शहरं
Join us  
Trending Stories
1
आमनेसामने Video: ठाकरे गटाकडून 50 खोकेची घोषणाबाजी; एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा
2
महिन्याभरात २६७ शेतकऱ्यांच्या आत्महत्या; जयंत पाटलांनी सरकारला धारेवर धरलं
3
संजय राऊतांच्या आरोपानंतर मुख्यमंत्र्यांच्या बॅगा तपासल्या; नाशिकमध्ये काय घडलं?
4
मनोज जरांगे पाटील यांची ८ जून रोजी होणारी सभा रद्द, या दोन कारणांमुळे घेतला निर्णय
5
बाळासाहेबांवर टीका करणाऱ्या अंधारेंना पक्षात का घेतलं?, CM विरोधात लढणार का?; आदित्य ठाकरेंची रोखठोक उत्तरं
6
Fact Check: Video - मुंबईत भाजपाच्या किटमध्ये सोन्याची बिस्किटं सापडली?; जाणून घ्या, 'सत्य'
7
...तर ईडी आरोपीला पीएमएलए कायद्यानुसार अटक करू शकत नाही; सर्वोच्च न्यायालयाची महत्वाची टिप्पणी
8
गाडी चालविताना मोबाईल काय साधा कागद जरी हातात जरी पकडला तरी दंड; जाणून घ्या वाहतुकीचा नियम...
9
अजित पवार गेले कुणीकडे?, गैरहजेरीनं विविध चर्चा; शरद पवारांनी दिली महत्त्वाची माहिती
10
Post Officeच्या 'या' स्कीममध्ये PM Modiनी देखील केलीये ९ लाखांची गुंतवणूक, तुम्हालाही मिळेल उत्तम रिटर्न
11
'ड्रग्स पासून दूर राहा', शुभांगी गोखलेंनी लेकीला हात जोडून सांगितलं; ती लंडनला गेल्यावर...
12
कांद्यावरून पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारणाऱ्या तरुणाचा मला अभिमान, शरद पवारांचं मोठं विधान
13
ना पाकिस्तान, ना ऑस्ट्रेलिया! ब्रायन लाराने जाहीर केले T20 World Cup चे ४ सेमीफायनलिस्ट
14
दोन्ही पायांनी दिव्यांग, जिद्द नाही सोडली; स्वत:चा जीव धोक्यात घालून वाचवला हजारो लोकांचा जीव
15
पंतप्रधान मोदींच्या जाहीर सभेसाठी मुंबईच्या वाहतुकीत १४ तासांसाठी बदल; 'या' मार्गांवर पर्यायी व्यवस्था
16
विराट कोहली केव्हा करणार क्रिकेटला 'अलविदा'? रिटायरमेंटच्या प्रश्नावर स्पष्टच बोलला!
17
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका
18
शुक्रादित्य राजयोग: ८ राशींना लाभच लाभ, वरदान काळ; सुख-समृद्धी प्राप्ती, पद-प्रतिष्ठा वाढेल!
19
Kanhaiya Kumar : "गेल्या 10 वर्षांत पंतप्रधानांनी काय केलं?"; कन्हैया कुमार यांचा मनोज तिवारींना खोचक सवाल
20
'गर्व' मधली सलमानची बहीण आठवतेय? २० वर्षांनंतर करणार कमबॅक; रणबीर कपूरशी आहे कनेक्शन

रस्ता दुरुस्तीचे नवे तंत्र वापरून अपघात कमी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2018 4:22 AM

रस्त्यातील खड्ड्यांमुळे अपघाती मरण आलेल्यांची संख्या चकीत करणारी आहे. २०१७ सालात रस्त्यातील खड्ड्यांनी देशभरात ३५९७ लोकांचे जीव घेतले. याचा अर्थ दररोज १० लोकांचा बळी खड्ड्यांमुळे गेला आहे.

