शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

विशेष लेख - ‘ईडी’ने महाराष्ट्रात विश्रांती घेतली आहे, कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2022 11:46 IST

केंद्रीय तपास यंत्रणांनी महाराष्ट्र सोडून छत्तीसगड, तेलंगणा, दिल्ली अशा राज्यांकडे मोर्चा वळवला आहे. पडद्यामागे नेमक्या काय राजकीय घडामोडी सुरू आहेत? ed

हरिश गुप्ता

ईडीसह सगळ्याच केंद्रीय तपास यंत्रणांनी महाराष्ट्रात अचानक विश्रांती घ्यायचे ठरविलेले दिसते. कदाचित राज्यातले सरकार बदलल्यानंतर हे घडले असावे. अंमलबजावणी संचालनालय (ईडी), सीबीआय किंवा नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो काही महिन्यांपूर्वी राज्यात जितके सक्रिय होते तेवढे आज नाहीत. काही नेत्यांना या यंत्रणा चौकशीसाठी बोलावतात; परंतु आता पूर्वी लावला जायचा तसा रेटा लावला जात नाही. स्वत:हून पुढाकार घेतला जात नाही. इतकेच नव्हे तर इतर राज्यात आयकर खात्याच्या धाडी सुरू असताना महाराष्ट्रात मामला थंड  आहे. असे म्हणतात की  पडद्यामागे बऱ्याच राजकीय घडामोडी चाललेल्या आहेत. 

मुंबई महापालिका निवडणुकीबाबत पक्ष काहीसा साशंक असल्याचे भाजपातील अंतस्थ सूत्रे सांगतात. शिंदे आणि ठाकरे गटाने व्यापक हिंदुत्व हितासाठी एकत्र यावे, येऊन हात मिळवावे, अशी गरज भाजपमधील काही  नेत्यांना वाटते आहे. २०२४ साली  भाजपशी संघटित लढा देण्याच्या पवित्र्यात विरोधी पक्ष एकत्र येत असताना राहुल गांधींनी वीर सावरकर यांच्याविषयी केलेल्या विधानामुळे बाकी काही नाही तरी एक सेल्फ गोल झाला, असे मानले जाते. माजी काँग्रेस अध्यक्षांनी महाविकास आघाडी विस्कळीत होण्यासाठी एक प्रकारे दारूगोळाच पुरवला. दुसरे म्हणजे २०१९ साली शरद पवार यांनी भाजपशी हातमिळवणी केली नाही, ही त्यांची हिमालयाएवढी मोठी चूक झाली, असे राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या अनेकांना वाटते आहे. कदाचित २०२४ मध्ये विरोधी पक्षांचे नेतृत्व करण्याचे स्वप्न पवार पाहत असतील. हिमाचल आणि गुजरातमध्ये  भाजप सत्तेवर आला आणि ‘आप’सारखा पक्ष एक नवी शक्ती म्हणून उदयाला आला तर महाराष्ट्र काँग्रेसमध्ये गदारोळ होईल, असे राजकीय जाणकारांना वाटते. तूर्तास तपास यंत्रणांची सूत्रे हलवणाऱ्यांनी आता महाराष्ट्र सोडून छत्तीसगड, तेलंगणा, दिल्ली अशा राज्यांकडे मोर्चा वळवला आहे.  ममता-मोदी यांचे सख्य

५० कोटी रुपयांच्या शिक्षक भरती घोटाळ्यात केंद्रीय तपास यंत्रणांकडून नाव न गोवले गेल्याने ममता बॅनर्जी यांना थोडा दिलासा मिळाला आहे, असे मी या स्तंभामध्ये लिहिले होते. काही आठवड्यांतच मोदी सरकारने पश्चिम बंगालमध्ये नवे राज्यपाल नेमले. तेही स्वस्थ आहेत. नेमणुकीनंतरच्या काही दिवसांतच ममता बॅनर्जी यांनी असे जाहीर केले की, ५ डिसेंबरला आपण दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेत आहोत. ममता यांनी त्यांचे कट्टर प्रतिस्पर्धी आणि भाजपचे विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांना चहापानाला बोलावले आणि जणू तणाव वितळून गेला. ममता जर आपल्याशी जुळते घेत असतील तर त्यांच्याशी दीर्घकाळ शत्रुत्व पत्करून फार काही राजकीय लाभ पदरात पडणार नाही, असे भाजपलाही वाटू लागले आहे. कदाचित काही महत्त्वाचे कायदे संसदेत संमत करून घेण्यासाठी मोदी यांना ममता यांचे सहकार्य हवे असेल. सीबीआयची जयस्वाल यांना मुदतवाढ

सत्तारुढ पक्षाच्या इच्छेनुसार सीबीआय मान डोलवत नाही, हे आता स्पष्ट झाले आहे. महाराष्ट्र केडरमधून आलेले सीबीआयचे संचालक सुबोधकुमार जयस्वाल वेगळ्याच मुशीतून घडलेले आहेत. ते अत्यंत कठोर आणि  नियमांशी बांधील राहतात. अंमलबजावणी संचालनालयाचे संचालक संजय मिश्रा यांच्यावर सरकार खूश आहे. त्यांना पाच वर्षांचा विक्रमी कार्यकाल देण्यात आला. जयस्वाल यांच्या नेतृत्वाखाली सीबीआयची गोष्ट काही वेगळी नाही. जयस्वाल यांचा कार्यकाल मे २०२३ मध्ये संपत आहे. निवडणुकीच्या वर्षात नवा माणूस आणण्यापेक्षा जयस्वाल यांनाच मुदतवाढ देण्याचे सरकारच्या मनात असल्याची  बातमी आहे. ईडी आणि सीबीआय संचालकांचा कार्यकाल पाच वर्षांपर्यंत वाढवण्यासंबंधी सरकारने कायद्यात दुरुस्ती करून घेतलेलीच आहे.

हे काय शिजते आहे ? भाजपशी समझौता केल्याचा आरोप काँग्रेस आणि आम आदमी पक्ष एकमेकांवर करत असतानाच गुजरातमधील उमेदवार व्यक्तिगत पातळीवर काही मतदारसंघात समझोता घडवून आणण्याच्या प्रयत्नात आहेत. आदिवासी पट्टा, सौराष्ट्र आणि शहरी भागात आपल्याला पाठिंबा असल्याचे आपच्या लक्षात आले आहे. मात्र, ग्रामीण भागात तशी परिस्थिती नाही. या भागात काँग्रेसला पारंपरिक आधार असल्याने आपच्या काही उमेदवारांनी ग्रामीण भागात काँग्रेसला मदत करण्याची भूमिका घेतली आहे. बंडखोरांनी नमते घेण्यास जेथे नकार दिला, अशा डझनभर जागांवर भाजपाला चिंता वाटते आहे.

(लेखक लोकमत दिल्ली आवृत्तीचे नॅशनल एडिटर आहेत) 

टॅग्स :Enforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयCrime Newsगुन्हेगारीMaharashtraमहाराष्ट्र