शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

‘संकट’ व ‘संधी’चे योग्य संतुलन!

By admin | Updated: March 1, 2016 03:21 IST

२०१६-१७ सालासाठीचा आणि मोदी सरकारचा तिसरा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सोमवारी संसदेला सादर केला.

२०१६-१७ सालासाठीचा आणि मोदी सरकारचा तिसरा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सोमवारी संसदेला सादर केला. आपल्या देशात आर्थिक सुधारणांच्या कार्यक्रमाला १९९१ साली सुरुवात झाली, अशा अर्थाने आर्थिक सुधारणांचे २०१६ हे रौप्य महोत्सवी वर्ष आहे. या २५ वर्षांच्या काळात जवळजवळ सर्वच राजकीय पक्ष या ना त्या स्वरूपात कधी ना कधीतरी केंद्र सरकारात सत्तेत सहभागी होते. त्यामुळे या २५ वर्षांच्या अर्थकारणाच्या फलितात प्रत्येकच पक्षाचा कमी-अधिक का होईना, पण वाटा आहे. या २५ वर्षांचे वैशिष्ट्य म्हणजे सरकारची राजकीय रंगसंगती जरी बदलली, तरी ढोबळ मानाने आपल्या देशाच्या अर्थकारणाची दिशा कायम राहिली. वेळप्रसंगी सरकारच्या रंगसंगतीनुसार उद्दिष्टात कधी बदल झाला नाही. तरी त्याच्या प्राधान्यक्रमात किंवा योजनांच्या नावांत बदल झाला असेल, या सातत्यपूर्ण अर्थकारणामुळे १९९१ साली जागतिक अर्थकारणाच्या परिघाबाहेरच असणारी आपली अर्थव्यवस्था, आता अगदी जरी जागतिक अर्थकारणाचा केंद्रबिंदू झाली नसली, तरी आपण एक अर्थव्यवस्था म्हणून तशा केंद्रबिंदूच्या नक्कीच जवळ आहोत. चीन आणि भारत दे दोनच देश आजमितीला असे आहेत की, ज्याच्या राष्ट्रीय ढोबळ उत्पन्नाच्या वाढीचा दर अलीकडच्या काळात ७ टक्क्यांहून जास्त राहिला आहे. त्यांच्या इतिहासाच्या तुलनेत या दोन देशांचा सध्याचा हा दर जरी कमी असला, तरी आजमितीला जगातील इतर देश त्यांच्या अर्थकारणाचा जो दर दाखवत आहेत, त्यापेक्षा हे दर निश्चितच सरस आहेत. त्यातही चीनमधील सध्याचे आर्थिक वातावरण आणि एकंदरीतच राजकीय व सामाजिक वातावरण लक्षात घेता, भारत ही एकमेव अर्थव्यवस्था जगामध्ये अशी आहे की, ज्याच्याकडे अनेक देश आशेने बघत आहेत. मात्र, याचा अर्थ असा नव्हे की, आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेपुढे काहीही समस्या नाहीत. अर्थात, अशी परिस्थिती अपवादानेच कधीतरी वाट्याला येते. निर्यातीचा मंदावलेला वेग, उद्योग क्षेत्राचा असमाधानकारक प्रवास, सेवाक्षेत्रामध्ये पहिल्याइतका न राहिलेला उत्साह, जागतिक मंदीमुळे घसरलेले निर्यातीचे प्रमाण, गेल्या दोन-तीन वर्षांच्या सततच्या कमी पावसाच्या प्रमाणामुळे कृषी क्षेत्रावर झालेला विपरित परिणाम आणि एकंदरीतच त्याचा ग्रामीण क्षेत्रावर झालेला वाईट परिणाम, हे आर्थिक घटक आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेपुढे आजमितीला संकट म्हणून उभे आहेत. त्याच्या जोडीला देशभरात या ना त्या मुद्द्यांवरून निर्माण होणारी सामाजिक अशांतता, हीसुद्धा देशाच्या अर्थव्यवस्थेपुढे काही प्रश्न उभे करत असते. येणाऱ्या काळात होऊ घातलेल्या काही राज्यांच्या विधानसभांच्या निवडणुका हासुद्धा प्रश्न असतोच. त्याच्या जोडीला सध्या लोकसभा आणि राज्यसभेत बहुमतात असलेल्या पक्षांचे गणित हेही अनेक प्रश्न अवघड करत असते. त्यातून अनेक महत्त्वाचे आर्थिक निर्णय संसदेमध्ये संमत करून घेणे, मोदी सरकारला तितकेसे सोपे राहत नाही. अशा पार्श्वभूमीवर येणाऱ्या या अर्थसंकल्पाकडून काही विशेष अपेक्षा ठेवणे धाडसाचे ठरले असते.या अर्थसंकल्पाबाबत जाणवणारी दुसरी गोष्ट म्हणजे, अर्थसंकल्पीय भाषणाची जवळजवळ पहिली २० ते २५ मिनिटे ही कृषी क्षेत्राच्या चर्चेबाबत होती. कृषी क्षेत्राबाबत स्वतंत्र अर्थसंकल्प देण्यात यावा, अशी मागणी गेली अनेक वर्षे करण्यात येत आहे. असे जरी झाले नसले, तरी सर्वसाधारणपणे कृषी क्षेत्र आणि एकंदरीतच ग्रामीण विभाग यांना केंद्रभूत ठेवत, अनेक योजना या अर्थसंकल्पात सादर करण्यात आल्या आहेत.