शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
2
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
3
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
4
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
5
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
6
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
7
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
8
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
9
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
10
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
11
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
12
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
13
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
14
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
15
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
16
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
17
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
18
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
19
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
20
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग

विशेष लेख - ‘ईडी’ने महाराष्ट्रात विश्रांती घेतली आहे, कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2022 11:46 IST

केंद्रीय तपास यंत्रणांनी महाराष्ट्र सोडून छत्तीसगड, तेलंगणा, दिल्ली अशा राज्यांकडे मोर्चा वळवला आहे. पडद्यामागे नेमक्या काय राजकीय घडामोडी सुरू आहेत? ed

हरिश गुप्ता

ईडीसह सगळ्याच केंद्रीय तपास यंत्रणांनी महाराष्ट्रात अचानक विश्रांती घ्यायचे ठरविलेले दिसते. कदाचित राज्यातले सरकार बदलल्यानंतर हे घडले असावे. अंमलबजावणी संचालनालय (ईडी), सीबीआय किंवा नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो काही महिन्यांपूर्वी राज्यात जितके सक्रिय होते तेवढे आज नाहीत. काही नेत्यांना या यंत्रणा चौकशीसाठी बोलावतात; परंतु आता पूर्वी लावला जायचा तसा रेटा लावला जात नाही. स्वत:हून पुढाकार घेतला जात नाही. इतकेच नव्हे तर इतर राज्यात आयकर खात्याच्या धाडी सुरू असताना महाराष्ट्रात मामला थंड  आहे. असे म्हणतात की  पडद्यामागे बऱ्याच राजकीय घडामोडी चाललेल्या आहेत. 

मुंबई महापालिका निवडणुकीबाबत पक्ष काहीसा साशंक असल्याचे भाजपातील अंतस्थ सूत्रे सांगतात. शिंदे आणि ठाकरे गटाने व्यापक हिंदुत्व हितासाठी एकत्र यावे, येऊन हात मिळवावे, अशी गरज भाजपमधील काही  नेत्यांना वाटते आहे. २०२४ साली  भाजपशी संघटित लढा देण्याच्या पवित्र्यात विरोधी पक्ष एकत्र येत असताना राहुल गांधींनी वीर सावरकर यांच्याविषयी केलेल्या विधानामुळे बाकी काही नाही तरी एक सेल्फ गोल झाला, असे मानले जाते. माजी काँग्रेस अध्यक्षांनी महाविकास आघाडी विस्कळीत होण्यासाठी एक प्रकारे दारूगोळाच पुरवला. दुसरे म्हणजे २०१९ साली शरद पवार यांनी भाजपशी हातमिळवणी केली नाही, ही त्यांची हिमालयाएवढी मोठी चूक झाली, असे राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या अनेकांना वाटते आहे. कदाचित २०२४ मध्ये विरोधी पक्षांचे नेतृत्व करण्याचे स्वप्न पवार पाहत असतील. हिमाचल आणि गुजरातमध्ये  भाजप सत्तेवर आला आणि ‘आप’सारखा पक्ष एक नवी शक्ती म्हणून उदयाला आला तर महाराष्ट्र काँग्रेसमध्ये गदारोळ होईल, असे राजकीय जाणकारांना वाटते. तूर्तास तपास यंत्रणांची सूत्रे हलवणाऱ्यांनी आता महाराष्ट्र सोडून छत्तीसगड, तेलंगणा, दिल्ली अशा राज्यांकडे मोर्चा वळवला आहे.  ममता-मोदी यांचे सख्य

५० कोटी रुपयांच्या शिक्षक भरती घोटाळ्यात केंद्रीय तपास यंत्रणांकडून नाव न गोवले गेल्याने ममता बॅनर्जी यांना थोडा दिलासा मिळाला आहे, असे मी या स्तंभामध्ये लिहिले होते. काही आठवड्यांतच मोदी सरकारने पश्चिम बंगालमध्ये नवे राज्यपाल नेमले. तेही स्वस्थ आहेत. नेमणुकीनंतरच्या काही दिवसांतच ममता बॅनर्जी यांनी असे जाहीर केले की, ५ डिसेंबरला आपण दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेत आहोत. ममता यांनी त्यांचे कट्टर प्रतिस्पर्धी आणि भाजपचे विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांना चहापानाला बोलावले आणि जणू तणाव वितळून गेला. ममता जर आपल्याशी जुळते घेत असतील तर त्यांच्याशी दीर्घकाळ शत्रुत्व पत्करून फार काही राजकीय लाभ पदरात पडणार नाही, असे भाजपलाही वाटू लागले आहे. कदाचित काही महत्त्वाचे कायदे संसदेत संमत करून घेण्यासाठी मोदी यांना ममता यांचे सहकार्य हवे असेल. सीबीआयची जयस्वाल यांना मुदतवाढ

सत्तारुढ पक्षाच्या इच्छेनुसार सीबीआय मान डोलवत नाही, हे आता स्पष्ट झाले आहे. महाराष्ट्र केडरमधून आलेले सीबीआयचे संचालक सुबोधकुमार जयस्वाल वेगळ्याच मुशीतून घडलेले आहेत. ते अत्यंत कठोर आणि  नियमांशी बांधील राहतात. अंमलबजावणी संचालनालयाचे संचालक संजय मिश्रा यांच्यावर सरकार खूश आहे. त्यांना पाच वर्षांचा विक्रमी कार्यकाल देण्यात आला. जयस्वाल यांच्या नेतृत्वाखाली सीबीआयची गोष्ट काही वेगळी नाही. जयस्वाल यांचा कार्यकाल मे २०२३ मध्ये संपत आहे. निवडणुकीच्या वर्षात नवा माणूस आणण्यापेक्षा जयस्वाल यांनाच मुदतवाढ देण्याचे सरकारच्या मनात असल्याची  बातमी आहे. ईडी आणि सीबीआय संचालकांचा कार्यकाल पाच वर्षांपर्यंत वाढवण्यासंबंधी सरकारने कायद्यात दुरुस्ती करून घेतलेलीच आहे.

हे काय शिजते आहे ? भाजपशी समझौता केल्याचा आरोप काँग्रेस आणि आम आदमी पक्ष एकमेकांवर करत असतानाच गुजरातमधील उमेदवार व्यक्तिगत पातळीवर काही मतदारसंघात समझोता घडवून आणण्याच्या प्रयत्नात आहेत. आदिवासी पट्टा, सौराष्ट्र आणि शहरी भागात आपल्याला पाठिंबा असल्याचे आपच्या लक्षात आले आहे. मात्र, ग्रामीण भागात तशी परिस्थिती नाही. या भागात काँग्रेसला पारंपरिक आधार असल्याने आपच्या काही उमेदवारांनी ग्रामीण भागात काँग्रेसला मदत करण्याची भूमिका घेतली आहे. बंडखोरांनी नमते घेण्यास जेथे नकार दिला, अशा डझनभर जागांवर भाजपाला चिंता वाटते आहे.

(लेखक लोकमत दिल्ली आवृत्तीचे नॅशनल एडिटर आहेत) 

टॅग्स :Enforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयCrime Newsगुन्हेगारीMaharashtraमहाराष्ट्र