शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

ओवेसींच्या कडेवर प्रकाश आंबेडकर

By यदू जोशी | Updated: September 17, 2018 17:14 IST

एकीकडे धार्मिक उन्मादाचा आरोप करीत हिंदुत्ववादी पक्ष, संघटनांचा कडवा विरोध करणारे आंबेडकर हे कडव्या मुस्लीमवादी ओवेसींच्या कडेवर जाऊन बसत आहेत.

भारिप-बहुजन महासंघाचे सर्वेसर्वा अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी असदुद्दीन ओवेसी यांच्या नेतृत्वातील एमआयएमशी युती करण्याचा घेतलेला निर्णय हा त्यांनी नक्षलवादाचे समर्थन करण्यासारखाच अनाकलनीय आहे. एकीकडे धार्मिक उन्मादाचा आरोप करीत हिंदुत्ववादी पक्ष, संघटनांचा कडवा विरोध करणारे आंबेडकर हे कडव्या मुस्लीमवादी ओवेसींच्या कडेवर जाऊन बसत आहेत. धार्मिक उन्माद वा उच्छाद एखाद्या विशिष्ट धर्माच्या आड केला जातो म्हणून त्याला विरोध करायचा आणि त्याचवेळी इतर धर्माच्या आधारे तो पसरविण्यासाठी कारवाया करणाऱ्यांच्या पंक्तीत जाऊन बसायचे असा विरोधाभास आंबेडकरांच्या नव्या राजकीय निर्णयातून प्रतीत होत आहे.आंबेडकर यांनी राजकीय सोयीसाठी मित्रपक्ष बदलले आणि मित्रही. तीन दशकांच्या राजकारणात त्यांचे एकेकाळचे अत्यंत विश्वासू त्यांना एकेक करून सोडून गेले. त्यांना ज्यांनी अकोल्याच्या राजकारणात आणले ते लंकेश्वर गुरुजी तसेच प्रा. सुभाष पटनाईक, मखराम पवार, सूर्यभान ढोमणे, बी.आर. शिरसाट अशा मंडळींचा पुढे आंबेडकर यांच्या राजकारणाबाबत भ्रमनिरास झाला. सर्व जातींना सोबत घेऊन राजकारण करण्याचा त्यांचा अकोला पॅटर्न काही प्रमाणात यशस्वी झाला पण ते स्वबळावर कधीही लोकसभेची निवडणूक जिंकू शकले नाहीत. काँग्रेससोबत आघाडीत होते तेव्हाच त्यांना लोकसभेत बसता आले. गेल्या वेळी त्यांनी पाचपंचवीस पक्षांना एकत्र आणून राज्यात काँग्रेसेतर आघाडी उभारली, पण ती अपयशाच्या गाळात रुतली.काँग्रेसच्या पुढाकाराने भाजपाविरोधी पक्षांची मोट बांधण्याचे काम सुरू असताना आंबेडकर यांनी आता वेगळी चूल मांडली आहे. एमआयएम किंवा मनसे असे दोन पक्ष आहेत ज्यांना सोबत घेणे काँग्रेसला राज्य व राष्ट्रीय पातळीवर शक्य नाही. कारण, एमआयएमशी दोस्ती केली तर काँग्रेसची हिंदू मते हातून जाण्याची भीती आहे आणि मनसेचे बोट धरले तर काँग्रेसचा हात हिंदी भाषिक राज्यांमध्ये पोळेल. तथापि, मर्यादित का असेना पण काही जिल्ह्यांमध्ये प्रभाव असलेल्या प्रकाश आंबेडकरांची ताकद काँग्रेसला बळ देणारी ठरू शकली असती. काँग्रेसने त्या दृष्टीने त्यांच्याशी चर्चा करण्यापूर्वीच त्यांनी एमआयएमशी हातमिळवणी केली. आंबेडकर हे एकीकडे संघ, भाजपा, हिंदुत्ववादी संघटनांवर वैचारिक हल्ला चढवतात, पण दुसरीकडे त्यांच्यामुळे धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन होऊन ते भाजपा-शिवसेनेच्या पथ्यावर पडते हा आरोप जुनाच आहे. निवडणूक निकालाची आकडेवारीही या आरोपाला पुष्टी देत आली आहे. एमआयएमशी दोस्ती करून आंबेडकर यांनी सदर आरोपास बळच दिले आहे. २०१४ सारखी मोदी लाट आज उरलेली नाही. अशा वेळी आपल्या विरोधातील मतांचे विभाजन भाजपाला हवेच आहे. आंबेडकरांच्या नव्या घरठावाने राज्यातील भाजपा नेत्यांना आनंदाच्या उकळ्याच फुटत असतील.रामदास आठवले, लाँगमार्चचे प्रणेते या बिरुदावर जगणारे आणि जाता जाता मुलाला राजकारणात कुठेतरी चिकटवून जायच्या प्रयत्नात असलेले प्रा. जोगेंद्र कवाडे, वडील दिवंगत रा.सू. गवई यांचे दहा टक्केही गुण अंगी नसलेले डॉ. राजेंद्र गवई आणि आता एमआयएमच्या नादी लागलेले आंबेडकर यांच्यापैकी कोणालाही रिपब्लिकन ऐक्याशी काहीही देणेघेणे उरलेले नाही. प्रत्येकाने आपल्या सोयीचे दुकान गाठले आहे.(लेखक मुंबई लोकमतचे वरिष्ठ साहाय्यक संपादक आहेत)

टॅग्स :Asaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनBharip Bahujan Mahasanghभारिप बहुजन महासंघ