शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
6
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
7
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
8
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
10
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
11
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
12
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
14
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
15
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
16
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
17
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
18
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
19
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
20
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...

‘संकट’ व ‘संधी’चे योग्य संतुलन!

By admin | Updated: March 1, 2016 03:21 IST

२०१६-१७ सालासाठीचा आणि मोदी सरकारचा तिसरा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सोमवारी संसदेला सादर केला.

२०१६-१७ सालासाठीचा आणि मोदी सरकारचा तिसरा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सोमवारी संसदेला सादर केला. आपल्या देशात आर्थिक सुधारणांच्या कार्यक्रमाला १९९१ साली सुरुवात झाली, अशा अर्थाने आर्थिक सुधारणांचे २०१६ हे रौप्य महोत्सवी वर्ष आहे. या २५ वर्षांच्या काळात जवळजवळ सर्वच राजकीय पक्ष या ना त्या स्वरूपात कधी ना कधीतरी केंद्र सरकारात सत्तेत सहभागी होते. त्यामुळे या २५ वर्षांच्या अर्थकारणाच्या फलितात प्रत्येकच पक्षाचा कमी-अधिक का होईना, पण वाटा आहे. या २५ वर्षांचे वैशिष्ट्य म्हणजे सरकारची राजकीय रंगसंगती जरी बदलली, तरी ढोबळ मानाने आपल्या देशाच्या अर्थकारणाची दिशा कायम राहिली. वेळप्रसंगी सरकारच्या रंगसंगतीनुसार उद्दिष्टात कधी बदल झाला नाही. तरी त्याच्या प्राधान्यक्रमात किंवा योजनांच्या नावांत बदल झाला असेल, या सातत्यपूर्ण अर्थकारणामुळे १९९१ साली जागतिक अर्थकारणाच्या परिघाबाहेरच असणारी आपली अर्थव्यवस्था, आता अगदी जरी जागतिक अर्थकारणाचा केंद्रबिंदू झाली नसली, तरी आपण एक अर्थव्यवस्था म्हणून तशा केंद्रबिंदूच्या नक्कीच जवळ आहोत. चीन आणि भारत दे दोनच देश आजमितीला असे आहेत की, ज्याच्या राष्ट्रीय ढोबळ उत्पन्नाच्या वाढीचा दर अलीकडच्या काळात ७ टक्क्यांहून जास्त राहिला आहे. त्यांच्या इतिहासाच्या तुलनेत या दोन देशांचा सध्याचा हा दर जरी कमी असला, तरी आजमितीला जगातील इतर देश त्यांच्या अर्थकारणाचा जो दर दाखवत आहेत, त्यापेक्षा हे दर निश्चितच सरस आहेत. त्यातही चीनमधील सध्याचे आर्थिक वातावरण आणि एकंदरीतच राजकीय व सामाजिक वातावरण लक्षात घेता, भारत ही एकमेव अर्थव्यवस्था जगामध्ये अशी आहे की, ज्याच्याकडे अनेक देश आशेने बघत आहेत. मात्र, याचा अर्थ असा नव्हे की, आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेपुढे काहीही समस्या नाहीत. अर्थात, अशी परिस्थिती अपवादानेच कधीतरी वाट्याला येते. निर्यातीचा मंदावलेला वेग, उद्योग क्षेत्राचा असमाधानकारक प्रवास, सेवाक्षेत्रामध्ये पहिल्याइतका न राहिलेला उत्साह, जागतिक मंदीमुळे घसरलेले निर्यातीचे प्रमाण, गेल्या दोन-तीन वर्षांच्या सततच्या कमी पावसाच्या प्रमाणामुळे कृषी क्षेत्रावर झालेला विपरित परिणाम आणि एकंदरीतच त्याचा ग्रामीण क्षेत्रावर झालेला वाईट परिणाम, हे आर्थिक घटक आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेपुढे आजमितीला संकट म्हणून उभे आहेत. त्याच्या जोडीला देशभरात या ना त्या मुद्द्यांवरून निर्माण होणारी सामाजिक अशांतता, हीसुद्धा देशाच्या अर्थव्यवस्थेपुढे काही प्रश्न उभे करत असते. येणाऱ्या काळात होऊ घातलेल्या काही राज्यांच्या विधानसभांच्या निवडणुका हासुद्धा प्रश्न असतोच. त्याच्या जोडीला सध्या लोकसभा आणि राज्यसभेत बहुमतात असलेल्या पक्षांचे गणित हेही अनेक प्रश्न अवघड करत असते. त्यातून अनेक महत्त्वाचे आर्थिक निर्णय संसदेमध्ये संमत करून घेणे, मोदी सरकारला तितकेसे सोपे राहत नाही. अशा पार्श्वभूमीवर येणाऱ्या या अर्थसंकल्पाकडून काही विशेष अपेक्षा ठेवणे धाडसाचे ठरले असते.या अर्थसंकल्पाबाबत जाणवणारी दुसरी गोष्ट म्हणजे, अर्थसंकल्पीय भाषणाची जवळजवळ पहिली २० ते २५ मिनिटे ही कृषी क्षेत्राच्या चर्चेबाबत होती. कृषी क्षेत्राबाबत स्वतंत्र अर्थसंकल्प देण्यात यावा, अशी मागणी गेली अनेक वर्षे करण्यात येत आहे. असे जरी झाले नसले, तरी सर्वसाधारणपणे कृषी क्षेत्र आणि एकंदरीतच ग्रामीण विभाग यांना केंद्रभूत ठेवत, अनेक योजना या अर्थसंकल्पात सादर करण्यात आल्या आहेत.