शहरं
Join us  
Trending Stories
1
"नव्या चेहऱ्यांना संधी द्या"; जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, शरद पवारांच्या भूमिकेकडे लक्ष
2
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
3
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
4
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
5
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
6
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
7
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
8
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
9
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
10
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
11
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
12
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
13
७ वर्षांनी मोठ्या कोंकणा सेनसोबत डेटिंगच्या चर्चांवर अभिनेत्याने सोडलं मौन, म्हणाला- "विकी-कतरिना..."
14
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
15
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
16
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
17
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
18
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
19
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
20
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा

हार्दिकचे उपोषण थांबवा; मागण्यांबाबत सनदशीर तोडगा काढणे गुजरात सरकारचे कर्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2018 04:19 IST

गुजरातच्या पटेल समाजाचे तरुण नेते हार्दिक पटेल यांच्या आमरण उपोषणाचा आजचा तेरावा दिवस आहे. हार्दिक पटेल, दिल्लीचा कन्हैया कुमार व गुजरातचा जिग्नेश मेवानी या तीन तरुणांनी मध्यंतरीचा बराच काळ साऱ्या देशाला हादरे दिले होते.

गुजरातच्या पटेल समाजाचे तरुण नेते हार्दिक पटेल यांच्या आमरण उपोषणाचा आजचा तेरावा दिवस आहे. हार्दिक पटेल, दिल्लीचा कन्हैया कुमार व गुजरातचा जिग्नेश मेवानी या तीन तरुणांनी मध्यंतरीचा बराच काळ साऱ्या देशाला हादरे दिले होते. त्यांच्यासमोर उभे राहायला आणि बोलायला सत्ताधारी पक्षाचे धुरंधर प्रवक्तेही घाबरताना दिसले. संबित पात्रा या भाजपाच्या मुख्य प्रवक्त्याला ‘तुम्हाला गोडसे हवेत की गांधी’ या एकाच प्रश्नावर अडकवून कन्हैया कुमारने कसे रडकुंडीला आणले, ते देशाने पाहिले आहे. हार्दिक पटेल हा गुजरातमधील पटेल समाजाचा अतिशय आक्रमक, पण लाडका नेता आहे. त्याच्यामागे जाणा-या पटेल समाजाने सारा गुजरातच सध्या डोक्यावर घेतला आहे. हार्दिकच्या नेतृत्वात पटेल समाजासाठी आरक्षणाची मागणी करणारे लाखो लोकांचे निघालेले मोर्चे देशाने पाहिले आहेत. त्याला तुरुंगात डांबून लोकांपासून दूर ठेवले, तर लोक त्याला विसरतील, हा सरकारचा भ्रमही नंतर खोटा ठरला. तुरुंगाबाहेर येताच, त्याच्याभोवती जमलेल्या पटेल समाजाच्या लोकांनी त्याची लोकप्रियता तशीच शाबूत असल्याचे तेव्हा सिद्ध केले होते. पटेल समाज हा तसाही लढाऊ आहे. देशातील पहिले शेतकरी आंदोलन १९२०च्या दशकात याच समाजाने सरदार पटेलांच्या नेतृत्वात केले. त्या आंदोलनाची उग्रता व शिस्त एवढी मोठी होती की, सरकारने सा-या गुजरातवर बसविलेला शेतसाराच तेव्हा मागे घेतला होता. हार्दिक पटेल तरुण आहे आणि त्याच्यामागे असलेल्या तरुणांची संख्याही मोठी आहे. अशा तरुणावर वेगवेगळे आरोप लावायचे आणि त्याला तुरुंगात डांबायचे, हा सरकारचा पोरखेळ त्यांच्याच अंगावर उलटणारा आहे. या स्थितीत आपल्या उपोषणाच्या दहाव्या दिवशी हार्दिकने त्याचे मृत्युपत्र जाहीर केले आहे. ते कुणाही सहृदय माणसाच्या मनाला पीळ पाडणारे आहे. ‘उपोषणात माझा मृत्यू झाल्यास, माझी सगळी मालमत्ता माझ्या पालकांना व गुजरातमधील गोशाळांना दिली जावी. माझे डोळेही दानात दिले जावे,’ असे या पत्रात म्हणणा-या हार्दिकने लिहिले आहे की, ‘भाजपा सरकारविरुद्ध मी २५ आॅगस्टपासून उपोषण करीत आहे. माझे शरीर अशक्त झाले असून, त्यात वेदना व आजारांनी प्रवेश केला आहे. या स्थितीत माझे प्राण केव्हाही जाऊ शकतात.’ पटेल समाजाचे दुसरे नेते मनोज पनारा यांनी हे मृत्युपत्र आता जाहीर केले आहे. ‘आपल्या ५० हजारांच्या बँक ठेवींपैकी २० हजार माझ्या पालकांना दिले जावे व उरलेली रक्कम अहमदाबादमधील चंदननगरच्या गोशाळेला द्यावी,’ असेही त्यात हार्दिकने म्हटले आहे. ‘हू टुक माय जॉब’ या त्याच्या आगामी पुस्तकातून येणाºया रकमेपैकी ३० टक्के आपल्या कुटुंबाला, तर ७० टक्के रक्कम पाटिदारांनी केलेल्या आंदोलनात ज्या १४ जणांना मृत्यू आला, त्यांच्या कुटुंबीयांना द्यावी,’ असेही त्याने नोंदविले आहे. मुळात हे मृत्युपत्र हाच मुळी एक स्फोटक दस्तऐवज आहे. त्याने गुजरातमध्ये व विशेषत: तेथील पटेल या मोठ्या समाजात केवढा असंतोष उभा केला असेल, याची कल्पना आपण करू शकतो. केवळ राजकीय पक्ष वा एखादी धार्मिक किंवा अर्धधार्मिक संघटना मागे असलेली माणसेच समाजात उठाव घडवून आणत असतात, हे खरे नाही. टिळकांनी, गांधींनी आणि स्वातंत्र्याच्या आंदोलनातील अनेकांनी असे उठाव आपल्या त्यागाच्या व परिश्रमाच्या बळावर घडवून आणले आहेत. स्वतंत्र भारतातही एखादी मनकर्णिका सा-या देशाला हादरा देऊ शकते, हे आपण पाहिले आहे. या स्थितीत हार्दिक पटेल व त्याचे सहकारी यांच्याशी तत्काळ बोलणी करणे व त्यांच्या मागण्यांबाबत सनदशीर तोडगा काढणे हे गुजरात सरकारचे तातडीचे कर्तव्य आहे. ते सरकार तसे करणार नसेल, तर केंद्राने त्यात पुढाकार घेणे आवश्यक आहे. भारत हा तरुणांचा देश आहे. या तरुणाईला सत्तेचे आकर्षण नसून न्यायाचे आहे. हा तरूण समाजाच्या नैतिक भूमिकेला वळण देऊन, समाजाला सोबत ओढून नेणारा मार्गदर्शकही होत असतो, ही बाब सा-यांनी लक्षात घेतली पाहिजे.

टॅग्स :hardik patelहार्दिक पटेलGujaratगुजरात