शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्याकडे झालेल्या निवडणुका सर्वांत निष्पक्ष होत्या”; राहुल गांधींना मित्र पक्षाचा घरचा अहेर
2
डिजिटल अरेस्टवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; देशभरातील सर्व प्रकरणे CBI कडे सोपवली
3
पोर्टेबल लॅब, टॉयलेट, पाणी, अदृश्य सेना...; कुठल्याही देशात जाताना काय काय सोबत घेऊन फिरतात पुतिन?
4
हृदयद्रावक! शेतीसाठी घेतलं १५ लाखांचं कर्ज पण पुराने पीक उद्ध्वस्त, शेतकऱ्याने मृत्यूला कवटाळलं
5
Travel : मुंबईजवळची 'ही' ठिकाणं पाहिल्यावर गोवाही विसराल! न्यू इअर सेलिब्रेशनसाठी बेस्ट रोमँटिक डेस्टिनेशन्स
6
मामला 'गंभीर' है...! वारंवार बोलावूनही विजयाच्या जल्लोषात सहभागी झाला नाही कोहली, नेमकं घडलं काय? बघा Video
7
इम्रान खानवर पाकिस्तान सरकारची मोठी कारवाई! न्यूज चॅनेल्सना दिले आदेश, नेमकं काय घडतंय?
8
बाजार विक्रमी पातळीवरून घसरला! सेन्सेक्स-निफ्टी लाल रंगाग बंद; ऑटो शेअर्सची मात्र कमाल!
9
“मतदानाला ४८ तास असताना निवडणुका स्थगित करणे अनाकलनीय, निवडणूक आयोग...”; काँग्रेसची टीका
10
VPN वापरताय? थांबा! आताच सावध व्हा; गुगलने दिलीय 'रेड अलर्ट' वॉर्निंग, बँक खातं होऊ शकतं रिकामी
11
“मीरा-भाईंदर मेट्रोचे डोंगरी कारशेड रद्द, लवकर अधिसूचना”; प्रताप सरनाईक यांनी दिली माहिती
12
दत्त जयंती २०२५: तुम्ही ‘श्रीदत्त अथर्वशीर्ष’ म्हणता का? कायमची कृपा होते; पुण्य लाभते!
13
GST दरात कपात होऊनही तिजोरीत वाढ! नोव्हेंबरमध्ये १.७० लाख कोटी रुपये संकलन, पण, 'या' क्षेत्रात घट
14
नवरदेव नेसला साडी अन् नवरीची शेरवानी; आगळ्या-वेगळ्या लग्नाने वेधलं लक्ष, रंगली तुफान चर्चा
15
शेख हसीना पुन्हा बांगलादेशच्या पंतप्रधान होणार? मृत्यूदंडाची शिक्षा असतानाच हालचालींना वेग
16
सामन्यानंतर विराटला एक प्रश्न विचराला गेला, त्यानं बोलता बोलता BCCI अन् गौतम गंभीरवरच निशाणा साधला, स्पष्टच बोलला
17
VIRAL VIDEO : पाकिस्तानी व्लॉगरनं रशियन तरुणींना विचारला एक प्रश्न! त्यांनी जे उत्तर दिलं ऐकून फटक्यात झाला गप्प
18
१००% पर्यंत माफीची संधी! सीटबेल्ट, सिग्नल तोडणे यांसारख्या ट्रॅफिक चलनांवर मिळणार सूट! कसा करायचा अर्ज?
19
छोटा शेअर, मोठा धमाका, ज्यानं ₹१ लाख गुंतवले, त्याचं मूल्य आज झालं ₹८१ लाख; तुमच्याकडे आहे का?
20
विराटचा प्रोटीन बार, रोहितचा डाळ-भात! क्रिकेटर्सचं व्हायरल 'डाएट' सिक्रेट, मॅचमध्ये कशी मिळते एनर्जी?
Daily Top 2Weekly Top 5

विशेष लेख: उद्धव-राज आणि फडणवीस : काहीतरी 'मेख' आहे!

