शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
2
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
3
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
5
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
6
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
7
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
8
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
9
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
10
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
11
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
12
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
13
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
14
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
15
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
16
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
17
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
18
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
19
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
20
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 

लोकशाहीतील लोकांची जबाबदारी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2018 06:20 IST

सध्या संविधान जनजागृती अभियान सुरू आहे. लोकशाहीतील सरकारे ही लोकांची सेवा करण्यासाठीच सत्तेवर आलेली असतात.

सध्या संविधान जनजागृती अभियान सुरू आहे. लोकशाहीतील सरकारे ही लोकांची सेवा करण्यासाठीच सत्तेवर आलेली असतात. अशा सरकारांशी असहमत होणे, त्याच्या धोरणांवर टीका करणे यांसारखे अनेक अधिकार केवळ लोकशाहीमुळेच लोकांना मिळालेले असतात. पण अशा सर्व गोष्टी सुरळीतरीत्या चालू राहण्यासाठी लोकांनाही काही नैतिक व कायदेशीर बंधने स्वीकारावी लागतात. काही नियमांचे पालन करावे लागते. ते जर केले नाही, तर लोकशाही धोक्यात येऊ शकते. कोणत्याही देशातील लोकशाही एकदा धोक्यात आल्यास तिची पुनर्स्थापना करण्यासाठी त्या देशाला किंंवा त्यातील लोकांना फार मोठी किंंमत चुकवावी लागते. अशा स्थितीत एकदा मिळालेल्या लोकशाहीचे प्राणपणाने संरक्षण करणे ही पहिली व सर्वात मोठी जबाबदारी लोकशाही राष्ट्रांतील लोकांवर पडलेली असते.

लोकशाहीचे संरक्षण करणे ही एक गोष्ट, तर तिची यशस्वी अंमलबजावणी करणे ही दुसरी तितकीच महत्त्वाची गोष्ट आहे. कागदावर लोकशाही आणि प्रत्यक्षात हुकूमशाही अशी परिस्थिती अनेकदा अनेक देशांत निर्माण झालेली अलीकडे पाहायला मिळते. ही परिस्थिती लोकांसाठी अत्यंत घातक सिद्ध होऊ शकते. त्यामुळे लोकशाहीतील सर्व संस्था लोकशाही पद्धतीने, पारदर्शकपणे आणि योग्य कार्यक्षमतेने चालतील, हे पाहणे, ही लोकशाही राष्ट्रांतील लोकांची अत्यंत महत्त्वपूर्ण अशी जबाबदारी असते. ही जबाबदारी लोकांनी व्यवस्थितपणे पार पाडली नाही, तर अशा ठिकाणी लोकशाही असूनही नसल्यासारखी होते.

काही लोकांना हुकूमशाहीचे मोठे आकर्षण वाटत असते. पण हुकूमशाहीचे दीर्घकालीन दुष्परिणाम त्यांच्या लक्षात येत नाहीत. लोकशाही ही काही प्रमाणात संथगतीने चालणारी व्यवस्था असली, तरी ती सहसा मोठे अपघात कधी घडवत नाही. निदान ज्या देशांतील लोकमत हे जागरूक लोकमत असते, त्या देशांत तरी फार मोठे अनर्थ सहसा घडत नाहीत. साहजिकच आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना-घडामोडींचे सम्यक ज्ञान करून घेणे अर्थात सतत जागे राहणे ही लोकशाही राष्ट्रांतील लोकांची तिसरी महत्त्वाची जबाबदारी असते. काही हुशार राजकारणी किंंवा त्यांच्या समर्थक संस्था-संघटनांना जनतेच्या डोळ्यांत धूळफेक करता येऊ नये, देशाला भलत्याच दिशेला नेता येऊ नये किंंवा जनतेच्या हिताचा बळी देऊन एखादा संकुचित स्वार्थ साधता येऊ नये, यासाठी हे करणे गरजेचे असते.

