शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सची १० वर्षांनी स्वप्नपूर्ती! गौतम गंभीरनं केला कुणालाच न जमलेला करिष्मा
2
पुण्यातून भाजपला कितीचं लीड मिळणार?; मुरलीधर मोहोळांनी सांगितला आकडा  
3
व्वा! मानलं आजी...साठीच्या वयात दिली परीक्षा अन् पटकावले ९८ टक्के गुण! 
4
केकेआरच्या बॉलर्सनी बुकींच्या तिजोरीत ओतली कोट्यवधींची गंगाजळी
5
Kavya Maran रडली, पण SRH च्या खेळाडूंचे मनोबल उंचावण्यासाठी रोखला अश्रूंचा बांध, Video 
6
मतमोजणीवेळी बीडमधील 'या' अधिकाऱ्यांना दूर ठेवा; बजरंग सोनवणेंची निवडणूक आयोगाकडे मागणी
7
हैदराबादची हाराकिरी, विराट कोहलीची चांदी! IPL इतिहासात नोंदवला विक्रम भारी 
8
आयर्लंडला जाणारी कतार एअरवेजची फ्लाइट टर्ब्युलन्समध्ये अडकली, 12 जखमी...
9
'रेमल' चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर हाय अलर्ट; पंतप्रधान मोदींनी बोलावली आढावा बैठक
10
KKR vs SRH Final : मिचेल स्टार्कने टाकला Ball of the season! हैदराबादचे ३ फलंदाज तंबूत, Video 
11
मिचेल स्टार्कमुळे जान्हवी कपूर निराश झाली; तिचा Video पाहून बेस्ट ॲक्टिंग पुरस्काराची होतेय मागणी 
12
राजस्थानमध्ये भीषण गरमी; भारत-पाक बॉर्डरवर 55 डिग्री तापमानात BSF जवानांची देशसेवा...
13
भांग पिऊन विमानात चढला अन्..., IndiGo फ्लाइटमध्ये प्रवाशाचा गोंधळ!
14
घरोघरी जात दूध विकलं; मजुरी करणाऱ्या 'त्याने' आज ८०० कोटींचा व्यवसाय उभारला
15
ओडिशात भाजपा उमेदवारावर ईव्हीएमची तोडफोड केल्याचा आरोप, तुरुंगात रवानगी
16
रिषभ पंत आनंदाने केक भरवायला गेला अन् रोहित शर्माने नकार दिला, म्हणाला... Video Viral  
17
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांना मोठा धक्का, निवडणुकीपूर्वी 78 नेत्यांनी साथ सोडली
18
धोखेबाज नवरदेव! २ बायका फजिती ऐका; तिसरे लग्न करताना 'डाव' फसला, दोन्ही पत्नींची एन्ट्री
19
टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक होण्यास मी तयार, पण...; गौतम गंभीरची BCCI समोर अट 
20
"सावकाराकडून शेतकऱ्याला ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न"; वडेट्टीवार म्हणतात, " आता तरी सेटलमेंट..."

स्मृती इराणी यांना बहुधा स्मृतिभ्रंश झालेला दिसतो...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2018 9:21 PM

भाजपाची एक हाती सत्ता आल्यानंतर गेल्या चार वर्षांत या सरकारच्या मंत्र्यांनी अनेक वादग्रस्त विधाने केली आहेत. 

- विनायक पात्रुडकर

भाजपाची एक हाती सत्ता आल्यानंतर गेल्या चार वर्षांत या सरकारच्या मंत्र्यांनी अनेक वादग्रस्त विधाने केली आहेत. वादग्रस्त विधानांमुळे काहींची मंत्रिपदेही बदलली गेली. तरीही त्या मंत्र्यांचा वादग्रस्त विधान करण्याचा मूळ स्वभाव मात्र बदलला नाही. त्याची प्रचिती केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी मुंबईतील मूड इंडिगो कार्यक्रमात केलेल्या विधानाने आली. ३३ कोटी देव असताना शबरीमलाचाच हट्ट का, असे वक्तव्य स्मृती इराणी यांनी कार्यक्रमात केले. विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमात त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी भाषण करताना असे वक्तव्य करणे योग्य नाही. मुळात असे वक्तव्य करण्याची ती जागा नव्हती. करिअर, देश आदी विषयांवर विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन अशा कार्यक्रमात व्हायला हवे. स्मृती इराणी यांना बहुधा आपण कोठे भाषण करत आहोत, याचे भान राहिले नसावे. त्यामुळे त्यांनी असे वक्तव्य केले, असे वक्तव्य म्हणजे धार्मिक श्रद्धेवर टीका करण्यासारखे आहे. विविध संस्कृती, जाती-धर्माने नटलेला आपला देश आहे. त्यातूनही स्मृती इराणी यांनी आठवण करून दिलेल्या ३३ कोटी देवांबद्दल विश्लेषण करायचे झाले तर प्रत्येक देवाची पूजा-अर्चा करण्याची पद्धती वेगळी आहे. काही प्रथा अनेक शतकांपासून सुरू आहेत. या सर्व प्रथांचा अभ्यास करायला एक जन्म कमी पडेल. त्यामुळे भाषणात उदाहरण देताना किमान त्याचा थोडा तरी अभ्यास करणे आवश्यक आहे. एखाद्याचे ज्ञान मोजण्याचा अधिकार कोणालाच नाही. पण आपल्या बोलण्याला किमान नैतिक आधार आहे की नाही हे प्रत्येकाने तपासायला हवे. स्मृती इराणी यांनी देवांबद्दल केलेल्या वक्तव्याला नेमका कसला आधार आहे हे त्या स्वत:ही सांगू शकणार नाहीत. शबरीमला हे प्रकरण अनेक वर्षांपासून न्याय प्रविष्ट होते. न्यायालयाने त्यावर निकाल दिला व ते मंदिर महिलांसाठी खुले केले. आपण लोकशाहीप्रणित देशात राहतो, येथे काय योग्य आहे व काय अयोग्य आहे याचे मूल्यमापन करण्याचा अधिकार न्यायपालिकेला दिलेला आहे. न्यायपालिकेने दिलेल्या निकालात दोष असल्यास त्यावर विचार मंथन करण्यासाठी संसद आहे. ही कार्यपद्धती स्मृती इराणी यांना बहुधा ज्ञात नसावी. जर त्यांना ही कार्यपद्धती ज्ञात असती तर त्यांनी असे वक्तव्य केले नसते. याआधीही स्मृती इराणी यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे त्यांचे मंत्रिपद बदलण्यात आले. त्यातून धडा घेऊन त्यांनी अधिक जबाबदारीने वागणे अपेक्षित आहे. मात्र हा विषय केवळ स्मृती इराणी यांच्यापुरता मर्यादीत नाही. आज अनेक राजकारणी, अभिनेते व समाजातील प्रचलित व्यक्ती बेजबाबदार वक्तव्य करत आहेत. त्याचे परिणाम समाजावर होतात व काही वेळा त्याची चर्चाही भरकटते. तेव्हा समाजात स्थान मिळवलेल्या व्यक्तीने असे वक्तव्य करू नये किंवा वक्तव्य करण्याआधी किमान थोडा विचार करावा, एवढीच प्रार्थना तूर्त आपण करू शकतो.