By यदू जोशी | Updated: August 29, 2025 10:21 IST

Maharashtra Political Update: राज ठाकरे उद्धव यांच्यासोबत जाणार असे चित्र असताना ते फडणवीस यांच्याही तितक्याच संपर्कात असतात. पक्ष म्हणून भाजपचीही नक्की भूमिका कळत नाही!

- यदु जोशीसहयोगी संपादक, लोकमत

गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी 'राज'कीय भेटी झाल्या, उद्धव ठाकरे हे राज ठाकरेंकडे सहकुटुंब पोहोचले. काही तासांतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही गेले. फडणवीस-राज यांच्यात बंदद्वार चर्चा झाली, नेमके काय घडले असावे? एक मात्र नक्की. राज ठाकरे उद्धव यांच्यासोबत जाणार असे चित्र असताना, ते फडणवीस यांच्याही तितक्याच संपर्कात असतात; यात काहीतरी मेख नक्की आहे. महापालिका निवडणुकीपूर्वी महायुती-महाविकास आघाडीचे स्वरूप निश्चित होईल, तेव्हा ही मेख नेमकी काय होती, याचा अर्थ महाराष्ट्राला कळेल.

जातीय ध्रुवीकरणाच्या राजकारणाने सध्या पुन्हा एकदा उचल खाल्ली आहे. या ध्रुवीकरणाचे परिणामही आगामी निवडणुकांवर संभवतात. फडणवीस यांच्यावर वैयक्तिक टीका केली म्हणून भाजपचे काही छोटे नेते मनोज जरांगे-पाटील यांच्यावर टीका करत आहेत; पण चंद्रशेखर बावनकुळे ज्या पद्धतीने फडणवीसांसाठी ढाल बनले आहेत, तसा अन्य कोणी मोठा नेता समोर येताना दिसत नाही. पक्ष म्हणून भाजपची भूमिका नेमकी कळत नाही.

उपराष्ट्रपती निवडणूक : चमत्कार होईल का?उपराष्ट्रपती पदाची निवडणूक ९ सप्टेंबरला आहे. एनडीएचे सी. पी. राधाकृष्णन विरुद्ध इंडिया आघाडीचे न्या. बी. सुदर्शन रेड्डी असा सामना होत आहे. महाराष्ट्राचा विचार करता उत्सुकता एकाच गोष्टीची आहे की, महायुतीकडे आहेत त्यापेक्षा अधिकची मते त्यांना मिळतील का? केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता आहे. राधाकृष्णन यांची उमेदवारी जाहीर झाल्यापासून फडणवीस यांनी एक धागा पकडला आहे, तो असा की, राधाकृष्णन महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत, ते इथलेच मतदारदेखील आहेत, एकप्रकारे ते महाराष्ट्राचेच आहेत आणि म्हणून प्रादेशिक अस्मितेची भाषा करणारे शरद पवार गट, उद्धवसेना यांनी राधाकृष्णन यांना पाठिंबा द्यावा. 'आमचा इंडिया आघाडीचा उमेदवार आहे,' असे सांगत शरद पवार यांनी राधाकृष्णन यांना पाठिंबा देणार नसल्याचे स्पष्ट संकेत दिलेले आहेत. उद्धव ठाकरे यांनी मात्र अद्याप भूमिका जाहीर केलेली नाही. रेड्डी शुक्रवारी 'मातोश्री'वर जातील, त्यानंतर ठाकरे त्यांना पाठिंबा जाहीर करतील असे दिसते.या निवडणुकीत व्हिप नसतो. सदसद्विवेकबुद्धीने लोकसभा आणि राज्यसभेच्या खासदारांनी मतदान करावे असे अपेक्षित असते. 'आपण चमत्कार करू शकतो' असे देवेंद्र फडणवीस यांनी २०२२ मधील राज्यसभा, विधान परिषदेच्या निवडणुकीत दाखवून दिले होते. या चमत्काराची पुनरावृत्ती उपराष्ट्रपती निवडणुकीत होईल का, याची उत्सुकता आहे. महाविकास आघाडीकडे लोकसभा व राज्यसभा मिळून महाराष्ट्रात ३८ मते आहेत; तर महायुतीकडे २९ मते आहेत. आपला मतांचा आकडा वाढावा, हा देवेंद्र फडणवीस यांचा निश्चितच प्रयत्न आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मदतीने त्यांनी काही खेळी खेळली तर कदाचित वेगळेही घडू शकेल. आपले एकही मत फुटता कामा नये यासाठी महाविकास आघाडीचे नेते अजूनही एकत्रित बसलेले नाहीत. तिकडे महायुती धक्का देण्याच्या तयारीत आहे.

