शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
2
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
4
दुबईत सोनं खरंच स्वस्त मिळतं? भारतात आणण्याचे नियम काय? किती टॅक्स लागतो? सर्व काही जाणून घ्या
5
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
6
भन्साळींच्या या सिनेमासाठी २ मराठी अभिनेत्यांनीही दिलेली ऑडिशन, वैभव तत्ववादीने मारली 'बाजी'
7
संजय कपूर यांच्या ३०,००० कोटींच्या संपत्तीवरून गृहकलह? कोण आहे प्रिया सचदेव? अचानक का आली चर्चेत?
8
'मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येते; राष्ट्रवादीने मराठ्यांचा वापर केला', प्रकाश सोळंकेंचा पक्षाला घरचा आहेर
9
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
10
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
11
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
12
"पु.ल. देशपांडेंनी मला बघून विचारलं...", आठ वर्षांच्या सचिन पिळगावकरांचा आणखी एक किस्सा
13
एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत रंगेहाथ सापडला, तरी सुषमा अंधारे म्हणतात...
14
पुण्यातील रेव्ह पार्टीत सापडलेले खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर नेमका काय व्यवसाय करतात?
15
Girish Mahajan : रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या पतीला अटक; गिरीश महाजन म्हणतात, "नाथाभाऊंनी जावईबापुंना..."
16
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
17
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
18
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
19
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
20
"निलेश साबळे आणि भाऊ कदम हवे होते...", नवीन 'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या एपिसोडनंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया

Editorial: संपादकीय: राजद्रोहाला स्थगिती! पण एकेकाळी सर्वोच्च न्यायालयानेच दिलेले अटीवर संरक्षण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2022 07:52 IST

स्वातंत्र्यलढ्यात लोकमान्य टिळक आणि महात्मा गांधी यांच्याविराेधात या कलमांखाली ब्रिटिशांनी खटले दाखल केले होते. त्यांना न्यायालयाने दोषीही ठरवून शिक्षा दिली होती. भारत स्वतंत्र झाल्यावर राजद्रोहाचे कलम रद्द करण्याची वारंवार मागणी करण्यात आली.

भारतीय दंडसंहितेतील कलम १२४अ नुसार सरकारविरुद्ध हिंसात्मक पद्धतीने असंतोष निर्माण करणाऱ्यांवर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करता येत होता. त्यालाच आता सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. ब्रिटिशांचे राज्य देशावर असताना १८६० मध्ये भारतीय दंडसंहिता लागू करण्यात आली आणि १८७० मध्ये म्हणजे १५२ वर्षांपूर्वी त्यात १२४अ कलमाचा समावेश करून शासन व्यवस्थेविरुद्ध बंड करणे, ती उलथून टाकण्यासाठी हिंसात्मक कारवाया करणे, याला आळा घालण्यासाठी प्रतिबंध करण्यात आला. स्वातंत्र्यलढ्यात लोकमान्य टिळक आणि महात्मा गांधी यांच्याविराेधात या कलमांखाली ब्रिटिशांनी खटले दाखल केले होते. त्यांना न्यायालयाने दोषीही ठरवून शिक्षा दिली होती. भारत स्वतंत्र झाल्यावर राजद्रोहाचे कलम रद्द करण्याची वारंवार मागणी करण्यात आली. मात्र, सरकारने त्यास विरोध केला नसला, तरी हे कलम रद्द करण्याची भूमिका घेतली नाही. १९६२ मध्ये एका याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाच्या पूर्ण खंडपीठाने निर्णय देताना या कलमाचा गैरवापर करू नये, असे स्पष्ट करीत ते कलम रद्द करण्यास नकार दिला होता.

