शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
2
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
3
७० वर्षांत काहीच झाले नाही, मग १० वर्षे तुम्ही काय केले; प्रियंका गांधींचा PM मोदींना सवाल
4
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
5
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
6
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
7
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
8
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
9
जॅक नो Chill! २२ वर्षीय पोरानं मुंबईला पाणी पाजले; दिल्लीने उभी केली सर्वोच्च धावसंख्या 
10
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
11
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
12
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
13
हृदयद्रावक! ६ महिन्यांचा लेक पोरका झाला; भारतमातेच्या हुतात्मा सुपुत्राला अखेरचा निरोप
14
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
15
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...
16
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
17
ममता बॅनर्जी हेलिकॉप्टरमध्येच पडल्या, दोन वर्षांतली चौथी घटना
18
इंटिमेट सीन्समुळे अनेक चित्रपट गमावले, आईवडिलांची नव्हती परवानगी; मृणाल ठाकुरचा खुलासा
19
९ चौकार, ३ षटकार! २२ वर्षीय जॅक फ्रेझर-मॅकगर्कची वेगवान फिफ्टी; बुमराहलाही धू धू धुतले 
20
“अशोक चव्हाण मोठे नेते असते तर मोदी-शाहांनी नांदेडमध्ये सभा घेतली नसती”: बाळासाहेब थोरात

सांसदीय गोंधळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 12:52 AM

एवढे दिवस संसदेत आरडाओरड करून आम्ही ती बंद पाडली तरी सरकार ‘जनतेचे प्रश्न’ हाती घेत नाही म्हणून काँग्रेसने देशव्यापी उपोषण मांडले, नंतर त्यांनी संसद बंद पाडून लोकशाही मारली म्हणून भाजपने तसेच उपोषण देशभर केले.

एवढे दिवस संसदेत आरडाओरड करून आम्ही ती बंद पाडली तरी सरकार ‘जनतेचे प्रश्न’ हाती घेत नाही म्हणून काँग्रेसने देशव्यापी उपोषण मांडले, नंतर त्यांनी संसद बंद पाडून लोकशाही मारली म्हणून भाजपने तसेच उपोषण देशभर केले. संसद चालविणे याहून ती बंद पाडणे हाच कार्यक्रम आपल्या राजकीय पक्षांनी २०१२ पासून चालविला आहे. डॉ. मनमोहन सिंगांचे सरकार सत्तेवर असताना हा पराक्रम भाजपने केला. आता मोदींचे सरकार सत्तारूढ असताना त्याची परतफेड काँग्रेस करीत आहे. या दोन्ही पक्षांच्या परस्परविरोधी कांगाव्याला त्याचमुळे अर्थ नाही. प्रसिद्धीसाठी फ ायद्याची स्टंटबाजी हेच त्यांच्या संसद बंद पाडण्याच्या व नंतर उपोषण करण्याच्या प्रकारातील तथ्य आहे. आश्चर्य याचे की या दोन्ही राष्ट्रीय म्हणविणाऱ्या पक्षांचे मानांकित नेतेही या गदारोळात सहभाग घेताना, त्यास प्रोत्साहन देताना जसे दिसले तसे त्यांच्यातील कुणी आपल्या निष्ठावंत अनुयायांना, किमान लोकशाहीसाठी, आवर घालतानाही दिसले नाही. त्यामुळे संसदेतील गदारोळ, संसद बंदी आणि त्यानंतरची वेतनबंदी व उपोषण हे सारे एकाच निंद्य नाटकाचे चार अंक आहेत आणि ते मुकाटपणे पाहण्याची पाळी देशाच्या सुबुद्ध मतदारांवर आली आहे. आणखी एक गंमत ही की काँग्रेसचे लोक संसद बंद पाडतात तेव्हा त्या पक्षाचे कार्यकर्ते टाळ्या वाजवितात आणि भाजपावाले आपल्या संसद बंदीच्या वेळीही तसाच जल्लोष करताना दिसतात. वास्तव एवढेच की लोकशाही म्हणजे केवळ आमच्याच पक्षाचे राज्य अशी या साºयांची धारणा आहे. तुमचे राज्य म्हणजे लोकशाही नव्हे असा याचा दुसरा अर्थ आहे. संसदेत राहुल गांधी असतात, सोनियाजी असतात, तसे अडवाणी आणि जोशीही असतात. मात्र या मोठ्या माणसांसह सारे ज्येष्ठ नेतेही अशावेळी मौन बाळगून असतात किंवा ते जे सुरू आहे तोच सद्यस्थितीवरचा खरा उपाय आहे, असे त्यांनाही वाटत असते. तात्पर्य लोकशाहीविषयीची या पक्षांची ही एक मोठी राजकीय ढोंगबाजी आहे. त्यांचे खरे प्रेम सत्तेवर आहे आणि सत्तेतून मिळणाºया अधिकारावर व आणखीही त्यातून मिळणाºया अनुषंगिक लाभांवरच त्यांचा खरा लोभ आहे. त्यामुळे या बतावणीला कुणी बळी पडण्याचे कारण नाही. कालपर्यंत त्यांचा गोंधळ झाला, आता हे गोंधळ करीत आहेत आणि हे गोंधळीच आपले प्रतिनिधी म्हणून आपले भविष्य साकारायला आपण निवडून दिले आहेत. माध्यमांचे बरे आहे, ती या ढोंगाचे विश्लेषण करीत नाहीत आणि त्यांचा इतिहासही लोकांना सांगत नाहीत. आजचा गोंधळ ही आताची ताजी बातमी आणि कालचा गोंधळ ही शिळी झालेली बिनकामाची बातमी. देशात बेरोजगारीने प्रचंड संताप उभा केला आहे. शेतकºयांच्या आत्महत्या थांबत नाहीत. काश्मीरच्या सीमेवर जवानांचे शहीद होणे सुरूच असते, दलितांवरील अत्याचार वाढत असतात आणि अल्पसंख्याकांच्या मनातली धास्तीही मोठी होत असते. तिकडे चीन धमक्या देतो आणि देशाच्या अनेक प्रदेशांवर आपला हक्क सांगतो. बँका नागरिकांचे पैसे बुडवितात, ते बुडविणारे विदेशात मजेत असतात, त्यांच्या तेथे पोहोचण्यास सरकारची मदतही लाभत असते. पंतप्रधान मात्र स्वच्छतेच्या मोहिमा काढतात आणि अमित शहा ‘काँग्रेसमुक्त भारताची’ हाळी देतात. तात्पर्य जनतेचे प्रश्न जेथल्या तेथे, देशासमोरची संकटे आहेत तशीच. जनतेचे प्रतिनिधी वेतन परत करतात (त्या दिवसातील उत्पन्न परत करत नाहीत) आणि आपली हतबलता दाखवायला उपोषणाचे मंडप उभे करतात. त्या मंडपातील भाषणेही प्रचारी आणि मतांचा जोगवा मागणारी. ही सारी गोंधळगाथा भारत माता पाहत असते आणि सामान्य जनतेसारखीच बहुदा तीही व्यथित होत असते. लोकशाहीला काळीमा फासणे हीच लोकशाही वाचविण्याची कृती आहे असे बहुदा आपल्या पुढाºयांचे मत झाले असावे असे सांगणारे हे चित्र आहे.

टॅग्स :ParliamentसंसदBJPभाजपाcongressकाँग्रेसlok sabhaलोकसभा