शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

Pankaja Munde : पंकजा मुंडे यांचे राजकारण संपवायचे आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2020 3:54 AM

Pankaja Munde News : एकनाथ खडसे राष्ट्रवादीवासी झाल्यानंतर भाजपच्या माळी, धनगर, वंजारी (माधवं) या राजकीय सूत्रांचे नेतृत्व पंकजांकडे येणे क्रमप्राप्त आहे आणि मतांची ही उतरंड रचण्यात गोपीनाथ मुंडेंचे योगदान विसरता येणे शक्य नाही. तरीही भाजपने हा जाणूनबूजून केलेला प्रयत्न पंकजांची राजकीय कोंडी करण्यासाठी होता.

- सुधीर महाजन(संपादक, औरंगाबाद आवृत्ती) 

पंकजा मुंडेंचं काय करायचं, असा प्रश्नच भाजपच्या धुरिणांना पडला काय, असा एकूण माहोल दिसतो. नसता साडेसहा लाख ऊसतोड, कामगार मुकादमांची संघटना ताब्यात असणाऱ्या पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाला चूड लावण्याचा भाजपमधून प्रयत्न झाला नसता. गोपीनाथ मुंडेंनी जी संघटना बांधली आणि साखर कारखानदारीवर एक आपला दबावगट तयार करत बीडमध्ये भाजप तळागळात बळकट केला तिचे नेतृत्त्व नंतर पंकजांकडे येणे साहजिकच होते; पण राजकीय कोंडी करण्याच्या प्रयत्नात भाजपने यावेळी त्यांच्याविरोधात आपल्याच पक्षातील सुरेश धस यांना वापरले. कोरोना महामारीची संधी घेत पंकजा या बीडबाहेर आहेत हे हेरून भाजपने सुरेश धसांना अधिकृत पत्र देऊन महाराष्ट्रभर ऊसतोड कामगार आणि मुकादमांच्या बैठका घेण्याचे अधिकार दिले आणि धस यांनीसुद्धा राज्यात १०६ बैठका घेत वातावरण निर्मिती केली. ही संघटना पंकजा यांच्या हातातून गेली असा एक आभास निर्माण करण्यात ते यशस्वी झाले.महाराष्ट्रातील सर्वच साखर कारखान्यांच्या क्षेत्रात दरवर्षी बीड जिल्ह्यातून साडेसहा लाख ऊसतोड कामगार जातात. या कामगारांनी कोयता खाली टाकला तर एकाही कारखान्याचा बॉयलर पेटू शकत नाही आणि या सर्वांची संघटना गोपीनाथ मुंडेंनी बांधली होती. हे बहुसंख्य कामगार वंजारी समाजाचे असल्याने त्यांची निष्ठा गोपीनाथ मुंडेंनंतर पंकजा मुंडे आणि ओघाने भाजपवर असल्याने एका अर्थाने भाजपची परंपरागत मतपेटी तयार झाली आहे. याच मतपेटीला फोडून समांतर नेतृत्व उभे करण्याचा प्रयत्न भाजपकडून झाला. या संघटनेचा नेता कोण या मुद्द्यावरही भाजपमधील मते-मतांतरे उघड झाली. सुरेश धस यांना पद्धतशीरपणे पुढे आणण्यात आले. एकनाथ खडसे राष्ट्रवादीवासी झाल्यानंतर भाजपच्या माळी, धनगर, वंजारी (माधवं) या राजकीय सूत्रांचे नेतृत्व पंकजांकडे येणे क्रमप्राप्त आहे आणि मतांची ही उतरंड रचण्यात गोपीनाथ मुंडेंचे योगदान विसरता येणे शक्य नाही. तरीही भाजपने हा जाणूनबूजून केलेला प्रयत्न पंकजांची राजकीय कोंडी करण्यासाठी होता. विधानसभेतील पराभवानंतर राज्याच्या राजकारणात त्यांना कसे प्रभावहीन करता येईल, याचे प्रयत्न झाले. भाजपच्या केंद्रीय संघटनेत वर्णी लावत त्यांना राज्याबाहेर पाठवण्याचा घाट घातला आणि ऊसतोड कामगार संघटनेत फूट पाडण्याचा प्रयत्न झाला. काल साखर संघात शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ऊसतोड कामगारांच्या मागण्यांवर समाधानकारक तोडगा निघाला. प्रारंभी सुरेश धस यांना बैठकीत बसण्यास परवानगी नाकारली आणि त्यांनी तेथेच आंदोलन केले. नंतर त्यांना बैठकीत बसू दिले; पण वाटाघाटी-निर्णयप्रक्रियेत त्यांची फार दखल घेतली गेली नाही. साखर संघ आणि पर्यायाने शरद पवारांची ही खेळी दुर्लक्षून चालणार नाही. या वाटाघाटींना मंत्री धनंजय मुंडेही हजर होते आणि बैठकीत पंकजा यांच्या शेजारीच बसलेले दिसले. या दोघांचे बैठकीत छायाचित्र समाजमाध्यमावर प्रसारित झाले ते सकारात्मक संदेश देणारे होते. सुरेश धस यांचा या संघटनेतील शिरकाव आता मुंडेंना आव्हान ठरणार आहे आणि बीडमध्ये त्यांच्याविरुद्ध हे प्यादे वापरले जाणार हे स्पष्ट झाले. त्यामुळे परवाच्या दसरा मेळाव्यात पंकजांनीच माजी आ. भीमराव धोंडे यांना पहिल्या रांगेत बसविले. या दसरा मेळाव्यात आक्रमक भाषणातून बीडमध्ये राजकीय संघर्ष अटळ असल्याचा संदेश दिला. विधानसभेच्या निवडणुकीतील निकालाकडे पाहिले तर पंकजा मुंडे, भीमराव धोंडे आणि रमेश आडसकर या भाजपच्या तीन उमेदवारांचा पराभव झाला होता. तीन महत्त्वाचे उमेदवार पराभूत होतात ही भाजपसाठी धक्का देणारी बाब होती; पण पंकजांसोबत पराभूत होणारे दोघेंही त्यांचे जिल्ह्याच्या राजकारणातील खंदे समर्थक होते आणि ते पराभूत का झाले, त्यांच्याविरोधात कोणी काम केले हे त्यावेळी जाहीर झाले आहे आणि याच पद्धतीने निवडणुकीनंतर पंकजांचे खच्चीकरण करण्यात पक्षातूनच प्रयत्न झाले. गेल्यावर्षी दसरा मेळाव्यात त्यांनी एकनाथ खडसेंना निमंत्रित केले होते तेव्हाच श्रेष्ठींविरुद्धची त्यांची भूमिका स्पष्ट झाली होती. कालच्या साखर संघाच्या बैठकीत मजुरी,  ऊसतोडणी कामगारांसाठी महामंडळ या मागण्या मान्य करून घेत एका अर्थाने भाजप श्रेष्ठींच्या राजकारणाला शह दिला. आता बीडमध्ये शह-काटशहाच्या राजकारणातील  रंगत पहायला मिळेल. पंकजांचा ‘खडसे’ करण्यात भाजप यशस्वी होतो की पंकजा डाव उलटवतात हे काळच ठरवेल.

टॅग्स :Pankaja Mundeपंकजा मुंडेBJPभाजपाBeedबीडPoliticsराजकारण