शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
2
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
3
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
4
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!
5
Pune Rave Party: "तुमच्या तर दिव्याखालीच अंधार"; चित्रा वाघांनी सुप्रिया सुळे, रोहिणी खडसेंना सुनावले
6
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
7
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
8
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
9
आजारी लेकीला रुग्णालयात घेऊन चाललेले वडील, BMW ची धडक; मन हेलावून टाकणारी घटना
10
"कोणी ड्रममध्ये भरत आहे तर कोणी...", शिव ठाकरेला वाटते लग्नाची भीती, म्हणाला- "हा तर कर्मा..."
11
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
12
दुबईत सोनं खरंच स्वस्त मिळतं? भारतात आणण्याचे नियम काय? किती टॅक्स लागतो? सर्व काही जाणून घ्या
13
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
14
भन्साळींच्या या सिनेमासाठी २ मराठी अभिनेत्यांनीही दिलेली ऑडिशन, वैभव तत्ववादीने मारली 'बाजी'
15
संजय कपूर यांच्या ३०,००० कोटींच्या संपत्तीवरून गृहकलह? कोण आहे प्रिया सचदेव? अचानक का आली चर्चेत?
16
'मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येते; राष्ट्रवादीने मराठ्यांचा वापर केला', प्रकाश सोळंकेंचा पक्षाला घरचा आहेर
17
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
18
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
19
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
20
"पु.ल. देशपांडेंनी मला बघून विचारलं...", आठ वर्षांच्या सचिन पिळगावकरांचा आणखी एक किस्सा

सकारात्मक जनमानसाची गरज

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2018 06:07 IST

सार्वजनिक आरोग्य महत्त्वाचे की धांगडधिंगा घालून सण साजरे करणे महत्त्वाचे याचा विचार सुजाण नागरिकांनीच करावा.

