शहरं
Join us  
Trending Stories
1
कलिंगड आणि बिर्याणीची 'निर्दोष' मुक्तता! फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये मोठं सत्य उघड; मृत्यूचं नेमकं कारण काय?
2
Eknath Shinde Helicopter : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हेलिकॉप्टर वादळामुळे भरकटले; पायलटने प्रसंगावधान राखत केले यशस्वी लँडिंग
3
Hantavirus Outbreak : जगावर नवं संकट! 'हंटा व्हायरस'चा भीषण उद्रेक; जहाजावरील प्रवाशांचे पलायन, आता संसर्गाचा मोठा धोका
4
Ashok Kharat ED Action: भोंदूबाबाचं घबाड उघड! अशोक खरातच्या लॉकरमध्ये सापडला सोन्याचा डोंगर; ईडीने ३ कोटींचे दागिने केले जप्त
5
पार्किंगचा दर ऐकून गाडी घरीच ठेवाल! ४० टक्के दरवाढीचा झटका; सर्व प्रकारच्या वाहनांसाठी नवे दर लागू
6
कलेक्टरच निघाला घोटाळ्याचा मास्टरमाईंड! बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक अटकेत; ७३ कोटींचा असा झाला गोलमाल
7
विजयसमोर बहुमताचे त्रांगडे, तामिळनाडूत अडले सत्तेचे घोडे : बहुमतच नसताना सरकारसाठी पाचारण करणार कसे?
8
मोठी बातमी! नाशिक TCS प्रकरणातील मुख्य संशयित निदा खानला अटक; २५ दिवसांपासून होती फरार
9
“...तर सामूहिक राजीनामे देऊ”, TVK आमदारांचा थेट इशारा; विजयसमोर मोठाच पेच, घडामोडींना वेग!
10
IPL 2026 : LSG अभी जिंदा है...! गत चॅम्पियन RCB च्या संघाने पराभवासह 'नंबर वन'ची संधी गमावली
11
जगापासून लपवले, सॅटेलाइटने सगळे टिपले; इराण हल्ल्यात अमेरिकेची १५ तळावरील २२८ ठिकाणे बेचिराख
12
“भारत-व्हिएतनाम संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध”: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
13
धक्कादायक! काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचा महिला आमदाराला जबरदस्ती मिठी मारण्याचा प्रयत्न; धक्का देत केलं दूर, VIDEO व्हायरल
14
प्रिन्ससमोर 'किंग' चारीमुंड्याचित! अचूक टप्पा अन् काही कळण्याआधीच विराट कोहलीचा त्रिफळा उडला (VIDEO)
15
पश्चिम बंगालमध्ये ममता राज संपुष्टात! राज्यपालांकडून मंत्रिमंडळ बरखास्त; आता होणार भाजप युगाची सुरुवात
16
मिचेल मार्शचं वादळी शतक! LSG नं २०९ धावा केल्यावर RCB ला मिळालं २१३ धावांचं लक्ष्य; कारण...
17
गुंतवणूकदारांची चांदी! देशातील सर्वात महागड्या शेअरकडून 'डिविडेंड' जाहीर, एका स्टॉकची किंमत १३००००; किती मिळणार लाभांश?
18
Mitchell Marsh Fastest Century: मिचेल मार्शचा मोठा पराक्रम; जलद शतकी खेळीसह रिषभ पंतचा विक्रम मोडला
19
“२०२९ला सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपद अन् बारामतीच्या उमेदवार असतील”; जय पवारांचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

भक्कम पाया आवश्यक

By admin | Updated: April 24, 2017 23:25 IST

२००८ साली सुरू झालेल्या आयपीएलने क्रिकेटचे सर्व सूत्रेच बदलली. एकेकाळी कसोटी सामन्यांची चलती असलेल्या या खेळात एकदिवसीय क्रिकेटने जम बसवला.

२००८ साली सुरू झालेल्या आयपीएलने क्रिकेटचे सर्व सूत्रेच बदलली. एकेकाळी कसोटी सामन्यांची चलती असलेल्या या खेळात एकदिवसीय क्रिकेटने जम बसवला. यानंतर टी-२०च्या वेगाने संपूर्ण क्रिकेट खेळच बदलला. टी-२० क्रिकेटच्या आक्रमक रूपामुळे आज कसोटी सामन्यांची रंगत कमी होत असल्याची बोंब आहे. काही प्रमाणात ते खरंही आहे. क्रिकेटची रंगत वाढवण्याच्या हेतूने पाच दिवसांचा कसोटी सामना व एकदिवसीय सामन्याला मागे टाकून तीन तासांमध्ये संपणारा टी-२० क्रिकेटचा थरार पुढे आला. पण, त्याचवेळी हे खरं क्रिकेट आहे का, असा प्रश्नही पडतो. जो खेळ तंत्रशुद्ध फलंदाजीचा, लयबद्ध गोलंदाजीचा म्हणून ओळखला जातो, त्या खेळाची ओळख आज आक्रमकता, विध्वंसक फलंदाजी आणि भेदक गोलंदाजी अशी झाली आहे. टी-२०चे स्वरूप पाहता हे आवश्यक आहे हे जरी मान्य केले तरी हे खरेखुरे क्रिकेट नक्कीच नाही. यामुळे युवा खेळाडू आक्रमकतेला प्राधान्य देताना क्रिकेटचा मूळ पाया विसरत आहेत. क्रिकेटसाठी ही अत्यंत गंभीर बाब आहे. अगदी, १० ते १४ वर्षांखालील खेळाडूही एबी डिव्हिलियर्स, ख्रिस गेल यांसारख्या टी-२० स्पेशालिस्ट फलंदाजांसारखे आक्रमक फटके खेळण्याचा प्रयत्न करतात. क्रिकेटचा पाया भक्कम असणे आवश्यक का आहे याचे उत्तम उदाहरण म्हणजे चेतेश्वर पुजारा. सध्या भारताचे सर्वच खेळाडू टी-२० खेळत असताना पुजारा मात्र या प्रारूपमध्ये बसत नसल्याने त्याचा विचार आयपीएलसाठी होत नाही. मात्र, कसोटी सामन्यात इतर फलंदाज अपयशी ठरत असताना हाच पुजारा भारताचा तारणहार ठरतो. नुकताच झालेल्या आॅस्टे्रलियाविरुद्धच्या मालिकेमध्ये हेच सिद्ध झाले. कसोटी क्रिकेटमध्ये लागणारा संयम टी-२०च्या भडीमारामुळे सध्याच्या खेळाडूंमध्ये कमी दिसतो. शेवटी क्रिकेट हा तंत्र व संयम यावर अधिक अवलंबून असल्याने खेळाडूंनी याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.