शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
3
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
4
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
5
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
6
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
7
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
8
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
9
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
10
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
11
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
12
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
13
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
14
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
15
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
16
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
17
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
18
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
19
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
20
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार

अग्रलेख : पांगूळगाड्याचं राजकारण! ...म्हणून सर्वांचं लक्ष पश्चिम बंगाल अन् तामिळनाडूवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2021 04:31 IST

तामिळनाडूमध्ये या दोन द्रविडी पक्षांच्या पांगूळगाड्याशिवाय पुढे सरकता येत नाही, अशी दोन राष्ट्रीय पक्षांची अवस्था आहे. काँग्रेसकडे पूर्वी कामराज, शिवाजी गणेशन, जी. के. मुपनार असे नेते असल्याने तो पक्ष काहीसा रुजला होता.

देशातील पाच राज्यांत पुढील महिन्यात विधानसभेच्या निवडणुका होणार असल्या तरी सर्वांचे लक्ष आहे पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू याकडे.  तामिळनाडूचे राजकारण अन्य राज्यांपेक्षा नेहमीच वेगळे असते. त्यावर कायम द्रविडी चळवळ, द्रविडी संस्कृती यांचा प्रभाव राहिला आहे. फार वर्षांपूर्वी येथील जनतेने काँग्रेसला सत्तेबाहेर केले आणि तेव्हापासून राज्यात हा पक्ष क्षीण क्षीण होत गेला. त्यामुळे कधी अण्णा द्रमुक, तर कधी द्रमुक या प्रादेशिक पक्षांमुळे काँग्रेसमध्ये धुगधुगी शिल्लक राहिली. भाजपला तर आतापर्यंत तामिळनाडूमध्ये स्वत:च्या पायावर उभे राहताच आलेले नाही. त्यामुळे अण्णा द्रमुकशी समझाैता करून ताकद वाढवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. (The politics of the wheelchair! ... so everyone's attention is on West Bengal and Tamil Nadu)

तामिळनाडूमध्ये या दोन द्रविडी पक्षांच्या पांगूळगाड्याशिवाय पुढे सरकता येत नाही, अशी दोन राष्ट्रीय पक्षांची अवस्था आहे. काँग्रेसकडे पूर्वी कामराज, शिवाजी गणेशन, जी. के. मुपनार असे नेते असल्याने तो पक्ष काहीसा रुजला होता. नंतर तो पूर्णत: उखडला गेला. भाजप मात्र रुजलाच नाही. आता तो फुलला, तर त्याचे एकमेव कारण अण्णा द्रमुक हे असेल. अण्णा द्रमुकने भाजपला २० जागा दिल्या आहेत, तर द्रमुकने काँग्रेसला २५. तुमची खरे तर इतकीही ताकद नाही, त्यामुळे आम्ही जे देतो, त्यावर समाधान माना, असे दोन्ही द्रविडी पक्षांनी दोन्ही राष्ट्रीय पक्षांना सुनावले आहे. जयललिता यांच्या निधनानंतर अण्णा द्रमुककडे करिष्मा असलेला नेताच नाही. त्यामुळे अण्णा द्रमुकच्या नेत्यांना राष्ट्रीय व्यासपीठावर नरेंद्र मोदी यांची गरज भासत आहे. नेमका त्याचा फायदा भाजप घेत असून, त्यात वावगे काहीच नाही. एकीकडे पश्चिम बंगालमध्ये तृणमूलशी सामना करण्याची तयारी ठेवणाऱ्या भाजपला तामिळनाडूत पाय रोवता आले नाहीत, याचे कारण भाजपची हिंदुत्वाची भूमिका आणि दक्षिणेकडील राज्यांत हिंदी लादण्याचे प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष प्रयत्न. देशामध्ये उत्तर भारतातील लोक आर्य व गोरे आणि दक्षिण भारतीय हे अनार्य आणि तेथील लोकांचा रंग काळा अशी भावना आजही कायम आहे.

