शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ११ वाजेपर्यंत कुठे किती झाले मतदान?
2
Video - तरुणाने 8 वेळा केलं मतदान, पोलिंग पार्टी सस्पेंड; राहुल गांधींनी व्यक्त केला संताप
3
ऑनलाईनही पैशांचं वाटप होतंय; उद्धव ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांचा गंभीर आरोप
4
...म्हणून शरद पवारांनी अचानक यू टर्न घेतला; मुख्यमंत्रिपदाची डील? आणखी एक नवा दावा
5
महाराष्ट्राच्या संघर्षाच्या इतिहासात राज ठाकरेंचं नाव राहणार नाही; संजय राऊतांची जळजळीत टीका
6
ख्रिस गेल पुढच्या IPL मध्ये पुन्हा खेळताना दिसणार? विराटच्या VIDEO नंतर चर्चांना उधाण
7
हेलिकॉप्टर अपघातात इराणचे राष्ट्रपती रईसी यांचा मृत्यू; परराष्ट्र मंत्र्यांसह राज्यपालांनीही गमावला जीव
8
'मुलाला सांभाळता येत नाही'; नेटकऱ्यांच्या कमेंट्स जिव्हारी लागल्या, 'त्या' बाळाच्या आईने स्वतःला संपवलं
9
गौरव मोरे ते स्पृहा जोशी; मराठमोळ्या या कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क
10
PM Modi Share Market : ४ जूननंतर शेअर बाजार नव्या शिखरावर असेल, PM मोदींनी गुंतवणूकदारांना दिला अनोखा सल्ला
11
उद्धव ठाकरेंचा निर्णय चुकीचा, मतदानातून जनता दाखवणार; राहुल शेवाळेंचा निशाणा
12
"त्यांना पराभवाची चाहूल लागलीय"; बोगस मतदानाचा आरोप करणाऱ्या विचारेंवर मुख्यमंत्र्यांचा पलटवार
13
'ही मॅन'नेही बजावला मतदानाचा हक्क, ८८ वर्षीय धर्मेंद्र पोहोचले मतदान केंद्रावर; Video व्हायरल
14
नंदुरबारचा रहिवासी.. गुजरातमध्ये GST अधिकारी, साताऱ्यात विकत घेतले संपूर्ण गाव; कुणीच केला नाही तपास
15
Som Pradosh 2024: नशिबाची साथ मिळत नसेल तर आज सोम प्रदोष व्रत करा,भाग्य बदलेल; वाचा व्रतविधी!
16
Nrusinha Jayanti 2024: २१ मे नृसिंह जयंती: भगवान विष्णुंच्या नृसिंह अवतारामागे दडलेले रहस्य जाणून घ्या!
17
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live ठाण्यात बोगस मतदानासाठी दीड हजार लोक आणून ठेवलेत; राजन विचारेंचा गंभीर आरोप
18
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
19
Credit Cardच्या १६ अंकांमध्ये लपलीयेत 'ही' ४ रहस्यं; काहीच लोकांना माहितीये याचा अर्थ, पाहा
20
ऐश्वर्याच्या हाताची होणार सर्जरी? फ्रॅक्चर असूनही Cannes फिल्म फेस्टिव्हलमध्ये झालेली सहभागी 

विदर्भ - मराठवाड्यातल्या नेत्यांच्या ढिम्मपणाची कहाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2021 7:12 AM

वैधानिक विकास मंडळांमुळे विदर्भ - मराठवाड्याच्या मागासलेपणाचे निदान मोजमाप तरी व्हायला लागले. त्यांच्या पुनरुज्जीवनाचे घोडे का अडले आहे?

