शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

राजकीय धुळवडीची सुरुवात करणारे अधिवेशन

By अतुल कुलकर्णी | Updated: March 5, 2018 00:29 IST

अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला आठवडा गदारोळात संपला. गारपीट, बोंडअळीच्या विषयावर सत्ताधाºयांनी आधी बोलायचे की विरोधकांनी यावर सगळी शक्ती खर्च करणारे विरोधक आणि मूळ विषयाला बगल देणारे सत्ताधारी यांच्यातील संघर्षाने अधिवेशनाची सुरुवात झाली आहे. हा संघर्ष कोणत्या दिशेने जाणार हे या आठवड्यात स्पष्ट होईल.

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला आठवडा कोणतेही कामकाज न करता संपला. दुसºया आठवड्याची सुरुवात आजपासून होत आहे. पहिले दोन दिवस राज्यपालांच्या भाषणाचा मराठीत अनुवाद का केला नाही म्हणून संपले. तिसºया दिवशी बोंडअळी व गारपीटग्रस्त शेतकºयांना मदत देण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधक अशा दोघांनी ठराव आणले. पण कोणी आधी बोलायचे यावरून वाद झाले, सभागृहाचे काम वारंवार बंद पडले. तर चौथ्या दिवशी भाजपा पुरस्कृत आ. प्रशांत परिचारक यांचे निलंबन रद्द केले म्हणून विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांचे निलंबन यावरून सभागृह बंद पडले.विधानपरिषदेतील सदस्यांचे निलंबन रद्द करा किंवा करू नका, या मागण्यांसाठी विधानसभेत चर्चा व गोंधळ झाला. दिवसभरासाठी विधानसभा बंद पाडली आणि एक महिना चालणाºया अधिवेशनाचा एक आठवडा संपला. या अधिवेशनात राष्टÑवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपावरून दोन्ही सभागृहात झालेला गदारोळ काँग्रेससाठी देखील हवाहवासा आहे. भ्रष्टाचाराचे जर आरोप झाले असतील तर ते चुकीचे आहेत हे सिद्ध करण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आरोप झाले आहेत त्यांची आहे असा पवित्रा काँग्रेसने घेतला आहे, कारण त्यांच्यासाठी राष्टÑवादीवर आरोप होणे फायद्याचे आहे. शिवाय हल्लाबोल यात्रेच्या निमित्ताने मुंडे यांना मिळणारा प्रतिसाद सत्ताधाºयांसोबत काँग्रेसलासुद्धा चिंतेत टाकणारा होता. त्यामुळे मुंडेंना ब्रेक लावण्याचे काम यानिमित्ताने झाले आहे. मुंडे यांनी आता रोज एक सीडी आम्ही प्रकाशित करू असे आव्हान सरकारला दिले, त्यावर आमच्याकडूनही अशा सीडीज देता येतील, आपण हेच करायचे आहे का? असा सवाल शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केला. मात्र या घटनेने विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात संघर्षाला सुरुवात झाली आहे. नजीकच्या काळात हा संघर्ष आणखी तीव्र होईल. एकमेकांवर आरोप प्रत्यारोप होतील.अधिवेशनात असे रोज नवनवे विषय आले तर ते सरकारलाही हवेच आहेत. कारण साधे आहे. यामुळे सरकारच्या कामकाजाचे मूल्यमापन, त्यांनी घेतलेले निर्णय, सुरू केलेल्या योजना यांचे फलित यावर या अधिवेशनात चर्चा होण्याची शक्यता धूसर झाली आहे. दोन्ही काँग्रेसमध्ये अजूनही फ्लोअर मॅनेजमेंटचा अभाव आहे. कोणते विषय कधी घ्यायचे, त्यातून राजकीय लाभ कसा उठवायचा याविषयी दोघांमध्ये एकवाक्यता नाही, त्याउलट कोणते विषय येणार, त्यावर कुणी कोणते प्रश्न विचारायचे, फ्लोअरवर काय करायचे याचे नियोजन भाजपाकडून होताना पहिल्या आठवड्यात दिसले. सरकारविरोधी वातावरण आहे पण त्याचा राजकीय लाभ घेण्यासाठीचे नियोजन मात्र होताना दिसत नाही. सत्ताधाºयांना धनंजय मुंडेंवरील आरोपामुळे संधी चालून आली आहे. त्यामुळे विरोधकांनी कोणताही विषय काढला की सत्ताधारी तो विषय मुंडे यांच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न करतील. शिवसेनेनेदेखील आ. प्रशांत परिचारक यांच्या निलंबनाचा विषय हाती घेतला आहे. सोमवारी हाच विषय पुन्हा लावून धरला जाईल. त्यातून गदारोळ होईल. विधानपरिषदेत पुन्हा परिचारक यांच्या निलंबनाचा ठराव आणण्याची तयारी झाली आहे. होळी संपली, रंग उडवून झाले. राजकीय धुळवडीची सुरुवात या अधिवेशनाच्या निमित्ताने झाली आहे. 

टॅग्स :Vidhan Bhavanविधान भवनBudget Sessionअर्थसंकल्पीय अधिवेशन