शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
3
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
4
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
5
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
6
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
7
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
8
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
9
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
10
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
11
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
12
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
13
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
14
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
15
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
16
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
17
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
18
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
19
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
20
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?

विशेष लेख: लक्ष्मीची पावले दारी येणार! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2025 11:38 IST

शेतीचा विकास, उद्योगांना साहाय्य आणि मध्यमवर्गीयांना दिलासा देणारा हा अर्थसंकल्प म्हणजे 'विकसित भारत' या स्वप्नाच्या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल होय !

-खासदार डॉ. भागवत कराड, माजी अर्थ राज्यमंत्री

विकासाला वेग, खासगी क्षेत्राला चालना आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात 'विकसित भारत' या महत्त्वाकांक्षेला प्रेरणा देणारा हा अर्थसंकल्प आहे. गरिबीपासून मुक्ती, चांगले शिक्षण, स्वस्त आरोग्यसेवा, कुशल कामगार, सशक्त महिला, सशक्त स्वावलंबी शेतकरी, ग्रामीण आणि शहरी भागाचा विकास या सर्व गोष्टींचा विचार या अर्थसंकल्पाने केला आहे. करोडो मध्यमवर्गीयांना आयकरात सवलत देऊन खऱ्या अर्थाने 'लक्ष्मी दारी' येईल, असा विश्वास हा अर्थसंकल्प देतो.

जागतिक अर्थव्यवस्था अडचणीत असताना भारतीय अर्थव्यवस्था ही वेगाने पुढे जात आहे. सध्या भारतीय अर्थव्यवस्थेचा वृद्धी दर 6.5% इतका आहे. शेतकऱ्यांसाठी 'प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजने'ची घोषणा करण्यात आली आहे. शेतीला संलग्न व्यवसायाची जोड मिळत नाही तोपर्यंत उत्पन्न वाढणार नाही, हे हेरून 'धनधान्य योजना' कार्यक्रमाद्वारे डाळवर्गीय पिकांसाठी सहा वर्षाची आत्मनिर्भरता निश्चित केली आहे.

महाराष्ट्रातील मराठवाडा आणि विदर्भातील डाळ उत्पादक शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा होईल. कापूस उत्पादकता वाढवण्यासाठीही महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना वित्त पुरवठा सुरळीत व्हावा, याचा विचारही अर्थमंत्र्यांनी केलेला दिसतो. विकसित राष्ट्रात शेतीच्या विकासातला निम्मा वाटा हा प्रकिया उद्योगांचा असतो. त्या तुलनेत भारतात हे प्रमाण केवळ पाच टक्के इतकेच आहे. त्यामुळे शेतीवरील प्रक्रिया उद्योगासाठी सरकारने प्रक्रिया उद्योगासाठी आत्मनिर्भरता घोषणा केल्या आहेत.

लघुउद्योग हे देशाच्या अर्थव्यवस्थेचे अतिशय महत्त्वाचे इंजिन आहे. प्रामुख्याने उत्पादन आणि सेवा क्षेत्र यामध्ये मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होतात. लघुउद्योजकांसाठी उत्पादन आणि सेवा क्षेत्रात क्रेडिट गॅरंटी वाढवण्यात आलेली आहे. यात पाच कोटींवरून दहा कोटी रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. कौशल्य विकास प्रशिक्षणासाठीदेखील तरतूद आहे.

स्टार्टअपसाठी दहा हजार कोटी रुपयांची घोषणा करण्यात आली. गरीब आणि मागास समाजातील महिलांच्या स्टार्टअपसाठी स्वतंत्र दोन कोटी रुपयांची तरतूद केली, हे विशेष! वैद्यकीय शिक्षणाच्या किमान दहा हजार जागा वाढणार आहेत. जिल्हा रुग्णालयांमध्ये कॅन्सर सेंटर सुरू करण्यात येणार आहे. इतकेच नव्हे, तर कॅन्सरवरील सर्व औषधांना कस्टम ड्युटीमधून सूट देण्यात आली आहे. कॅन्सर रुग्णांसाठी हा दिलासा महत्त्वाचा!

ग्रामीण भागाच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण असलेला कार्यक्रम 'जलजीवन मिशन'ला २०२८ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. शहरी भागाच्या विकासासाठीही स्वतंत्र निधी असेल. पाणीपुरवठा आणि स्वच्छता या प्रकल्पांसाठी बाँड, बँक आणि पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपद्वारे निधी उपलब्ध करण्यात येईल. उड्डाण योजनेअंतर्गत १२० ठिकाणी प्रादेशिक शहरांना जोडण्यात येणार आहे. यामध्ये लहान विमानतळे आणि हेलिपॅड असणाऱ्या स्थानांचा समावेश असेल. पर्यटन विकासासाठीही स्वतंत्र तरतूद आहे.

एकंदरीत हा अर्थसंकल्प हा सर्वसमावेशक असून, भारताला वेगाने प्रगतीच्या मार्गावर नेणारा आणि विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करणारा आहे.

टॅग्स :Budget 2025अर्थसंकल्प २०२५nirmala sitharamanनिर्मला सीतारामनCentral Governmentकेंद्र सरकारBhagwat Karadडॉ. भागवत