लिखित संविधान हे आधुनिक राजकीय व्यवस्थांचे एक अभिन्न अंग आता बनलेले आहे. सुदैवाने जगातील सर्वात मोठे लिखित संविधान भारताला लाभलेले आहे. ते जगातील सर्वश्रेष्ठ लिखित संविधान असल्याचे मत भारतातील व भारताबाहेरीलही अनेक विद्वानांनी वेळोवेळी व्यक्त केलेले आहे. मात्र तरीही देशाच्या संविधानातील विविध तरतुदींबाबतची विधायक चर्चा अजूनही हव्या त्या प्रमाणात देशात होताना दिसत नाही. अशा चुकांचा मोठा फटका लोकशाही राष्ट्रांना बसत असतो. अशा देशांत लोकांचे राजकीय शिक्षण योग्य प्रकारे होत नाही व त्यामुळे लोकशाही संस्था परिणामकारकपणे काम करू शकत नाहीत. आपल्या देशबांधवांचे प्रभावी राजकीय शिक्षण घडवून आणणे, ही त्यामुळेच लोकशाही राष्ट्रांतील लोकांची एक महत्त्वपूर्ण जबाबदारी ठरते.

नैतिकता हा लोकशाहीचा पाया आहे. लोकशाही म्हणजे काही झुंडशाही नव्हे, हे आपण सर्वांनी लक्षात घेण्याची गरज आहे. लोकशाहीत सर्वसाधारणपणे बहुमताने सर्व निर्णय घेतले जातात. परंतु बहुमताच्या आधारे घेतले गेलेले सर्वच निर्णय नेहमी योग्यच असतात, असे नाही. समाजातील बहुसंख्य लोक कितपत प्रामाणिक आहेत, दूरदृष्टीचे आहेत, नीतिमान आहेत, अभ्यासू आहेत किंंवा परिस्थितीचे योग्य भान असलेले आहेत, यांवरही अनेक निर्णयांची गुणवत्ता अवलंबून असते. लोकशाहीतील सर्व निर्णय त्यामुळेच जनतेच्या हाती न सोपवता ते त्यांच्या प्रतिनिधींच्या हाती सोपवलेले असतात. पण असे प्रतिनिधी जर दूरदृष्टीचे, नीतिमान, नि:स्वार्थी, अभ्यासू इ. नसतील तर ते अचूक निर्णय घेऊ शकत नाहीत. अशा स्थितीत लोकशाहीचा गाडा सुरळीतपणे चालू शकत नाही. लोकशाही राष्ट्रांतील लोकांवर या अंगानेही फार मोठी जबाबदारी असते.

लोकशाहीत कोणत्याही एकाच पक्षाच्या निष्ठेशी स्वत:ला कायमस्वरूपी बांधून घेण्याची गरज नसते. खरे तर अशा ठिकाणी उत्तम प्रकारे काम करण्याची स्पर्धाच सर्व लोकांनी राजकीय पक्षांमध्ये लावून दिली पाहिजे. अशा स्पर्धेत सर्व स्पर्धकांना समान संधी मिळेल व स्पर्धेसाठीची पुरेशी साधनसामग्रीही मिळेल, हेही पाहिले पाहिजे. भारतासारख्या प्रगतशील व शांतताप्रिय देशातील लोक जर लोकप्रतिनिधींच्या संदर्भात आणि इतरही सर्व क्षेत्रांत जातीनिरपेक्ष, धर्मनिरपेक्ष इ. झाले, तर इथल्या लोकशाहीला यशस्वी होण्यापासून कोणीच रोखू शकणार नाही. भारतासारख्या लोकशाही राष्ट्रांतील लोकांनी त्यामुळेच त्यांच्या लोकशाहीविषयक महत्त्वपूर्ण जबाबदाºया प्राधान्यक्रमाने पार पाडल्या पाहिजेत.

 

डॉ़ रविनंद होवाळ(प्रवर्तक, संविधान जनजागृती अभियान)