- डॉ. एस.एस. मंठा(माजी चेअरमन, एआयसीटीई एडीजे. प्रोफेसर, एनआयएएस बंगळुरू)रस्त्यातील खड्ड्यांमुळे अपघाती मरण आलेल्यांची संख्या चकीत करणारी आहे. २०१७ सालात रस्त्यातील खड्ड्यांनी देशभरात ३५९७ लोकांचे जीव घेतले. याचा अर्थ दररोज १० लोकांचा बळी खड्ड्यांमुळे गेला आहे. २०१६ सालापेक्षा हे आकडे ५० टक्के जास्त आहेत. त्यातील महाराष्टÑाचा वाटा ७२६ आहे. याचा अर्थ खड्ड्यांमुळे मृत पावणाऱ्यांची संख्या दरवर्षी दुपटीने वाढते आहे. एकूणच रस्ता सुरक्षा व्यवस्थाच बळी गेली आहे असे म्हणावे लागते. त्या तुलनेत दहशतवाद आणि नक्षलवाद यामुळे बळी गेलेल्यांची संख्या ८०० म्हणजे खूपच कमी आहे. तेव्हा रस्त्यातील खड्डे हे अधिक चिंताजनक म्हणावे लागतील. अर्थात कोणताही मृत्यू हा समर्थनीय नसतो. पावसाळा आला की रस्त्यांना खड्डे हे पडणारच आणि त्यामुळे लोकांचे प्राण हे जाणारच हे राज्य सरकारांनी गृहित धरले आहे. जबाबदार लोकांची या बाबतीतील बेजबाबदार वृत्ती ही धक्कादायक आहे. अशा अपघातात कुटुंबप्रमुख दगावून कुटुंबाच्या तोंडचा घास जेव्हा हिरावला जातो, तेव्हा संपूर्ण पिढीला स्वत:ची फसवणूक झाल्यासारखे वाटते. एकीकडे राष्टÑीय आरोग्य विम्याच्या माध्यमातून आपल्या देशातील ५० टक्के लोकांच्या आरोग्य सुरक्षिततेचा सरकार विचार करीत असताना काही लोकांना त्यांचा कोणताही अपराध नसताना प्राणास मुकावे लागणे हे चिंताजनक आहे. वास्तविक हेच लोक नियमितपणे कर भरून सरकारच्या योजनांना हातभार लावत असतात.देशापाशी सुयोग्य साधनांचा अभाव असण्याच्या स्थितीतून सरकार कशा तºहेने मार्ग काढणार आहे? अशा स्थितीत रस्त्यात खड्डे का पडतात हेही समजून घ्यायला हवे. डांबरी सडकांना खड्डे पडणे ही गोष्ट रचनात्मक दोषातून घडत असते. रस्त्यात पाणी साचणे आणि त्यावरून मोठ्या प्रमाणात जड वाहने जाणे यामुळे रस्त्यात खड्डे पडतात असा निष्कर्ष अमेरिकेच्या लष्करी अभियंत्यांनी काढला आहे. पावसामुळे रस्त्यावरील डांबराचा थर कमजोर होतो आणि त्यावरून वाहने गेल्याने वरचा थर उखडला जातो आणि खालची गिट्टी उघडी पडते. सतत वाहने जाण्याने हा खड्डा वाढत जातो. रस्त्याचा वरचा थर पुरेसा जाड नसल्यानेही खड्डे पडण्यास मदतच होते. रस्त्यावरील मॅनहोलमधून पाणी वाहून गेले नाही, तर पाणी तुंबल्यामुळेही रस्ते कमजोर होतात.भारतातील रस्त्यातच खड्डे होतात असे नाही तर साºया जगातील रस्ते खड्ड्यामुळे प्रभावित झाल्याचे दिसून येते. ग्रेट ब्रिटेनमध्ये रस्ता दुरुस्तीवर दरवर्षी २० बिलियन पौंड एवढी रक्कम खर्च होते. पण आपल्या देशात रस्त्यांच्या देखभालीकडे होणारे दुर्लक्ष अधिक चिंताजनक आहे. एका वृत्तपत्राच्या अहवालानुसार मुंबई महानगरपालिकेने २०११ ते २०१६ या पाच वर्षाच्या काळात रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी रु. १४,५०० कोटींची तरतूद केली होती. पण त्यापैकी केवळ रु. ११,००० कोटी खर्च करण्यात आले. एकट्या २०१७ साली रु. ५१८३ कोटींची तरतूद करण्यात आली होती. त्या खर्चाचे निष्पन्न काय झाले? निम्न दर्जाच्या वस्तूंचा वापर करून केलेली कामे खराबच होणार! याशिवाय वाहनांच्या टायर्समध्ये भरण्यात येणाºया जास्त हवेमुळे आणि गाड्यांच्या तुटलेल्या अ‍ॅक्सेलमुळे रस्ते खराब होण्यास मदतच होते. या खड्ड्यांमुळे दुचाकी वाहनांना जो धोका होतो त्याचा फटका महानगरपालिकांना सहन करावा लागतो आणि अनावश्यक खटल्यात गुंतून पडावे लागते.