शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

सत्ता संपली, संघर्ष सुरू! मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय त्या दिशेनं टाकलेलं मोठं पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2022 09:31 IST

आता विधिमंडळातील शिवसेना मोडीत निघाल्यानंतर किमान पक्ष तरी हातात राहावा, असे उद्धव ठाकरे यांचे प्रयत्न असतील.

सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाशी निगडित सगळी प्रकरणे ११ जुलैपर्यंत यथास्थिती ठेवली असताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकारला चोवीस तासांच्या आत बहुमत सिद्ध करण्यास का सांगितले, या मुद्द्यावर पुन्हा न्यायालयाचा दरवाजा ठोठावणाऱ्या शिवसेना पक्षप्रतोद व इतरांच्या पदरी निराशा पडली. त्यामुळे एकतीस महिन्यांपूर्वी सत्तेवर आलेल्या महाविकास आघाडी सरकारला अग्निपरीक्षेतून जावे लागेल, हे स्पष्ट झाले होते. त्यानंतर प्रत्यक्ष विश्वासमत प्रस्तावाचा सामना करण्याऐवजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रात्री उशिरा राज्यातील जनतेला संबाेधित करून राजीनाम्याची घोषणा केली. 

कारण, दोन्ही काँग्रेससोबत कारभार करताना जीव गुदमरतो असे सांगत सरकारमधील ९ मंत्र्यांसह पन्नास आमदारांच्या गटाने एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात सुरतमार्गे गुवाहाटीला जाऊन मुक्काम ठोकला होता. तो गट विमानाने तिथून गोव्याकडे विमानाने यायला निघाला. योगायोगाने त्याचवेळी महाराष्ट्राच्या राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलेल्या विश्वासमत मांडण्याच्या निर्देशाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू झाली. आता आमदार मुंबईला पोहोचल्यानंतर बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे आदींना आदरांजली वाहून विधानसभेत सरकारवर शेवटचा आघात करतील, असे चित्र होते. 

या घडामोडींमधील महत्त्वाचा भाग म्हणजे गेले आठ दिवस पडद्यामागे असलेले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सक्रिय झाले. गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत त्यांनी तीन दिवसांपूर्वी बडोदा येथे एकनाथ शिंदे यांच्याशी मध्यरात्री चर्चा केली. मंगळवारी ते तातडीने दिल्लीला गेले. तिथे पुन्हा अमित शहा तसेच भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना भेटून महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबद्दल मसलत केली आणि मुंबईत परत येताच तडक राजभवन गाठले. बंडखोर शिवसेना आमदारांच्या पात्रतेचे जे व्हायचे ते होवो; पण प्रथमदर्शनी उद्धव ठाकरे यांच्या सरकारने बहुमत गमावल्याचे त्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना सांगितले आणि लगेच राजभवनातून विधिमंडळ सचिवांना विश्वास प्रस्ताव संमत करून घेण्याविषयी पत्र निघाले. बुधवारी सकाळी अधिकृतपणे विधिमंडळ सचिवांना मिळालेले पत्र आदल्या रात्रीच राज्यपालांच्या सहीशिवाय सोशल मीडियावर झळकले आणि जणू महाराष्ट्राला सत्तांतराचे वेध लागले. 

हा मामला पुन्हा सर्वोच्च न्यायालयात गेला, कारण शिवसेनेचा अधिकृत गट कोणता, विधानसभेतील शक्तिप्रदर्शनावेळी कोणत्या गटनेत्याचा व्हिप चालणार, विधानसभा उपाध्यक्षांनी अपात्रतेच्या नोटिसा बजावलेल्या सोळा आमदारांचे काय होणार आणि सर्वोच्च न्यायालयानेच ११ जुलैपर्यंत सर्व प्रकरणे यथास्थिती राखण्यास सांगितले असताना राज्यपालांनी बहुमत चाचणीचे निर्देश का दिले, असे प्रश्न उपस्थित झाले. शिंदे गटाला ही बहुमत चाचणी हवीच होती. कारण, सर्वोच्च न्यायालयातील याचिकेत बंडखाेरांच्या गटाने सरकारचा पाठिंबा काढून घेतल्याचे स्पष्ट करताना अपात्रतेच्या नोटिसा बजावणारे विधानसभेचे कार्यकारी अध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या अधिकारांवरच आक्षेप घेतला होता. या पार्श्वभूमीवर, विधानसभेतील या बहुमत चाचणीच्या निमित्ताने २०१९ च्या नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी साकारलेल्या महाविकास आघाडी सरकारच्याच भवितव्याचा फैसला होणार होता. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर पंचवीस वर्षे भाजपसोबत युती केलेल्या शिवसेनेने अगदी टोकाची विचारसरणी असलेल्या दोन्ही काँग्रेसशी आघाडी करून भाजपला सत्तेपासून दूर ठेवले, हा या प्रयोगाचा मथितार्थ. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पुढाकार घेऊन हा प्रयोग साकारला. देशभर त्याची खूप चर्चा झाली. अनेक राज्यांमध्ये त्या प्रयोगाचे अनुकरण करण्याचा प्रयत्न झाला; परंतु तो तसा फारसा कुठे यशस्वी झाला नाही आणि आता महाराष्ट्रातही त्याचा जणू अपमृत्यू झाला आहे. 

भाजपचे हिंदुत्व वेगळे व शिवसेनेचे वेगळे असे उद्धव ठाकरे कितीही म्हणत असले तरी स्पष्ट आहे, की देशात कोणत्या ना कोणत्या कारणाने पुन्हा धार्मिक आधारावरील उजवे राजकारणच यशस्वी होत असताना त्या प्रवाहाच्या विरोधात जाऊन असा प्रयोग दिसतो तितका सोपा नव्हता व नाही. आता विधिमंडळातील शिवसेना मोडीत निघाल्यानंतर किमान पक्ष तरी हातात राहावा, असे उद्धव ठाकरे यांचे प्रयत्न असतील. औरंगाबाद व उस्मानाबाद या शहरांचे अनुक्रमे संभाजीनगर व धाराशिव नामांतर हा बुधवारच्या मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय त्या दिशेने टाकलेले पाऊल आहे. 

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाDeven Vermaदेवेन वर्माEknath Shindeएकनाथ शिंदे