शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

वाचाल तर वाचाल!

By admin | Updated: April 20, 2017 02:37 IST

इतिहासाचा मागोवा, वर्तमानाचे भान आणि भविष्याचा वेध या तीनही गोष्टी जर कशामुळे शक्य होत असतील तर त्या पुस्तकांमुळेच

इतिहासाचा मागोवा, वर्तमानाचे भान आणि भविष्याचा वेध या तीनही गोष्टी जर कशामुळे शक्य होत असतील तर त्या पुस्तकांमुळेच. व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीत अनेक घटकांचा हातभार लागतो. व्यक्ती आणि तिच्याभोवती असणारे जग यांच्या परस्परसंबंधातून व्यक्तिमत्त्वाचे शिल्प साकारत असते. या प्रवासात पुस्तकांची भूमिका अत्यंत मोलाची ठरते म्हणूनच सुस्पष्ट विचारांतून जीवनदृष्टी देणाऱ्या ग्रंथांना मानवी जीवनात अनन्यसाधारण महत्त्व आहे.‘वाचाल तर वाचाल’ या अल्पाक्षरांमध्ये जीवनाचा संदेश लपलेला आहे. अगदी प्राचीन काळापासूनचे संचित, इतिहास माणसाला जपून ठेवावासा वाटला त्यातून आली अक्षरलिपी व त्यातून आले शब्द. या शब्दांना ग्रंथरूप मिळाले आणि तो संस्कृतीचा ठेवा बनला. हा वारसा आपल्याला पावला-पावलावर समृद्ध करीत आला आहे. अनुभवाला ज्ञानाची जोड मिळाल्यानंतर जीवनाचा अर्थ गवसतो, म्हणून पुस्तके महत्त्वाची ठरतात. दरवर्षी २३ एप्रिलला जागतिक पुस्तक दिन साजरा केला जातो. सर्वश्रेष्ठ नाटककार विल्यम शेक्सपिअर आणि ‘डॉन क्विझोट’कार मिग्वेल सर्व्हान्टिस यांच्या निधनाचा दिवस ‘युनेस्को’ने १९९५पासून ‘जागतिक पुस्तक दिन’ म्हणून साजरा करण्याचे घोषित केले. परंतु ती निव्वळ औपचारिकता न राहता पुस्तकांचे महत्त्व आपल्या मनात ठामपणे रुजणे गरजेचे आहे.ग्रंथांमुळे जीवन घडते, याची अनुभवसिद्ध उदाहरणे आपल्या सभोवताली असतात. पुस्तकांमुळे अवकाश विस्तारते, ज्ञानात भर पडते, जीवनविषयक दृष्टिकोन अधिक सुस्पष्ट होते. माहितीचा आणि ज्ञानाचा खजिना खुला होतो. यशस्वी लोकांच्या यशोगाथा, त्यांची चरित्रे-आत्मचरित्रे वाचून सामान्यांना प्रेरणा मिळते. अर्थपूर्ण पुस्तकाच्या सहवासात योग्यतापूर्ण वाचक आला की कर्तृत्वाचे गौरीशंकर उदयाला येत असते. सर्जनशील ज्ञानाच्या ओढीने केलेले वाचन ही यशाच्या दिशेने जाण्याची पहिली पायरी असते. यश कर्तृत्वाच्या शिखरावर चढलेल्या अनेक महापुरुषांच्या आयुष्याला पुस्तकांनीच वळण दिले आहे. पुस्तक हे नेहमी जिवाभावाचा साथीदार असते. दु:खात, आनंदात, प्रवासात ते कायम सोबत करते. पुस्तके जशी मित्राची भूमिका बजावतात तशीच प्रसंगी मार्गदर्शकाची व गुरुचीही भूमिका बजावतात. ग्रंथसहवास बालवयात घडला तर देश-विदेशातील संस्कृतींची ओळख होऊन उद्याचे जग एकसंधतेच्या नजरेने पाहण्याची व्यापक दृष्टी प्राप्त होऊ शकते.भारतीय साहित्यविश्व अनेकार्थाने समृद्ध आहे. त्यातही मराठी साहित्यामध्ये उत्तमोत्तम दर्जेदार लेखकांची परंपरा आहे. वि.स. खांडेकर, वि.वा. शिरवाडकर, विं.दा. करंदीकर, भालचंद्र नेमाडे, आचार्य अत्रे, पु. ल. देशपांडे, ग.दि. माडगूळकर, नारायण सुर्वे, दुर्गा भागवत, जी.ए. कुलकर्णी, सुरेश भट, ग्रेस, बा. भ.बोरकर, मंगेश पाडगावकर यांसारख्या प्रतिभावंत सारस्वतांनी मराठी साहित्याला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले आणि वाचकांच्या अभिरुचीला समृद्ध केले.समाजात किती वाचले जाते यापेक्षा काय वाचले जाते, याचा विचार सामाजिक निकोपतेच्या दृष्टीने अधिक महत्त्वाचा असतो व ही जबाबदारी प्रामुख्याने लेखकांची आहे. लेखकांनी समाजाला विचारप्रवण बनविणारे विचार समाजात रुजविले पाहिजेत. आजमितीला डिजिटल तंत्रज्ञान आणि सोशल मीडियाच्या प्रसारामध्ये आपण वाचनसंस्कृती हरवून बसतोय की काय, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. उत्तमोत्तम साहित्यिक तयार होणे ही त्या त्या काळातील समाजाची गरज असते. तिथे परिस्थिती फारशी समाधानकारक नाही. त्यामुळे या पुस्तक दिनाच्या निमित्ताने आपण याचे चिंतन करायला हवे. थोर इतिहासकार गिबन म्हणाला होता, ‘देशातली सगळी संपत्ती जरी माझ्या पायाशी ओतली तरी माझे वाचनप्रेम मी सोडणार नाही.’ पुस्तकांप्रति आपलीही अशीच श्रद्धा निर्माण व्हावी हीच सदिच्छा. - विजय बाविस्कर