उत्तर भारतातील पक्षांना तामिळनाडूमध्ये स्थान न मिळण्याचे प्रमुख कारण हेच आहे. तामिळी जनतेने व द्रविडी पक्षांनी हिंदीला कडाडून विरोध केला. त्यासाठी आंदोलने केली. तेथील जनता आजही हिंदी शिकायला, बोलायला तयार नाही. पेरियार, अण्णा दुराई, एमजीआर, करुणानिधी यांच्यापासून वायको यांच्यापर्यंत सर्वांनी तामिळ भाषा व द्रविडी संस्कृतीचा झेंडा फडकावत ठेवत राष्ट्रीय पक्षांसाठी राजकीय पोकळीच निर्माण होऊ दिली नाही. या दोन्ही पक्षांनी श्रीलंकेतील तामिळ वाघांचा नेता प्रभाकरन आणि त्याच्या सहकाऱ्यांना आश्रय दिला आणि स्वतंत्र तामिळ राष्ट्राची जाहीर मागणीही केली होती. त्यामुळे या पक्षांशी मैत्री करणे म्हणजे हात पोळून घेण्याची तयारी ठेवण्यासारखे आहे. तरीही राष्ट्रीय पक्षांना दुसरा पर्याय नाही. तामिळी नेत्यांचे राजकारण गेल्या काही वर्षांत अधिक अधिक भ्रष्ट होत गेले आहे. त्याचा फटका काँग्रेस व डॉ. मनमोहन सिंग सरकारला बसला. जयललिता यांच्याकडे इतकी सारी संपत्ती कशी आली, हे उघड झाले नाही. त्यांच्या सहकारी आणि अलीकडेच तुरुंगातून आलेल्या शशिकला अचानक गप्प का झाल्या, हे समजायला मार्ग नाही. ममता बॅनर्जी व पिनराई विजयन यांच्यावर राजकीय हल्ले आणि तामिळनाडूमध्ये मात्र अळीमिळी गुपचिळी, असा प्रकार आहे. दोन्ही द्रविडी पक्षांनी गेल्या काही वर्षांत उघडपणे भ्रष्ट मार्गांनी मतदारांनाच विकत घ्यायला सुरुवात केली आहे. याआधी मतदारांना मोबाइल दिले, रंगीत टीव्ही दिले, सायकली दिल्या, महिलांना दुचाकीसाठी सबसिडी दिली, गरोदर महिलांना रोख रक्कम दिली, महिला व विद्यार्थ्यांना मोफत बसप्रवासाची सोय केली, कर्जे माफ करून झाली, तांदूळ मोफत दिला.

यंदाच्या विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात तर वॉशिंग मशीन, मिक्सर, ग्राइंडर देण्याच्या घोषणा आहेत. विद्यार्थ्यांना टॅब्लेट, मोफत डेटा, नोकरी न करता घरीच असलेल्या महिलांना एक ते दीड हजार रुपये घरभत्ता, दरवर्षी सहा गॅस सिलिंडर मोफत दिले जाणार आहेत. याशिवाय आरक्षणाची मर्यादा ७५ टक्क्यांपर्यंत वाढवण्याची घोषणा झाली आहे. अण्णा द्रमुकने नागरिकत्व दुरुस्ती कायदा राज्यात लागू करणार नाही, असे जाहीर केले असले तरी भाजप नेते गप्प आहेत. मतदारांना लाच देण्याच्या प्रकारावर काँग्रेस तर सोडाच, पण भाजपही बोलायला तयार नाही वा तसे जाहीरपणे बोलायची हिंमत नाही. ज्यांच्या गाड्यात आपण बसलो वा उभे आहोत, ते नेतील तसे आपण फरपटत जायचे, एवढेच राष्ट्रीय पक्षांच्या नशिबी आहे. 

टॅग्स :PoliticsराजकारणWest Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१Tamil Nadu Assembly Elections 2021तामिळनाडू विधानसभा निवडणूक २०२१Narendra Modiनरेंद्र मोदीMamata Banerjeeममता बॅनर्जी