अपघातांमुळे जीवितहानी तर होतेच पण पैसाही वाया जातो. हे काही चांगल्या प्रशासनाचे लक्षण नाही. एवढे होऊनही हे खड्डे दुरुस्तीचे जे तंत्रज्ञान आहे तेही तितकेच निराशाजनक असते. रस्ता दुरुस्त करणारे त्या खड्ड्यात गिट्टी आणि डांबर ओतून डागडुजी करतात. पण ते तात्पुरत्या मलमपट्टीप्रमाणे ठरते. या संकटाचा कायमचा बंदोबस्त करण्याचा मार्ग शोधायला हवा. दोन वर्षांपूर्वी हे खड्डे पेव्हर ब्लॉकचा वापर करून बुजविण्यात येत होते पण ती पद्धत आता थांबविण्यात आली आहे. कारण हे ब्लॉक्स जागेवरून हलतात आणि त्यामुळे रस्ता असमान होऊन वाहनांसाठी व पायी चालणाºयांसाठी तो अधिकच धोकादायक ठरतो.तुर्कस्थानच्या इस्तंबुल येथील दाहीर इन्सॅट या कंपनीने खड्डे दुरुस्तीचे नवीन तंत्र विकसित केले आहे. ते ‘पॉट होल क्रशिंग पॉवरहाऊस’ म्हणून ओळखले जाते. त्यात इंटरनेट सेन्सॉरचा वापर केला जातो. त्यामुळे बागेतील किडे मारावेत तितक्या सहजपणे हे खड्डे नाहीसे केले जातात. खड्डे भरून काढण्याऐवजी हे मशीन खड्ड्याभोवतीची जागा कापून काढते. जणू एखादा कॅन्सरचा ट्यूमर काढावा इतक्या अचूकपणे हे काम केले जाते. ते मशीन तो खड्डा स्वच्छ करते. त्यानंतर रोबोटच्या हाताने त्या खड्ड्यात अगोदर तयार केलेली स्लॅब बसविण्यात येते. ती खड्ड्यात बसवल्यानंतर आकाराने वाढते व त्या खड्ड्यात अचूक बसते. जणू तेथे खड्डा नव्हताच इतके हे काम चांगले होते. परंपरागत पद्धतीपेक्षा हे काम कमी वेळात आणि चांगल्याप्रकारे होते. त्यामुळे वाहने चालविताना कोणतेही धक्के बसत नाही.खड्डे दुरुस्त करण्याची आणखी एक पद्धत लॅरी झॅन्को या शास्त्रज्ञाने तयार केली आहे. त्यात त्यांनी मायक्रोवेव्हचा वापर केला आहे. त्यामुळे खड्डे गरम करण्यात येतात. त्यानंतर त्यात मॅग्नेटाईट आणि रिसायकल केलेले डांबर भरण्यात येते आणि त्यावर स्प्रे करून तो खड्डा सील करण्यात येतो. खड्डा अगोदर गरम केल्याने रस्ता दुरुस्तीचे काम मजबूत होते. आणखी एका पद्धतीत प्लास्टिकचा वापर खड्डा भरण्यासाठी करण्यात येतो. प्लास्टिकच्या गोळ्या तयार करून त्या गिट्टीऐवजी डांबरात मिक्स करण्यात येतात. एक टन डांबरात ३ ते १० किलो प्लास्टिक वापरण्यात येते. स्टँडर्ड अ‍ॅस्फॉल्टपेक्षा हे मिश्रण घालून बुजवलेले खड्डे अधिक काळ टिकतात असे दिसून आले आहे. लोकांचे प्राण वाचविण्यासाठी अशातºहेच्या नव्या पद्धतीने रस्ते दुरुस्त करणे हितावह ठरणार आहे.आता खड्डे बुजविण्याचे जुने तंत्र वापरणे बंद करून नव्या पद्धतीने खड्डे बुजविणे सुरू करायला हवे. त्यामुळे रस्ता दुरुस्तीचे काम वेगवान आणि अधिक मजबूत होईल. यापुढे नवीन रस्ते तयार करताना रस्त्याचा पृष्ठभाग नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून मजबूत केल्यास रस्ते दीर्घकाळ तर टिकतीलच पण रस्त्यावर होणाºया प्राणघातक अपघातांचे प्रमाणही कमी होण्यास त्यामुळे मदत होईल. प्रवाशांच्या जीविताची काळजी आणि कामाविषयीची बांधिलकी यामुळेच हे शक्य होऊ शकेल.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा