'ब्र' न काढता धनखडांनी सोंगट्या हलवल्या आणि..
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2026 08:18 IST2026-04-01T08:11:21+5:302026-04-01T08:18:48+5:30
हरियाणातली भाजपची राज्यसभेची एक जागा थोडक्यात गेली. या घटनेने भाजपमध्ये अस्वस्थता आहे. कारण धनखड प्रकरण अद्याप मिटलेले नाही !

'ब्र' न काढता धनखडांनी सोंगट्या हलवल्या आणि..
हरीष गुप्ता
नॅशनल एडिटर, लोकमत, नवी दिल्ली
आसाम, ओडिशा आणि बिहार या तीन राज्यांत भाजपला राज्यसभेच्या तीन अधिक जागा मिळाल्या; परंतु हरियाणातील एक जागा अगदी एखाद्या मताने गेली. काही आकड्यात गडबड झाली का? तर तसे नाही. राजकारणात भुते क्वचितच गाडली जातात. जगदीश धनखड यांना विचारा. एकेकाळी वाजत-गाजत उपराष्ट्रपतिपदावर बसवल्या गेलेल्या धनखड यांना अचानक पायउतार व्हावे लागले. पक्षाच्या म्हणण्यानुसार तो विषय आता मागे पडला आहे. आता पुनरागमन नाही, कारण तशी परंपरा नाही. पुन्हा निवडणूक नाही. एकप्रकारे राजकीय कोंडीच । परंतु राजकारणात एक अचूक वेळ साधण्याचा दुष्टावा असतोच.
निवडणूक न लढवता, प्रचार न करता, ब्र ही न काढता धनखड यांनी शांतपणे राज्यसभेची जागा हलवली. देवीलाल यांचे वारसदार अभय चौताला यांच्यापाशी हा विषय पोहोचला. राजीनाम्यानंतर धनखड चौताला यांच्या फार्महाउसवर पाहुणे म्हणून नव्हे तर अगदी कुटुंबातले सदस्य म्हणून राहत आहेत. मतदान झाले तेव्हा इंडियन नॅशनल लोकदलाच्या दोन आमदारांनी तटस्थ राहायचे ठरवले. ते मौन खूप काही सांगणारे होते. ही मते भाजपकडे झुकली असती तर गेलेली जागा नक्कीच मिळाली असती. गणित आणि भावना एकत्र येतात त्या अशा.
धनखड प्रकरण मिटलेले नाही हे लक्षात आल्याने भाजपमध्ये अस्वस्थता आहे. त्यांना अशोभनीयरीत्या जावे लागल्याने जाट मंडळी दुखावली आहेत. केवळ हरियाणातच नव्हे तर राजस्थान आणि पश्चिम उत्तर प्रदेशमधील जाटांना हे रुचलेले नाही. याच समाजाला एकेकाळी धनखड उपराष्ट्रपती झाल्याने प्रतीकात्मक बळ मिळाल्याची भावना होती. आपल्याला राजकीय दणका मिळाला असे त्यांना आता वाटते आहे. ज्या प्रदेशात प्रचारापेक्षाही जात जातीय गणिते महत्त्वाची असतात अशा भागात हे घडले. नुकसान काय? तर राज्यसभेची एक जागा गेली. एका जागेने होणारे नुकसान? -टोचत राहणारी राजकीय खदखद । भारतीय राजकारणात गाजावाजा होत ज्यांना जावे लागते त्यांच्यापेक्षाही ज्यांचा आवाज होत नाही त्यांचे प्रतिध्वनी दीर्घ काळ उठत राहतात.
धनखड पायउतार होऊन आता आठ महिने झाले आहेत. माजी उपराष्ट्रपतींना अजूनही अधिकृतपणे मिळालेल्या बंगल्याची प्रतीक्षा आहे. एपीजे अब्दुल कलाम रोडवर ल्युटियन्स दिल्लीत ही वास्तू आहे. बंगला मिळत का नाही? तर दुरुस्ती चालली आहे, तांत्रिक अडचणी आहेत, कागदोपत्री पूर्तता व्हावयाची आहे... नोकरशाही देत असलेले यातले कोणतेही कारण घ्या.
बंगला तसे पाहता काही महिन्यांपूर्वीच दिला गेला असेच सांगितले जाते. मात्र हा खेळ असा की धनखडांना तो अजून प्रत्यक्षात मिळालेला नाही. दरम्यान, धनखड साहेब मात्र खाजगी फार्महाउसवर आराम फर्मावत आहेत.
पदनामे अस्पष्ट होतात. शिष्टाचार बाजूला पडतात. फाइल मात्र फाइल असते. ती तिला हवा तेवढा काळ फिरत (च) राहाते. धनखड यांना हा धडा अनपेक्षित असेल; पण तो चुकणारा नव्हता. दिल्लीत तुम्ही भले कायदे कानून, नियम लागू करणारे असाल, पण आज ना उद्या तुम्हालाही ते लागू होतातच.
नितीश कुठेही जात नाहीत!
प्रकृती अस्वास्थ्याबद्दल सातत्याने बोलले जात असतानाच ते दिल्लीला जायला निघाले खरे; पण नितीश कुमार इतक्यात काही बिहारच्य राजकारणातून बाहेर पडत नाहीत. राज्यसभे जाण्याची तयारी सुरू असतानाही संयुक्त जनत दलाचे अध्यक्षपद त्यांनी आपल्याकडेच ठेवले.
मुख्यमंत्रिपदावरून नितीश पायउतार झाल असले तरी सत्तेची सूत्रे ते आपल्याच हातात ठेवणार आपला उत्तराधिकारी निवडण्यात त्यांचीच भूमिक महत्त्वाची असेल असे पक्षाच्या अंतस्थ सूत्रांचे म्हणप आहे. सम्राट चौधरी यांचे नाव मुख्यमंत्रिपदासार्ट घेतले जात असले तरी अंतिम निर्णय नितीश हे घेतील. उपमुख्यमंत्रिपदासाठी ते आपल्या पुत्राचे ना जाहीरपणे घेत आहेत. त्यात त्याला राजकारणात पुर नेण्याबरोबरच घडामोडींवर आपले लक्ष राहील, अश ही व्यवस्था असेल. आत्तापर्यंत राजकारणापासून दू असलेले त्यांचे पुत्र आता भविष्यातले सूत्रधार म्हणू. सादर केले जात आहेत. सत्ता न सोडता भविष्यकात आपल्या हातात ठेवण्याचा नितीश यांचा इराद त्यातून उघड दिसतो.
भाजपच्या बाजूने पाहू जाता ही व्यवस्थ कोणताही संघर्ष उत्पन्न न करता पुढे चाल मिळवू देणारी आहे. संयुक्त जनता दलासाठी त्यांचे सामाजिक जुळणी हलत नाही. प्रकृतीमुळे काह मर्यादा आल्या असतील; परंतु नितीश कुमारांच्य राजकीय आकांक्षा त्यामुळे संपलेल्या नाहीत कालबाह्य होण्यापेक्षा भूमिका बदलण्यात त्यांचे कलाकारी दिसते. बिहारच्या राजकारणातून नितीः बाहेर पडत नसून ते फक्त जागा बदलत आहेत.
harish.gupta@lokmat.com