शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
2
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
3
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
4
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
5
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
6
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
7
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
8
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
9
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
10
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
11
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
12
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
13
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
14
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
15
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
17
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
18
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
19
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
20
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?

शिवशक्ती-भीमशक्ती, लिट्टी चोखा-पुरणपोळी!

By यदू जोशी | Updated: November 25, 2022 14:52 IST

Maharashtra Politics: शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात घरातल्या दुभंगाबरोबरच भाजप, मनसेनेही घुसखोरी केली आहे. त्यामुळे इतरही मतदारांना चुचकारण्यावाचून गत्यंतर नाही!

- यदु जोशी(सहयोगी संपादक, लोकमत)

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला नवीन मित्र शोधावे लागत आहेत. २५ वर्षे युतीत सडल्याचे सांगत भाजपशी काडीमोड घेतल्यावर काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन करणारे ठाकरे यांनी आता ॲड. प्रकाश आंबेडकर यांना साद घातली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि प्रबोधनकारांच्या पुरोगामी विचारांचा धागा त्यांनी त्यासाठी पकडला. असे धागे अधूनमधून कामास येतात. रिडल्स, नामांतर, एमआयएमशी दोस्ती हे विषय त्यावेळी विसरायचे असतात. आता  आंबेडकरांची भीमशक्ती आणि ठाकरेंची शिवशक्ती एकत्र येण्याची चिन्हं आहेत. ॲड. आंबेडकरांमुळे होणारे मतांचे विभाजन भाजपच्या पथ्यावर पडते हा पूर्वानुभव लक्षात घेता ठाकरे त्यांना जवळ घेऊ पाहत असावेत. सध्याच्या दलित नेत्यांपैकी ॲड. प्रकाश आंबेडकर हे व्यापक आणि प्रभावी आहेत. 

ते निवडणुकीचे राजकारण करतात; त्यांचे आठवलेंसारखे मागच्या दाराने नसते. मतांवर परिणाम करणारे नेते म्हणूनच ते ठाकरे आणि अजित पवारांनाही हवे आहेत. भाजपलाही ते कधीकधी हवेच असतात. ॲड. प्रकाश आंबेडकर मात्र दरवेळी नवीन मित्र शोधतात. गेल्या वेळी त्यांनी काँग्रेसला हात केला होता; पण एमआयएमसोबत गेले. यावेळी यादीत शिवसेना दिसते!

पूर्वी मुंबईत निवडणूक म्हटली की  उत्तर भारतीय मतदारांना आकर्षित करण्यासाठी तेथील नेत्यांना प्रचारासाठी इथे आणले जायचे. आता उलटे घडत आहे. शिवसेनेला बिहारमध्ये जावे लागत आहे. आदित्य ठाकरे तेथील मुख्यमंत्री नितीशकुमार, उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांना भेटले. भाजपविरोधातील बिहारी मते मुंबई महापालिका निवडणुकीत आपल्या बाजूने वळावीत हा त्यामागचा हेतू दिसतो. 

नितीशकुमार किंवा तेजस्वी यादव यांच्या पक्षांचे कुठलेही बळ मुंबईत नाही; पण त्यांना मानणारे बिहारीबाबू मात्र आहेत. या दोन नेत्यांशी आपली जवळीक असल्याचे दाखवत मुंबईतील बिहारींवर प्रभाव टाकण्याची खेळी दिसते. हक्काच्या मराठी टक्क्यात आपल्याच घरातून वाटेकरी निर्माण झालेले असल्याने अन्य घरांतील मते आपल्या झोळीत पाडून घेण्याचा खटाटोप त्यांना करावाच लागणार आहे. 

एरवी हुकमी मराठी मतांच्या जोरावर जिंकणाऱ्या शिवसेनेला भाजप, मनसे आणि आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने केलेली विभागणी यामुळे इतरही मतदारांना चुचकारणे आवश्यक झाले आहे. मुंबईतील भाजपविरोधी हिंदीभाषिक मतदार काँग्रेसकडे वळतो, असा आजवरचा अनुभव आहे. तसेच याहीवेळी झाले तर ते ‘मातोश्री’ला परवडणारे नाही.  उद्या समजा शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी अशी युती मुंबईत झाली तरी विनाप्रयासाने हिंदी भाषिक मते ठाकरेसेनेच्या पारड्यात पडण्याची शक्यता नाही. म्हणूनच आज बिहारला गेले, उद्या कदाचित लखनौला जाऊन अखिलेश यादव यांनाही भेटतील. स्वत:च्या कक्षा रुंदावणे ही कधीकधी राजकीय अपरिहार्यतादेखील असते. एकेकाळी छटपूजेला विरोध करणाऱ्यांना ‘मराठी-बिहारी भाईभाई’ म्हणावे लागत आहे. मुंबईतील विजयासाठीच्या प्रयत्नांचा रस्ता व्हाया पाटणा जाताना दिसत आहे. लिट्टी चोखा (बिहारी पदार्थ) आणि पुरणपोळी एकाच ताटात वाढण्याचा हा प्रयत्न आहे.  मुंबईसह राज्यातील महापालिका निवडणुका लगेच होतील असे वाटत नाही. न्यायालयीन निर्णय का येतो यावर निवडणुकांच्या तारखा अवलंबून असतील. मध्ये किमान तीनचार महिन्यांचा काळ गेला तर महापालिकेशी ठाकरे सेनेची असलेली नाळ आणखीच ढिली होईल. कॅगच्या चौकशीचा ससेमिरा लागलेला आहेच. शिंदे-फडणवीस सरकार महापालिकेचा कारभार हाकून मातोश्रीची कोंडी करेल. तोवर ठाकरेंकडील काही खासदार व आमदार गळाला लावले जातील. महापालिका निवडणूक जवळ येईल तसे ठाकरेसेनेचे नगरसेवक शिंदे गटात वा भाजपत जाताना दिसतील.

मनसेनेही भाजप-शिंदेंना साथ दिली तर आणखी अवघड होईल. ही सगळी शक्यता लक्षात घेऊनच धडपड सुरू आहे. दिल्लीहून काँग्रेसश्रेष्ठींचा असा निरोप आहे म्हणतात की मुंबईत ठाकरेसेनेसोबतच निवडणूक लढा. तसे झाले तर दोघांना आपापली व्होट बँक ही एकमेकांकडे वळती करावी लागेल. हिंदुत्ववादी प्रतिमा जपताना ठाकरेसेनेला धर्मनिरपेक्ष मते आपल्याकडे वळवावी लागतील आणि हिंदुत्ववादी मते पदरात पाडून घेतानाही कसरत करावी लागेल. 

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रUddhav Thackerayउद्धव ठाकरेPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडी