शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

पाण्यात ठिणगी

By admin | Updated: January 22, 2015 23:47 IST

गुजरातकडे पाणी पळविण्याच्या आरोपावरून जन्माला आलेला मुद्दा आज भलेही राजकीय वाटत असेल. पण उद्या?... आजतरी अंदाज बांधणे कठीण दिसते.

नगर-नाशिक-मराठवाड्यातील पाणी तंटा गेल्या काही वर्षांपासून चर्चेत असताना आता नार-पार-तापी प्रकल्पाच्या पाण्यावरून महाराष्ट्र विरुद्ध गुजरात असा पाण्याचा नवा राजकीय तंटा आकार घेऊ पहातोय. मुद्दा असाच पेटला तर उत्तर महाराष्ट्रातील पाण्याचे राजकारण धुमसत राहील.विरोधी पक्ष नेतेपदाची झूल अंगावर पडताच काँग्रेसमध्ये असूनही तरतरीत झालेल्या राधाकृष्ण विखेंनी थेट राज्यातील भाजपा सरकारलाच याप्रकरणी आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दबावात राज्य सरकार करारातच खाडाखोड करत असल्याचा त्यांचा आरोप. मोदींना खूश करण्यासाठी राज्याचे पाणी गुजरातच्या घशात घालण्याची खेळी साकारत आहे, असा त्यांचा दावा ! केंद्राच्या जलसंपदामंत्री उमा भारती यांच्या नेतृत्वात गुप्तबैैठक घेऊन महाराष्ट्राच्या पाण्यावर डाका टाकण्याचे नियोजन झाले, अशी माहिती जगजाहीर करताना हा डाव उधळून लावण्याचा संकल्पही त्यांनी सोडला. भाजपाच्या राष्ट्रीय नेतृत्वाकडे थेट बोट दाखविल्याने ‘आरे ला कारे’ही तत्काळ आले. अंगावर आलेल्याला शिंगावर घेण्यात तरबेज जलसंपदामंत्री गिरीश महाजनांनी ‘छे, हे तर राजकारण आहे हो’ म्हणत हात झटकले. मात्र आता ते विरोधक नाहीत, सत्ताधारी आहेत. कधीकाळी तेही असेच मुद्दे उकरून सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधायचे. वेळ आली तर शेजाऱ्याचे राजकारणही उसवायचे. आता मात्र अडचण झाली आहे. त्यांना विखे यांच्या पाण्याबद्दल असलेल्या अभ्यासाचा (!) अंदाज नसावा. अन्यथा पाण्याचे राजकारण कोळून प्यायलेल्या आणि त्यायोगे अनेकांना राजकारणात घुसळणाऱ्या विखेंचा आरोप असा सहज घेण्याचे धारिष्ट्य त्यांनी दाखविले नसते.करार झाला तेव्हा मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते. या पाण्यात त्यांचा रस तेव्हाच स्पष्ट झाला होता. आता तर ते देशाचे पंतप्रधान आहेत. त्यामुळे दमणगंगा-पिंजार व नार-पार-तापी खोऱ्यातील पाण्याबद्दल ते आग्रही नसतील, यावर विश्वास कसा ठेवावा? गेल्या काही दिवसात उद्योग, गुंतवणूक गुजरातकडे वळविण्यासाठी त्यांनी जोर लावलाय. ते पाण्यावरील हक्क सहज सोडून देतील, असे मानायचे काय? येथेच भाजपा सरकारची गोची झालेली आहे. आरोपात राजकारण दिसत असेल तर कराराचा मसुदा जनतेसाठी जाहीर करा, असे आव्हान विखेंनी सरकारला दिले आहे. अर्थात आधीच्या सरकारने केलेल्या सामंजस्य कराराचीच अंमलबजावणी केली जाईल, असे सांगत महाजन मान सोडवू पहाताहेत. आधीच्याच सरकारची धोरणे, करार पुढे हाकण्याएवढे सुदृढ असतील तर आता रेघोट्या मारण्याचेच काम होणार की काय, असाही एक भाबडा सवाल जनतेच्या मनात उमटू शकतो. त्यामुळे सरकारने गुप्त वगैरे काही असेल तर ते जनतेसमोर आणलेलेच इष्ट! नार-पार-तापीच्या पाण्यात पडलेली ही ठिणगी पेटते की विझते यावरच या पाण्यावरील महाराष्ट्राच्या आणि पर्यायाने उत्तर महाराष्ट्राच्या हक्काचे भवितव्य अवलंबून असेल.‘राहुरी’चे प्राक्तन !सहकारातील मातब्बर आणि राज्याच्या साखर संघाला आकार देणारे ज्येष्ठ नेते स्व. बाबूराव बापूजी तनपुरे यांचे स्वप्न असलेल्या राहुरी साखर कारखान्यावर भाजपा सरकारने अखेर प्रशासक मंडळ नियुक्त केले. ६०च्या दशकात आकाराला आलेल्या याच कारखान्याने राज्यात अनेकांना सहकाराची प्रेरणा दिली. बाबूराव तनपुरे यांचा सहकारातील वावर एवढा प्रभावशाली होता की तत्कालीन मंत्रिमंडळावर राहुरी कारखान्याच्या विश्रामगृहावर बसून अंतिम हात फिरविला जाई. एका अर्थी सहकारात राहून सरकारवर नियंत्रण ठेवणाऱ्या मोजक्या केंद्रांपैकी ‘राहुरी’ एक होते. कारखान्यात लोकशाही पक्की भिनलेली होती. त्यामुळे आलटून-पालटून मंडळे सत्ताधारी झाली. याच वारसदारांची सरंजामी आज ‘राहुरी’च्या मुळावर उठली आहे. सर्व संपले, असेही नाही. पण आता बाबूराव दादांची दृष्टी कोठून आणायची?- अनंत पाटील