शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
2
८०० दिवसांहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध संपणार? व्लादिमीर पुतिन यांचं युक्रेनबाबत मोठं वक्तव्य
3
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
4
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!
5
सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट; नांदुरघाटमध्ये दोन गटांत तुफान दगडफेक
6
इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर बाहेरुन पाठिंबा देणार; ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
7
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवलं; आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना टोला 
8
'मुस्लिमांशी घट्ट नाते आहे' म्हणणारे पंतप्रधान मोदी मुस्लीम द्वेषावरच भाषण देतात, नाना पटोलेंची टीका
9
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर RRच्या फलंदाजांची धडपड; रियान पराग एकटा लढला
10
एकहाती सत्तेपेक्षा 'मिलीजुली' सरकार देशहिताचं, जे सगळ्यांची 'मन की बात' ऐकेल; आदित्य ठाकरेंनी मांडला वेगळाच मुद्दा
11
"अरविंद केजरीवाल यांच्यासाठी माझ्याकडे एक वाईट बातमी आहे..."; काय म्हणाले अमित शाह?
12
Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?
13
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
14
धक्कादायक! वाहन चालवत असतानाच फार्मासिस्टचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
15
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
16
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी
17
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
18
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
19
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
20
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं

वेध - भगवानगड पुन्हा वेठीला

By सुधीर लंके | Published: September 14, 2017 12:09 AM

दसरा मेळाव्याच्या राजकारणातून एकप्रकारे भगवानगड वेठीला धरला जात आहे. भाविकांना भगवानबाबांऐवजी पोलीस फौजफाट्याचे दर्शन अगोदर घडते. ही वादाची परंपरा तेवत ठेवायची की भगवानगड वादमुक्त करायचा याचा फैसला पंकजा मुंडे यांच्याच हातात आहे.

 दस-याच्या निमित्ताने भगवानगडाभोवतीचा राजकीय शिमगा यावर्षीही सुरू झाला आहे. पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी मेळावा गडावरच घेण्याचा इशारा देऊन या वादाला पुन्हा तोंड फोडले आहे. त्यामुळे मुंडे यांच्या मेळाव्याविषयी ओघानेच सालाबादप्रमाणे उत्सुकता निर्माण झाली आहे.दसºयाच्या निमित्ताने राज्याचे राजकीय लक्ष आपणाकडे वेधले जावे, अशी तजवीजच पंकजा यांचे समर्थक करू लागले आहेत की काय अशी शंका येते. हे इशारे बहुधा त्याचाच भाग आहेत. नगर व बीड जिल्ह्याच्या सीमारेषेवर असणा-या भगवानगडावर संत भगवानबाबा यांची समाधी आहे. भगवानबाबा हे वंजारी समाजाचे असल्याने हा समाज या गडाला आपले दैवत मानतो. अर्थात भगवानबाबा हे स्वत: कधीही जातीपुरते मर्यादित राहिले नाहीत. जातीपातीच्या बाहेर पडत त्यांनी व्यापक सामाजिक व आध्यात्मिक काम उभे केले. त्यामुळे इतरही समाजात त्यांचे मोठे भक्तगण आहेत. भगवानबाबांनीच या गडावर दसरा महोत्सवाची परंपरा सुरु केली. राज्यातील ऊसतोड कामगार व कष्टकरी समाज यानिमित्ताने गडावर जमतो. मात्र, या महोत्सवाला आता राजकीय स्वरूप देण्याची प्रथा पडू पाहत आहे.गोपीनाथ मुंडे हयात असताना त्यांनी दस-याला गडावर भाषण करण्याची परंपरा सुरू केली. या मेळाव्यांचा वापर त्यांनी नकळतपणे वंजारी व ओबीसी समाजाची एकजूट उभारण्यासाठी केला. आपण गडावर राजकीय भाषण करीत नाहीत, असे मुंडे म्हणायचे. पण, त्यांच्या भाषणांचा ‘अर्क’ हा राजकीयच असायचा. अर्थात उपेक्षित समाजाला व्यासपीठ मिळत असल्याने मुंडे यांच्या मेळाव्यांना कधी फारसा विरोध झाला नाही. मुंडे यांच्या हयातीत गडाचे महंत डॉ. नामदेवशास्त्री यांनीही मेळाव्यांना विरोध केला नव्हता. मुंडे यांच्या निधनानंतर पंकजा यांनी ‘गोपीनाथगड’ नावाचा स्वतंत्र गड विकसित केल्यानंतर मात्र महंतांनी भगवानगडावर राजकीय भाषणांना बंदी केली. राजकीय भाषणे आता नवीन गडावरून व्हावीत, अशी भूमिका त्यांनी घेतली. पंकजा यांच्या समर्थकांना ही बाब मान्य नाही. भगवानगडावर ते राजकीय हक्कच सांगत आहेत. गतवर्षी महंतांनी गडावर परवानगी नाकारल्यानंतर पंकजा यांनी गडाच्या पायथ्याशी मेळावा घेतला होता. महादेव जानकर, राजू शेट्टी, सदाभाऊ खोत त्यास उपस्थित होते. या सर्व नेत्यांनी त्यावेळी यथेच्छ राजकीय भाषणे केली. जानकर यांच्या भाषणावरून तर वादळ उठले. या गडावरून राजकारण सुरू झाले आहे याची ती पावतीच होती.अस्मितांचा राजकीय वापर करण्याची जुनी परंपरा या देशात आहे. भाजपचा तर त्यात हातखंडा आहे. पंकजा यांचे समर्थक त्याच पावलाने निघाले आहेत. आध्यात्मिक व सामाजिक प्रेरणा देणारी जी शक्तिस्थळे आहेत त्यांचा वापर नेमका कसा करायचा? याची एक आचारसंहिताच यानिमित्ताने ठरण्याची आवश्यकता आहे. पंढरपूर व आळंदीला येणारी गर्दी ही जातीधर्माच्या व पक्षपार्ट्यांच्या पलीकडची आहे. अशीच गर्दी भगवानगडावर जमत असताना ही आपली ताकद आहे, असे भासविण्याचा नेत्यांचा प्रयत्न दिसतोय.नगर जिल्ह्यात वंजारी व ऊसतोड कामगार समाज मोठ्या प्रमाणावर आहे. या समाजाच्या प्रश्नांसाठी एकही नेता जोरकसपणे बोलताना दिसत नाही. बबनराव ढाकणे, दगडू बडे या नेत्यांनंतर या समाजाला नगर जिल्ह्यातून आमदारकी मिळू शकलेली नाही. जिल्हा परिषद अध्यक्ष व इतर राजकीय पदेही अभावानेच मिळताना दिसतात. त्याबाबत नेते शल्य बाळगताना दिसत नाहीत. दसरा मेळाव्यावरून मात्र राजकारण पेटविले जाते. पंकजा यांनी स्वत: अद्याप आपली भूमिका जाहीर केलेली नाही. विचाराअंती बोलू, असे त्या मुंबईत म्हणाल्या. भगवानगडाला वेठीला धरायचे की तो निरपेक्ष ठेवायचा? हे आता पंकजाच ठरवतील.

टॅग्स :Pankaja Mundeपंकजा मुंडेBJPभाजपा