भाजपचे काय चालले आहे?'लाखमोलाच्या जनतेचा रविदादावर जीव हाय २... असं प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे गुणगान गाणारं गीत गेल्या आठवडचात वारंवार वाजवलं जात होतं. लाडक्या बहिणींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लाखो राख्या प्रदान करण्याचा समारंभ झाला तेव्हाचा हा प्रकार. मुंडे, गडकरी, फडणवीस प्रदेशाध्यक्ष होते तेव्हा असं गीत नव्हतं; पण हा बदललेला भाजप आहे; आणखीही बदलत जाईल. व्यक्तिस्तोमाला थोडी सुरुवात आधीच झालेली होती, रवींद्र चव्हाण तो कॅन्व्हास मोठा करताना दिसतात. मुंबईचे अध्यक्ष असताना आशिष शेलार असे काही करत नसत. नवे अध्यक्ष अमित साटम हे पथ्य पाळतील अशी अपेक्षा आहे. साटम हे श्रीश्री रविशंकर यांचे भक्त आहेत. तणावमुक्त जीवन जगण्याची कला 'आर्ट ऑफ लिव्हिंग' श्रीश्री सांगत असतात. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मुंबई भाजपलाही अंतर्गत तणावमुक्तीची गरज आहे. साटम यांनी त्यासाठीचा फॉर्म्युला आणाता, शेलार है उद्धव ठाकरे, राज ठाकरेंच्या सोडीचे वाटत होते. त्यामुळे त्यांची विधाने, प्रतिक्रियांना माध्यमे चांगली जागा देत असत. अमित साटम हे आदित्य ठाकरेंच्या तोडीचे वाटतात. त्यापेक्षा अधिकची उंची स्वतः गाठण्याची संधी मुंबई अध्यक्षपदाच्या रूपाने त्यांच्याकडे चालून आली आहे. साटम मराठी आहेत, मराठाही आहेत. मुंबईत काँग्रेस (वर्षा गायकवाड), मनसे (संदीप देशपांडे) आणि आता भाजप (अमित साटम) असे महत्त्वाच्या पक्षांचे चेहरे मराठीच आहेत. ठाकरेंच्या शिवसेनेत मुंबई अध्यक्ष, मुंबई प्रमुख वगैरे भानगढ़ सुरुवातीपासूनच नाही. मातोश्री' हे एकच पद त्या पक्षात आहे.

भजन आणि भोजनभजनी मंडळांना यावेळी राजकीय नेत्यांकडून चांगली मदत झाली. सप्टेंबरमध्ये नवरात्रोत्सव आहे, अधिक चांगली वर्गणी मिळण्याची संधी मंडळांना असेल. सरकारही मेहरबान इथले आहे. राज्यातील १८०० भजनी मंडळांना प्रत्येकी २५ हजार रुपये असे एकूण साडेचार कोटी रुपये वाटण्याचे काम सांस्कृतिक कार्य विभागाने हाती घेतले आहे. भजनसाहित्याच्या खरेदीस्वठी ही रक्कम दिली जात आहे, ती सरकारला परत करण्याची गरज नसेल. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावर भजनी मंडळांना खुश केले जात आहे. नवरात्रोत्सवात आणखी वेगळ्या मार्गाने खुश केले जाईल. १०० रुपयांत पाच खाद्यवस्तू देणारा 'आनंदाचा शिधा' मात्र यंदाच्या गणेशोत्सवात दिला गेला नाही. दिवाळीत तरी ती द्यावा, अशी अपेक्षा आहे. भजनापेक्षा भोजन महत्त्वाचे।yadu.joshi@lokmat.com

  

टॅग्स :Ganeshotsavगणेशोत्सवRaj Thackerayराज ठाकरेUddhav Thackerayउद्धव ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस