शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

विशेष लेख: 'विकसित' भारताची 'अशक्त' मुले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2025 12:04 IST

मागील वर्षाच्या तुलनेत ग्रामीण विकासासाठीच्या निधीची तरतूद फक्त ७% वाढवलेली आहे. ती अतिशय तुटपुंजी आहे.

-अश्विनी कुलकर्णी (ग्रामीण विकासाच्या अभ्यासक, प्रगती अभियान)

भारताला स्वातंत्र्य मिळून शंभर वर्षे होतील तेव्हा, म्हणजे २०४७ साली विकसित भारत होण्यासाठीची वाटचाल म्हणून आजच्या अर्थसंकल्पाकडे पाहावे, असे अपेक्षित आहे. यावर्षी जन्मलेले मूल २०४७ साली २२ वर्षांचे, म्हणजे तरुण, असेल. 

या दशकातील मुले-मुली तेव्हा उच्चशिक्षण वा नोकरी-व्यवसायात असतील. सध्या भारतातील चार मुला-मुलींमधील तीन अशक्त आहेत, असे सरकारचा नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वे (२०१९-२१) सांगत आहे. 

ही अशक्त पिढी विकसित भारताचे स्वप्न पूर्ण कसे करेल? या पार्श्वभूमीवर सक्षम अंगणवाडी, पोषणआहार योजनेसाठीच्या निधीची तरतूद मागील तीन वर्षात जवळजवळ तेवढीच आहे. महागाई बघता ही तरतूद कमी केल्यासारखीच आहे.

सामाजिक विकासाच्या योजना केवळ त्या एकाच योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीवर अवलंबून नसतात. शाळा, महाविद्यालयातील शिक्षण प्रत्यक्षात गावागावांतील आरोग्यसेवा, रस्ते, पोषक आहार, कुटुंबाची आमदनी, बससेवा अशा इतर घटकांवरही अवलंबून असते. 

अर्थसंकल्पात तरतूद केलेल्या निधीचा वर्षभरात विनियोग करता येत नाही असे दिसते. कृषी सिंचाई योजनेच्या मागील वर्षाच्या तरतुदीच्या तुलेनत ८०% वापर, ग्रामीण आवास योजनेचा ६०% वापर, ग्राम स्वराज्य अभियान मधे ७३% निधीचा वापर, ग्रामीण ग्रामसडक योजनेच्या निधीचा ७६% वापर झालेला दिसतो. 

जलजीवन मिशन अंतर्गत ३२% वापर आहे तरीही यावर्षी, मागील वर्षाच्या खर्चाच्या तुलनेत या अर्थसंकल्पात तीनपट तरतूद केलेली आहे.

योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी जिल्हा आणि तालुका स्तरावर कोणत्या सुविधा आवश्यक आहेत, किती मनुष्यबळ आवश्यक आहे, याचा लेखाजोखा घेऊन त्यासाठी प्रत्येक योजनेत निधीची तरतूद असणे आवश्यक वाटते. 

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची तरतूद मागील वर्षाच्या इतकीच आहे. खरेतर मागील काही वर्षे सातत्याने कामाची मागणी असून काम मिळत नाही, असा ओरडा असताना तेवढाच निधी ठेवणे म्हणजे कमीच. 

या वर्षाच्या निधीची तरतूद आणि मनरेगावर काम करणारी एकूण सक्रिय ग्रामीण कुटुंबे बघता प्रत्येक प्रत्येक कुटुंबाला १०० दिवस कामाची हमी असताना जेमतेम २६ दिवस काम मिळेल एवढ्याच निधीची तरतूद आहे. 'स्थलांतर हे सक्तीचे असू नये!' असे अर्थमंत्री म्हणाल्या. 

फक्त तगून राहण्यासाठी स्थलांतर करावे लागते, तेव्हा ते सक्तीचेच असते. अनेक अभ्यास दाखवतात की, मनरेगाच्या प्रभावी अंमलबाजवणीमुळे स्थलांतर कमी होत आहे. 

सक्तीच्या स्थलांतराने लहान मुलांची शाळा सुटते, त्यांना अंगणवाडीचा आहार मिळत नाही, आरोग्यसेवा, रेशन यांपासून वंचित राहावे लागते. मग गरिबीच्या जटील चक्रातून निघता येत नाही. ग्रामीण महिलांसाठी अजीविका मिशन, नॅशनल रुरल लिव्हलीहूड मिशन ज्याला आपल्या राज्यात 'उमेद प्रकल्प' म्हणून ओळखतात, त्यासाठीची तरतूद २६% ने वाढवलेली आहे. 

बचत गटातील महिलांना उपजीविकेचे साधन उभे करण्यासाठी हा निधी आहे. वर्षाला लाख रुपये कमावतील अशा या 'लखपती दीदी' तयार करण्याचा संकल्प काही महिन्यांपूर्वी या सरकारने मांडला आहे. 

टॅग्स :Budget 2025अर्थसंकल्प २०२५Budgetअर्थसंकल्प 2024Healthआरोग्यCentral Governmentकेंद्र सरकार