शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
8
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

पावसाळी छत्र्यांसारख्या उगवणाऱ्या ‘रिल स्टार्स’चे करायचे काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2024 06:36 IST

प्रत्येकालाच झटपट प्रसिद्ध व्हायचे आहे. ‘सेलिब्रिटी’ बनायचे आहे. त्यासाठीचा सोपा मार्ग काय, तर रिल्स ! पण त्यासाठीचे भान कोण बाळगणार?

डॉ. अंजली मुळके, माजी वैद्यकीय अधिकारी

रिल्सच्या नादात आणखी किती जणांचे बळी जाणार आहेत, याची कल्पनाही करवत नाही, इतक्या घटना एकामागोमाग घडत आहेत. सुशिक्षित, उच्चसुशिक्षित लोकही त्यात मागे नाहीत, याला काय म्हणावे?

असा एकही दिवस जात नाही, की रिल्सच्या नादात कोणी  जीव गमावलेला नाही. अशा कित्येक उदाहरणांत, परवाच आणखी एकाची भर पडली. मुंबईतील व्यवसायाने चार्टर्ड अकाउंट असणारी आणि हौसेने ट्रॅव्हल ब्लॉगर असणारी, अन्वी कामदार ही तरुणी रायगडमधील सह्याद्रीच्या एका कड्यावरून रिल्स बनवताना दरीत कोसळली आणि दुर्दैवाने मृत्युमुखी पडली.

मागची मोजकीच काही वर्षे झाली, या देशातील खूप मोठ्या तरुणवर्गाला रिल्सचे प्रचंड वेड लागलेले पाहायला मिळत आहे. ऊठसूट, कोणत्याही ठिकाणी, कोणीही रिल्स करताना दिसतो. ते करताना काही सामान्य भान पाळत असल्याचेही दिसत नाही. जो-तो हातात मोबाइल घेऊन आटापिटा करीत पटकन प्रसिद्धी मिळविण्याच्या मार्गावर जोर लावून धावू लागला आहे.

आपले फॉलोअर्स वाढवणे, त्यातून प्रसिद्धी मिळवणे, याचा हव्यास सर्वत्र वाढत चालला आहे. यामागे शोधलं तर एक खोलवर मूळ दिसू शकेल, ते म्हणजे पैसा आणि प्रसिद्धी! ‘सेलिब्रिटी’ होण्याचा, मान मिळवण्याचा हव्यास, अट्टाहास..!

आपल्या देशात कितीही शिकलेली व्यक्ती असो, की न शिकलेली मंडळी, आपल्याभोवती प्रसिद्धीचे वलय असावे, याचा एक छुपा हव्यास प्रत्येकात दडलेला आहे. आपले बॉलिवूड स्टार्स आणि राजकारणी मंडळी यांचाही यात प्रचंड मोठा वाटा आहे.

राईभर कर्तृत्वाच्या मनाने अनेकांना खूप मोठ्या प्रमाणात पैसा आणि प्रसिद्धी मिळताना आपण पाहतो. राजकारणात आणि अभिनयात प्रत्येकाला यशस्वी होता येईलच असे नाही; पण त्याकडे तरुणांचा, लोकांचा ओढा मोठा असतो, पुढारकी करायची असते आणि स्टायलिशही राहायचे असते. मग सोपा मार्ग काय, तर हातात असलेला मोबाइल!

मोबाइलच्या माध्यमातून प्रसिद्धी मिळवण्याचा एक सोपा, सहज मार्ग प्रत्येकालाच उपलब्ध झाला आहे.  यातूनच ‘रिल्स स्टार’ पावसाळी भूछत्र्यांसारखे जन्म घेऊ लागले आहेत. वेगवेगळे ब्लॉगर्स निर्माण होऊ लागले आहेत. बेरोजगारीमुळे तरुण मंडळी जास्त प्रमाणात या सोप्या(!) वाटणाऱ्या मार्गाकडे वळताना दिसत आहे; पण हळूहळू हा अतिहव्यास कित्येक जणांची माती करीत असल्याची कित्येक उदाहरणे आपण रोज पाहतो आहोत. पुढच्यास ठेच लागल्यावरदेखील मागचे शहाणे होत नाहीत, हे फार मोठे दुर्दैव आणि शोकांतिका आहे.

या मोबाइलने जितका फायदा केला, त्याहून अधिक नुकसान केले आहे, करत आहे, हे वास्तव आहे. विशेष दुखणे या गोष्टीचे आहे की, आजकालच्या मुलांना आई-वडील आणि इतर अनुभवी व्यक्तींचे सल्ले ऐकणे म्हणजे त्यांच्या स्वैराचारावर, ज्याला ते त्यांचे तथाकथित स्वातंत्र्य म्हणतात, त्यावर गदा आणणे वाटते..!

आयुष्य जगणे म्हणजे काहीतरी अचाट, वेगळे करणे, एन्जॉयमेन्ट म्हणजे सामाजिक नीतीनियम, कायदे धुडकावून लावत विपरीत वागणे हीच व्याख्या वाटते..!

विशेष म्हणजे बरबाद होत जाणाऱ्या या तरुण पिढीकडे सरकार, राजकारणी मंडळीही सोयिस्करपणे दुर्लक्ष करीत असल्याचाच अनुभव नेहमी दिसतो.

हातातील या वितभर गॅझेटच्या माध्यमातून असंख्य बेरोजगार तरुण-तरुणी वेगवेगळ्या प्रलोभनांना बळी पडत व्यसने, गुन्हेगारी आणि पैसा-प्रसिद्धीच्या शॉर्टकट मार्गाकडे धाव घेत आहेत. पालक, सर्व समाज आणि सरकारने याकडे वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे. तरुण पिढीच देशाचे पुढचे भविष्य आहे. रिल्ससारख्या क्षुल्लक गोष्टींच्या नादी लागून ती वाया जात असतील तर त्याकडे वेळीच लक्ष दिले पाहिजे.