शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

आजचा अग्रलेख - सुरक्षा हवी, परीक्षाही हवी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2020 02:28 IST

अंतिम वर्षाची परीक्षा हा केवळ उत्तीर्ण होण्याचा विषय नसतो. त्यावर विद्यार्थ्यांचे भवितव्य अवलंबून असते. माणूस कितीही शिकला तरी पदवी परीक्षेत किती गुण मिळाले,

महाराष्ट्रात विद्यापीठांच्या अंतिम परीक्षांवरून चाललेला वाद अनावश्यक आहे. कोविड-१९चा फैलाव रोखण्यासाठी सरकारने अनेक उपाययोजना केल्या. अंतिम वर्गाच्या परीक्षा न घेता विद्यार्थ्यांना सरासरी गुण देऊन उत्तीर्ण करावे, ही यातील एक उपाययोजना. ही उपाययोजना सुचविणारे डोके सचिवांचे की सत्तेतील युवराजांचे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. प्रशासकीय परीक्षांचा अनुभव गाठीशी असलेल्या सचिवांकडून अशी उपाययोजना सुचविली जाणे शक्य वाटत नाही. विद्यार्थिवर्गात लोकप्रियता मिळविण्याचा सोस युवराजांना असावा. परीक्षा रद्द केल्या की, विद्यार्थी व पालकवर्ग खूश होईल, अशी त्यांची धारणा असावी. शाखाप्रमुख पातळीवरून विचार केला तर युवराजांची अशी धारणा होणे चुकीचे नाही. यामध्ये लक्षावधी युवकांच्या भवितव्याचे नुकसान होत असले तरी विनासायास परीक्षेत पास होण्याचे समाधान विद्यार्थिवर्गाला द्यावे, असा उदात्त हेतू यामागे असावा. घरचाच निर्णय असल्यामुळे परीक्षा रद्द करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी लगोलग केली. आदेश दिला की काम भागले हा शिवसेनेचा खाक्या सरकारमध्येही चालावा अशी मुख्यमंत्र्यांची अपेक्षा. लोकशाही व्यवस्थेत नियम असतात. निर्णयप्रक्रियेची साखळी असते व निर्णय घेण्याचे अधिकारक्षेत्र वाटून दिलेले असते याची कल्पना मुख्यमंत्र्यांना नसावी. मुख्यमंत्र्यांनी घोषणा करताच परीक्षा घ्यावी की घेऊ नये, हा निर्णय कुलपती म्हणून राज्यपालांच्या अधिकारात येतो, याची आठवण राजभवनातून करून देण्यात आली. तसे होताच राजभवन टीकेचे लक्ष्य झाले. गेल्या सरकारमध्ये सत्तेत राहून शिवसेना जशी वागत होती तसे राज्यपाल वागतात, असा समज होऊन परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयात ते कोलदांडा घालीत आहेत, असे सांगण्यात आले. या सर्व घटनांमधून उभे राहणारे चित्र सरकारबद्दल बरे मत बनविणारे नाही. परीक्षा उत्तम रीतीने उत्तीर्ण होण्यामध्ये विद्यार्थ्यांचे हित आहे व ते हित जपण्यास सरकार बांधील आहे, अशी स्पष्ट भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतली असती तर ते उचित ठरले असते. आपत्ती येते व जाते, पण परीक्षेचे प्रमाणपत्र हे आयुष्यभर चालणारे असते.

अंतिम वर्षाची परीक्षा हा केवळ उत्तीर्ण होण्याचा विषय नसतो. त्यावर विद्यार्थ्यांचे भवितव्य अवलंबून असते. माणूस कितीही शिकला तरी पदवी परीक्षेत किती गुण मिळाले, याची चाचपणी नोकरी देताना नेहमी केली जाते. त्यावेळी ‘कोविड-उत्तीर्ण’ असा शेरा बसलेला असेल तर तो डाग विद्यार्थ्यांना आयुष्यभर बाळगावा लागेल. परीक्षा देणे ऐच्छिक ठेवूनही हा प्रश्न सुटणारा नाही. असे केल्यास ऐच्छिक व अनैच्छिक असे दोन वर्ग विद्यार्थ्यांत तयार होतील. कोविड काळात शारीरिक अंतर ठेवणे अत्यावश्यक असल्याने परीक्षा घेता येत नाहीत, हा युक्तिवाद फसवा आहे. जुलै किंवा आॅगस्ट महिन्यात परीक्षा घेता येऊ शकतात. सत्तरच्या दशकात शिक्षकांच्या संपानंतर उशिरा परीक्षा घेतल्या गेल्या होत्या व शैक्षणिक वर्ष उशिरा सुरू झाले होते. जगातील अनेक विद्यापीठांत शैक्षणिक वर्षे उशिरा सुरू होतात. अंतिम वर्षाच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मर्यादित असल्याने शारीरिक अंतर राखून परीक्षा घेणे अशक्य नाही. मध्य प्रदेश, कर्नाटक अशा राज्यांत अशा परीक्षा घेतल्या आहेत. सध्या डोंबिवली-कल्याणमध्ये बस पकडण्यासाठी होणाºया गर्दीपेक्षा अंतिम वर्षाच्या परीक्षेसाठी होणारी गर्दी खूपच कमी असेल. प्रशासनाने मनात आणले तर विद्यापीठातून परीक्षा घेणे अशक्य नाही. किंबहुना, एक आव्हान म्हणून त्याकडे पाहिले पाहिजे आणि विद्यार्थ्यांमध्येही परीक्षेला बसण्याची हिंमत निर्माण केली पाहिजे. स्पर्धात्मक जगाचा एकीकडे घोष करायचा आणि स्पर्धेसाठी आवश्यक असणारी परीक्षा टाळायची, ही विसंगती विद्यार्थ्यांचे नुकसान करणारी आहे. आपला हेका चालविण्यासाठी परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाला कायद्याच्या चौकटीत कोंबण्याचा आटापिटा सरकारने सोडून द्यावा. सुरक्षा की परीक्षा, असा हा विषय नसून सुरक्षेसह परीक्षा ही भूमिका घ्यावी. राज्यपालांना त्यांच्या अधिकारात काम करू द्यावे व सरकारने आपल्या अधिकारात समर्थपणे परीक्षा घ्याव्यात. विद्यार्थिवर्ग खूश होईल या भ्रामक समजुतीत राहू नये.माणूस कितीही शिकला तरी पदवी परीक्षेत किती गुण मिळाले, याची चाचपणी नोकरी देताना नेहमी केली जाते. त्यावेळी ‘कोविड-उत्तीर्ण’ असा शेरा बसलेला असेल, तर तो डाग विद्यार्थ्यांना आयुष्यभर बाळगावा लागेल. परीक्षा देणे ऐच्छिक ठेवूनही हा प्रश्न सुटणारा नाही.

टॅग्स :Mumbaiमुंबईexamपरीक्षा