थितीतून मार्ग काढण्याची अतुलनीय कला भारतीयांच्या अंगी आहे. त्या कलेचा वापर करीत, यातूनही मार्ग काढला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही मार्गदर्शक तत्त्वे रीतसर नोंदणी केलेल्या कोचिंग क्लासेसलाच लागू होणार आहेत.

मागणी आणि पुरवठ्याचे तत्त्व या क्षेत्रालाही लागू पडते. पालकांकडूनच मागणी असल्यास ती पूर्ण करण्याचे अनधिकृत मार्ग शोधले जाऊ शकतात. त्यातून प्रशासनातील खादाडांना चरण्यासाठी आणखी एक कुरण उपलब्ध होऊ शकते. या ठिकाणी मार्गदर्शक तत्त्वांमधील केवळ प्रमुख मुद्याचीच चर्चा केली आहे. इतरही बरेच मुद्दे आहेत. त्यातून अनेक शक्यता जन्म घेऊ शकतात. त्यामुळे या विषयावर शिक्षण क्षेत्रातील महनीय मंडळीनी साधकबाधक चर्चा घडवून आणणे आवश्यक आहे. त्यातूनच अंतत: विद्यार्थ्यांच्या हिताचे काय, याचा निर्णय होऊ शकतो. सरकारनेही लवचिकता दाखवून, गरज भासल्यास मार्गदर्शक तत्त्वांमध्ये आवश्यक त्या सुधारणा करण्याची तयारी ठेवण्याची अपेक्षा करणे वावगे ठरू नये; कारण शेवटी विद्यार्थी हित परमोच्च समजायला हवे!

टॅग्स :Educationशिक्षण