शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
3
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
4
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
5
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
6
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
7
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
8
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
9
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
10
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
11
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
12
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
13
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
14
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
15
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
16
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
17
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
18
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
19
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
20
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले

Kantabai Satarkar: ‘लक्ष घालून बसा, सख्या मी आहे तुमची कांता’

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2021 05:46 IST

Kantabai Satarkar: घर सोडून पायात चाळ बांधलेली ही हिकमती मुलगी पुढे तमाशाचे फड गाजवणारी सरदारीण बनली : कांताबाई सातारकर!

- सुधीर लंके (आवृत्तीप्रमुख, लोकमत अहमदनगर)‘गावची हागणदारी ही आम्हा तमासगिरांची वतनदारी आहे’ असं तमाशासम्राज्ञी कांताबाई सातारकर महाराष्ट्र शासनाचा ‘जीवनगौरव’ पुरस्कार स्वीकारताना म्हणाल्या होत्या. त्यांच्या या बोलण्यात एक दु:खाची सल होतीच, पण व्यवस्थेने आम्हा तमाशा कलावंतांची कितीही अवहेलना केली तरी आम्ही समाजासाठीच लढतो व जगतो,’ हेही त्यांना यातून ध्वनित करावयाचे होते. नुकतेच वयाच्या ८२ व्या वर्षी या सम्राज्ञीचे निधन झाले. त्यांचे पती तुकाराम खेडकर हे १९६४ साली निवर्तले. आज कोरोना महामारीने कांताबाईंना हिरावल्याने एक प्रकारे तमाशातील ‘राजाराणी’ हरपल्याची या जगतातील भावना आहे.त्या एकही इयत्ता शिकलेल्या नव्हत्या. पण, तमाशाच्या इतिहासात नोंद करणारी भूमिका त्या जगल्या. मूळच्या सातारच्या. कांता साहेबराव कांबळे. त्यांच्या गावावरून त्यांना नवे आडनाव मिळाले. पण, अलीकडे चाळीस वर्षे त्या नगर जिल्ह्यात संगमनेर येथे स्थिरावल्या होत्या. आई-वडील दगडखाणीत काम करायचे. कुटुंब जगविण्यासाठी कांताबाईंनी वयाच्या नवव्या वर्षी साताऱ्याला अहिरवाडीकरांच्या तमाशाद्वारे पायात चाळ बांधले. घरच्यांशी द्रोह पत्करत या एकट्या मुलीने पुणे, मुंबई गाठली व स्वत:चे जीवन घडविले. दादू इंदोरीकरांच्या तमाशात त्यांना प्रवेश मिळाला होता. मात्र, त्यापेक्षा तुकाराम खेडकर यांचा तमाशा आवडल्याने त्यांनी त्या तमाशात काम केले. भालजी पेंढारकर यांनी त्यांना चित्रपटाची ऑफर दिली होती. मात्र, त्यांनी तमाशाच पसंत केला.तुकाराम खेडकर हेही महाराष्ट्रातील मोठे फडमालक. कलाकार म्हणूनही दादा माणूस. ते मूळचे कोकणातील. त्यांचे कुटुंब मुंबईत प्लेगच्या साथीने गेले. पुढे जगण्यासाठी ते तमाशात कामाला लागले व या लोकांच्या मनावर गारुड करत तमाशासम्राट, वगसम्राट बनले. रंगमंचावर ‘रायगडची राणी’, ‘हरिश्चंद्र तारामती’ अशा वगनाट्यांत तुकाराम खेडकर व कांताबाई हे राजाराणीच्या भूमिका साकारायचे. आयुष्यातही एकमेकांचे सोबती बनलेल्या या जोडीने तमाशा रसिकांना वेड लावले. पतीचे छत्र हरपल्यानंतर त्यांची फरफट झाली. पतीच्या साथीदारांनी त्यांना मदत केली नाही, म्हणून पतीच्या नावाने असलेला फड सोडत त्यांनी स्वत:च्या व मुलगा रघुवीर यांच्या नावाने स्वतंत्र फड उभारला. शरद पवार मुख्यमंत्री असताना त्यांनी वैयक्तिक पातळीवर या फडाला आर्थिक मदत करत राजधर्म जपला होता.कांताबाई या एका अर्थाने तमाशातील विक्रमवीर ठरतात. त्या तमाशातील पहिल्या ‘स्त्री सरदार’ म्हटल्या जातात. ‘सरदार’ म्हणजे तमाशात मालक, व्यवस्थापक, कलाकार, शाहीर अशा सगळ्या भूमिका निभावणे. तमाशात पुरुष हे स्त्री भूमिका साकारतात. परंतु कांताबाईंनी पुरुषांच्या भूमिका साकारण्याचे धाडस केले. खानदेशात संगीतबारी प्रसिद्ध आहे. पण, तेथे ढोलकीचा तमाशा कांताबाईंनी लोकप्रिय केला.एका स्त्रीने तमाशात पुरुषी भूमिका साकारणे काही फड मालकांना पटत नव्हते. मात्र, कांताबाई ही बंडखोरी बिनधास्त करत आल्या. तुकाराम खेडकर हे राष्ट्र सेवा दलाला मानणारे होते. बॅरिस्टर नाथ पैंसारख्या नेत्यांचे विचार समाजापर्यंत पोहोचायला हवेत, यासाठी तुकाराम खेडकर त्यांना तमाशात बोलावत. कार्यक्रम मध्येच थांबवत व भाषण करायला लावत. हाच कित्ता कांताबाई व त्यांचा मुलगा रघुवीर यांनी गिरविला. तमाशाच्या कार्यक्रमातून त्यांनी अनेक शाळा व आजारी व्यक्तींना शस्त्रक्रियेसाठी मदत केली. तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांच्या नावे राज्य शासनाने तमाशा कलावंतांसाठी ‘जीवनगौरव’ पुरस्कार सुरू केला आहे. विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना हा पहिला पुरस्कार कांताबाईंना मिळाला. दिल्लीत राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत तमाशा सादर करण्याचा मानही त्यांना मिळाला. तमाशा जगला पाहिजे व या कलावंतांना सन्मान मिळायला हवा, ही धडपड त्यांनी सतत केली. ‘लक्ष घालून बसा, सख्या मी आहे तुमची कांता’ या लावणीवरून कांताबाईंचे नामकरण झाले. पण, ही कांता तमाशाची सरदार बनली.

टॅग्स :marathiमराठीcultureसांस्कृतिकMaharashtraमहाराष्ट्र