अलीकडच्या काळात भारतीय दंडसंहितेतील या कलमाचा आधार घेत अनेक जणांना जनआंदोलन करतानाही राजद्रोही कारवाया केल्याचा आरोप करीत खटले दाखल केले आहेत. देशभरात दाखल विविध खटल्यांत सुमारे १३ हजार जणांना राजद्रोहाच्या आरोपाखाली तुरुंगात खितपत पडावे लागले आहे. सरकारविरुद्ध कटकारस्थाने किंवा सरकार या व्यवस्थेविरुद्ध बंड करण्याचा हेतू नसतानाही जनआंदोलनात भाग घेणाऱ्या, सरकारच्या धोरणांविरोधात आंदोलने करणाऱ्यांवर राजद्रोहाचे खटले दाखल केले आहेत. या खटल्यांत संशयित आरोपींना जामीन मिळत नाही. अपवादात्मक परिस्थितीत आजारपणाच्या कारणाने काही दिवसांपुरता जामीन मिळतो. मात्र, खटल्याचा निकाल लागण्यास अनेक वर्षे लागत असल्याने जामीन न मिळता दोषी ठरण्यापूर्वीच एक प्रकारे तुरुंगवास सहन करावा लागतो. भीमा-कोरेगाव दंगलीवरून दाखल करण्यात आलेले राजद्रोहाचे खटले हे त्याचे योग्य उदाहरण म्हणता येईल. दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयात विद्यार्थी संघटनांच्या राजकारणात आणि त्यांच्या राजकीय भूमिकांवरूनही राजद्रोहाचे खटले दाखल केले आहेत. सरन्यायाधीश एन.व्ही. रमणा यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठासमोर या कलमाला आव्हान देणाऱ्या अनेक याचिका आल्या होत्या. त्यांची सुनावणी करताना केंद्र सरकारने वसाहतवादीकाळात ब्रिटिशांनी लागू केलेले हे कलम रद्द करणार का? अशी विचारणा खंडपीठाने केली होती.

दोनच दिवसांपूर्वी केंद्र सरकारने हे कलम रद्द करण्यास नकार देत याचा फेरविचार करता येईल. शिवाय, या कलमाचा गैरवापर करण्यात आला आहे, याचाही आढावा घेता येईल, अशी भूमिका मांडली. सर्वोच्च न्यायालयाने या भूमिकेचा स्वीकार करीत केंद्र सरकारने फेरआढावा घेऊन किंवा फेरविचार करून आपली भूमिका जुलैमध्ये सुनावणी होताना मांडावी, असे बजावले. शिवाय, या कलमानंतर नव्याने गुन्हे दाखल करू नये म्हणून या कलमालाच (१२४अ) स्थगिती देऊन टाकली. स्वतंत्र भारतात अनेक जनआंदोलने झाली, पण ब्रिटिशांविरोधातील स्वातंत्र्यलढ्यासारखी संपूर्ण शासनव्यवस्था नाकारणारी आंदोलने फारच कमी झाली आहेत. स्वतंत्र भारताने राज्यघटना स्वीकारताना अभिव्यक्ती स्वातंत्र्याबरोबरच सर्व प्रकारच्या स्वातंत्र्याचा पुरस्कारच करण्यात आला होता. तरीही, कोणी व्यक्ती वा व्यक्तींच्या समूहाने सरकारविरोधात बंडाची भाषा केली, तर राजद्रोहाच्या कलमाचा अंमल करण्यास संधी दिली होती. केंद्रात भाजपचे सरकार आल्यानंतर त्यांच्या धोरणांविरोधात भूमिका घेणाऱ्या अनेकांवर राजद्रोहाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्या साऱ्यांचा अतिरेकी कारवायांशी संबंध नाही. हनुमान चालिसा म्हणून महाराष्ट्र सरकारच्या धोरणाचा निषेध करणाऱ्या राणा दाम्पत्याविरोधातदेखील राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला.  हा खरेतर कायद्याचा गैरवापर  होता अन् आहे. सरकारने फेरविचाराचा प्रस्ताव सादर करेपर्यंत सर्वोच्च न्यायालयाने या कलमालाच स्थगिती दिली आहे. यापूर्वी दाखल गुन्ह्यांतील आराेपींना जामिनासाठी अर्ज करण्याची मुभा देऊन न्यायालयाने दिलासा दिला आहे. केंद्र सरकारचा याला विरोध असला, तरी फेरआढावा घेऊन भूमिका स्पष्ट करावी लागणार आहे. न्यायालयाने दिशा स्पष्ट केली आहे. आता नवे गुन्हे दाखल करण्यासाठी कलमाच्या गैरवापरास चाप लावला आहे.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयseditionदेशद्रोह