शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
4
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
5
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
6
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
7
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
8
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
9
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
10
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
11
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
12
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
13
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
14
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
17
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
18
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
19
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
20
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!

ओवेसींच्या कडेवर प्रकाश आंबेडकर

By यदू जोशी | Updated: September 17, 2018 17:14 IST

एकीकडे धार्मिक उन्मादाचा आरोप करीत हिंदुत्ववादी पक्ष, संघटनांचा कडवा विरोध करणारे आंबेडकर हे कडव्या मुस्लीमवादी ओवेसींच्या कडेवर जाऊन बसत आहेत.

भारिप-बहुजन महासंघाचे सर्वेसर्वा अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी असदुद्दीन ओवेसी यांच्या नेतृत्वातील एमआयएमशी युती करण्याचा घेतलेला निर्णय हा त्यांनी नक्षलवादाचे समर्थन करण्यासारखाच अनाकलनीय आहे. एकीकडे धार्मिक उन्मादाचा आरोप करीत हिंदुत्ववादी पक्ष, संघटनांचा कडवा विरोध करणारे आंबेडकर हे कडव्या मुस्लीमवादी ओवेसींच्या कडेवर जाऊन बसत आहेत. धार्मिक उन्माद वा उच्छाद एखाद्या विशिष्ट धर्माच्या आड केला जातो म्हणून त्याला विरोध करायचा आणि त्याचवेळी इतर धर्माच्या आधारे तो पसरविण्यासाठी कारवाया करणाऱ्यांच्या पंक्तीत जाऊन बसायचे असा विरोधाभास आंबेडकरांच्या नव्या राजकीय निर्णयातून प्रतीत होत आहे.आंबेडकर यांनी राजकीय सोयीसाठी मित्रपक्ष बदलले आणि मित्रही. तीन दशकांच्या राजकारणात त्यांचे एकेकाळचे अत्यंत विश्वासू त्यांना एकेक करून सोडून गेले. त्यांना ज्यांनी अकोल्याच्या राजकारणात आणले ते लंकेश्वर गुरुजी तसेच प्रा. सुभाष पटनाईक, मखराम पवार, सूर्यभान ढोमणे, बी.आर. शिरसाट अशा मंडळींचा पुढे आंबेडकर यांच्या राजकारणाबाबत भ्रमनिरास झाला. सर्व जातींना सोबत घेऊन राजकारण करण्याचा त्यांचा अकोला पॅटर्न काही प्रमाणात यशस्वी झाला पण ते स्वबळावर कधीही लोकसभेची निवडणूक जिंकू शकले नाहीत. काँग्रेससोबत आघाडीत होते तेव्हाच त्यांना लोकसभेत बसता आले. गेल्या वेळी त्यांनी पाचपंचवीस पक्षांना एकत्र आणून राज्यात काँग्रेसेतर आघाडी उभारली, पण ती अपयशाच्या गाळात रुतली.काँग्रेसच्या पुढाकाराने भाजपाविरोधी पक्षांची मोट बांधण्याचे काम सुरू असताना आंबेडकर यांनी आता वेगळी चूल मांडली आहे. एमआयएम किंवा मनसे असे दोन पक्ष आहेत ज्यांना सोबत घेणे काँग्रेसला राज्य व राष्ट्रीय पातळीवर शक्य नाही. कारण, एमआयएमशी दोस्ती केली तर काँग्रेसची हिंदू मते हातून जाण्याची भीती आहे आणि मनसेचे बोट धरले तर काँग्रेसचा हात हिंदी भाषिक राज्यांमध्ये पोळेल. तथापि, मर्यादित का असेना पण काही जिल्ह्यांमध्ये प्रभाव असलेल्या प्रकाश आंबेडकरांची ताकद काँग्रेसला बळ देणारी ठरू शकली असती. काँग्रेसने त्या दृष्टीने त्यांच्याशी चर्चा करण्यापूर्वीच त्यांनी एमआयएमशी हातमिळवणी केली. आंबेडकर हे एकीकडे संघ, भाजपा, हिंदुत्ववादी संघटनांवर वैचारिक हल्ला चढवतात, पण दुसरीकडे त्यांच्यामुळे धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन होऊन ते भाजपा-शिवसेनेच्या पथ्यावर पडते हा आरोप जुनाच आहे. निवडणूक निकालाची आकडेवारीही या आरोपाला पुष्टी देत आली आहे. एमआयएमशी दोस्ती करून आंबेडकर यांनी सदर आरोपास बळच दिले आहे. २०१४ सारखी मोदी लाट आज उरलेली नाही. अशा वेळी आपल्या विरोधातील मतांचे विभाजन भाजपाला हवेच आहे. आंबेडकरांच्या नव्या घरठावाने राज्यातील भाजपा नेत्यांना आनंदाच्या उकळ्याच फुटत असतील.रामदास आठवले, लाँगमार्चचे प्रणेते या बिरुदावर जगणारे आणि जाता जाता मुलाला राजकारणात कुठेतरी चिकटवून जायच्या प्रयत्नात असलेले प्रा. जोगेंद्र कवाडे, वडील दिवंगत रा.सू. गवई यांचे दहा टक्केही गुण अंगी नसलेले डॉ. राजेंद्र गवई आणि आता एमआयएमच्या नादी लागलेले आंबेडकर यांच्यापैकी कोणालाही रिपब्लिकन ऐक्याशी काहीही देणेघेणे उरलेले नाही. प्रत्येकाने आपल्या सोयीचे दुकान गाठले आहे.(लेखक मुंबई लोकमतचे वरिष्ठ साहाय्यक संपादक आहेत)

टॅग्स :Asaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनBharip Bahujan Mahasanghभारिप बहुजन महासंघ