श्रीमंत माने -  कार्यकारी संपादक, लोकमत, नागपूरकापूस एकाधिकार योजनेने शेतकऱ्यांना काय दिले, असे नेहमी विचारले जायचे. बाकी काही नाही, तरी त्या योजनेमुळे प्रत्येक शेतकऱ्याचे बँकेत खाते उघडले गेले आणि त्यांना कापसाच्या शेतीचा हिशोब समजायला लागला, हा फायदा इतर कशापेक्षाही मोठा आहे, हे त्या प्रश्नाचे एक उत्तर. कापसाचा अधिक संबंध असलेल्या विदर्भ, मराठवाड्यासाठी तितकाच जिव्हाळ्याचा विषय वैधानिक विकास मंडळांचा आहे आणि या मंडळांच्या फलनिष्पत्तीचे उत्तर कापूस एकाधिकार योजनेसारखेच आहे. मान्य केले, की सत्तावीस वर्षे अधिकाऱ्यांनी कागदी घोडे नाचवले, नेतेही त्याच घोड्यांवर मांड ठोकून दौड मारत राहिले तरी या मंडळांमुळेच किमान विदर्भ व मराठवाड्याच्या विकासाचे, मागासलेपणाचे मोजमाप व्हायला लागले. मंडळांमध्ये त्यावर अभ्यास होत राहिला. लेखाजोखा दरवर्षी जनतेसमोर येत राहिला. मुदत संपल्याने ही मंडळे एप्रिल २०२० पासून अस्तित्वहीन आहेत. मधल्या काळात त्यांचा वैधानिक दर्जा गेला. आता त्यांचे पुनरुज्जीवन राज्यपालांच्या हातात आहे की, राष्ट्रपतींच्या यावर खल सुरू आहे.  (The story of the leaders of Marathwada and Vidarbha )राज्यघटनेच्या ३७१ (२) नुसार ही मंडळे विशेष बाब म्हणून स्थापन झाली व दरवेळी राष्ट्रपतींनीच मुदतवाढ दिली, हे लक्षात घेतले, तर मागास विदर्भ, मराठवाड्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी त्यासाठी दिल्लीत प्रयत्न करणे गरजेचे आहे. सुरुवातीला दोन वेळा पाच-पाच वर्षे, नंतर दोन वेळा एकेक वर्ष व नंतर तीन वेळा प्रत्येकी पाच वर्षे, अशी सात वेळा मुदतवाढ मंडळांना मिळाली. शेवटची मुदतवाढ ३० एप्रिल २०१५ ची, तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हातची. गेल्या वर्षी, महाराष्ट्रात नाट्यमय सत्तांतर झाले आणि एका बाजूला सत्तेचा आनंद व दुसऱ्या बाजूला सत्ता गमावल्याचे दु:ख यात मंडळांना मुदतवाढीचा विसर पडला. १९९४ साली वैधानिक विकास मंडळांच्या स्थापनेसोबतच अलीकडेच निवर्तलेले सनदी अधिकारी भुजंगराव कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली निर्देशांक व अनुशेष समिती गठित झाली. तीन वर्षांनंतर त्या समितीच्या अहवालात राज्यातले सतरा जिल्हे मागास ठरले. विशेषत: सिंचनाचा अनुशेष मोठा होता. कोरडवाहू कापूस शेती, तिचा अवाढव्य उत्पादन खर्च ऐरणीवर आला. शेतकरी आत्महत्याही कापूसपट्ट्यातच अधिक. सिंचन किंवा शेती पंपांना वीज जोडणीच्या अनुशेषाएवढी लोकसंख्येच्या प्रमाणात नोकऱ्या व अन्य मागासलेपणाची चर्चा झाली नाही. विजय केळकर समितीने नोकऱ्यांमधील प्रतिनिधित्वाला हात घातला खरा; पण त्या समितीचा अहवाल सरकारने फेटाळला. त्या अहवालात मागासलेपणाच्या नव्या वेदनांना जन्म देणारे बरेच काही आहे. खरेतर मागासलेपण हा घोर अन्याय आहे व तो करणाऱ्यांपेक्षा सहन करणारे अधिक दोषी असतात; पण विदर्भ, मराठवाड्यातील अनेक नेत्यांना त्यामुळे संताप येत नाही. अनुशेष संपलेला नाही. १९९४ चा आर्थिक अनुशेष संपल्याची घोषणा होऊन गेली; पण अमरावती, अकोला, वाशिम व बुलडाणा जिल्ह्यांत २७ वर्षांपूर्वी मोजलेला सिंचनाचा १ लाख ६३ हजार हेक्टरचा भौतिक अनुशेष शिल्लक आहे. गोसीखुर्द, बेंबळा, जिगाव प्रकल्प जिथल्या तिथेच आहेत. निधी खर्च झाला; पण शेतावर पाणी पोहोचले नाही. दरम्यान, मागासलेपणाचे मोजमाप झाले नाही. मधल्या काळात महाराष्ट्रात खासगी गुंतवणुकीचे, पीपीपी मॉडेलचे अनेक प्रकल्प आले. त्यातून नवा असमतोल निर्माण झाला आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार मुख्यमंत्री असताना विकास मंडळे स्थापन झाली. आताही त्यांनीच मनावर घ्यावे, अशी मागणी आहे; पण इतक्या वर्षांनंतरही पुन्हा त्यांनाच साकडे घालायचे असेल, तर विदर्भ, मराठवाडा व झालेच तर खान्देशातील नेत्यांचे काय करायचे?

टॅग्स :MarathwadaमराठवाडाVidarbhaविदर्भFarmerशेतकरी