- डॉ. महेश बेडेकरकाहीच दिवसांपूर्वी उच्च न्यायालयाने विसर्जन मिरवणुकीत साउंड सिस्टीमचा वापर करण्यास तात्पुरती बंदी घातली. या निर्णयामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्रातील सण साजरे करण्याच्या पद्धतीबाबत उलटसुलट चर्चा झाल्या. न्यायालये धर्माविरुद्ध आहेत, अशा चर्चांना तर उधाण आले. मंडपांबाबत न्यायालयाने घातलेल्या निर्बंधामुळे नाराज असलेले राजकारणी व त्यांचे कार्यकर्ते या निर्णयामुळे अधिक नाराज झाले. न्यायालये आणि जनहित याचिकाकर्ते धर्माविरुद्ध आहेत, असा समज अधिक बळावला आणि मग चिथावणीखोर वक्तव्ये करून सामान्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू झाला. मात्र, या वक्तव्यांना किती बळी पडायचे, याचा निर्णय सामान्यांनीच घ्यावा. सार्वजनिक आरोग्य महत्त्वाचे की धांगडधिंगा घालून सण साजरे करणे महत्त्वाचे याचा विचार सुजाण नागरिकांनीच करावा. राज्य घटनेने नागरिकांना धर्माचे पालन करण्याची मुभा दिली असली तरी याच घटनेने नागरिकांना शांततेत जीवन जगण्याचाही अधिकार दिला आहे, याचा विसर राजकारण्यांनी व सामान्यांनी स्वत:ला पडू देऊ नये.जे उद्दिष्ट ठेवून लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला, त्याच उद्दिष्टाला आजची सार्वजनिक मंडळे हरताळ फासताना दिसत आहेत. गेल्या २०-२५ वर्षांत सार्वजनिक गणेशोत्सवात प्रबोधनाचे काम तर दूरच; पण दारू पिऊन ‘मुन्नी बदनाम हुई’सारख्या गाण्यांवर हुल्लडबाजी करणारे अधिक दिसतील. अशाच प्रकारची गाणी लावण्यासाठी लोकांना डी.जे. हवा असतो. भजन, आरती, व्याख्यानांसाठी डी.जे. हवा कशाला? पुन्हा एकदा पारंपरिक पद्धतीने सण साजरे करायला लागलो तर डी.जे.ची आवश्यकताच भासणार नाही. परिणामी, लोकांनाही त्रास होणार नाही आणि त्यामुळे न्यायालयातही जावे लागणार नाही.गेल्या काही वर्षांत सण साजरे करण्याचे स्वरूप वेगाने बदलले. सण आणि राजकारण, असे समीकरण दिसत आहे. राजकीय नेते प्रसिद्धी मिळवण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून सण साजरे करत आहेत.उच्च न्यायालयात २०१०मध्ये दाखल केलेल्या जनहित याचिकेत केवळ ध्वनिप्रदूषणाचाच मुद्दा उपस्थित करण्यात आला नव्हता तर सणांच्या बदलत्या स्वरूपाबद्दलही चिंता व्यक्त करण्यात आली होती. जिथे माणसांना चालायला व वाहन चालवायला धड जागा नाही, अशा ठिकाणी गणपती, देवीसाठी मंडप बांधण्यास परवानगी देणे कितपत योग्य? राज्यघटनेने लोकांना सण साजरा करण्याची मुभा दिली आहे, असा कोणी मुद्दा उपस्थित करत असेल तर त्याच राज्यघटनेने शांततेचे जीवन जगण्याचा व रस्त्यावरून विनाअडथळा चालण्याचा अधिकारही दिला आहे, याचे स्मरण असावे.साउंड सिस्टीम, मंडप, खड्डे यांबाबत न्यायालयाने दिलेला निर्णय लोकप्रिय नसेल तरी लोकहिताचा जरूर आहे. जागतिक आरोग्य संस्थेच्या (डब्ल्यूएचओ) म्हणण्यानुसार, एका ठरावीक मर्यादेपुढे आवाजाची पातळी वाढल्यास माणसाला केवळ बहिरेपणा येत नाही, तर शरीरातील अन्य अवयवांनाही हानी पोहोचते. त्यांच्या या दाव्याला कोणीही फेटाळू शकत नाही. अगदी सर्वोच्च न्यायालयही नाही. याचाच विचार करून न्यायालयाने काही मार्गदर्शक तत्त्वे आखली. परंतु, काही राजकारण्यांनी न्यायालय आणि याचिकाकर्ते धर्माविरुद्ध आहेत, अशी आवई उठविली. या राजकारण्यांनी लोकांची माथी भडकविण्यापेक्षा न्यायालयाचे आदेश समजून घेत त्यांच्या कार्यकर्त्यांना त्यानुसार वागायला भाग पाडले पाहिजे. तसेच यात पोलीस यंत्रणा आणि महापालिकेची महत्त्वाची भूमिका आहे. दुर्दैवाने या दोन्ही यंत्रणा निष्क्रिय असल्याचे पाहायला मिळते.उच्च न्यायालयाच्या शुक्रवारच्या निर्णयानंतर साउंड सिस्टीम भाड्याने देणाऱ्यांच्या रोजगाराचा प्रश्न काही लोकांनी उपस्थित केला. पण एक - दीड लाख लोकांच्या रोजगारांसाठी लाखो लोकांचे आरोग्य धोक्यात घातले जाऊ शकते का? नागरिकांच्या आरोग्याला असलेला धोका लक्षात घेऊन सरकारने गुटखा, विडी बंद केली. त्या वेळीही लाखो लोक बेरोजगार झाले. पण लोकांचे आरोग्य राखण्यासाठी सरकारला बंदीचे पाऊल उचलणे भाग होते. बेरोजगारीची सबब पुढे करीत सार्वजनिक ठिकाणी साउंड सिस्टीम वापरण्याची परवानगी मिळू शकत नाही. राजकीय नेत्यांना मोठ्या धूमधडाक्यात सण साजरे करायचे असतील तर त्यांना सुवर्णमध्य काढणे सोपे आहे. त्यासाठी प्रत्येक पक्षाने एकच सार्वजनिक गणपती बसवावा. कोणत्याही चांगल्या बदलाला सुरुवातीला विरोध होतोच, तसा इतिहासही आहे. सुजाणांनी न्यायालयाच्या निर्णयाचा सकारात्मकतेने विचार करावा आणि राजकारण्यांच्या हाळीला कितपत साथ द्यावी, याचा निर्णय घ्यावा.

(लेखक सामाजिक कार्यकर्ते आहेत.) 

टॅग्स :Ganpati Festivalगणेशोत्सवMumbai High Courtमुंबई हायकोर्ट