शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

घुबड... त्यांना तो शकुन, मग इतरांना अपशकुन कसा?

By गजानन दिवाण | Updated: December 3, 2019 02:12 IST

घुबड संपले, तर आपले काय बिघडले? प्रत्येक ठिकाणी स्वार्थ शोधणाऱ्या माणसाच्या जगात हा प्रश्न उपस्थित केला जाऊ शकतो.

- गजानन दिवाण (उपवृत्तसंपादक, लोकमत, औरंगाबाद)

प्रगतीची अनेक शिखरे पार केली, तरी घुबडाला पाहणे शकुन की अपशकुन, असा प्रश्न अनेकांना पडतो. गावागावात तो उपस्थित होतो. पुढारलेल्या शहरांमध्ये देखील तो होतो. घुबडाचे तोंड पाहिले की अपशकुन होतो, असा आमचा गैरसमज. काळ्या जादूच्या अंधश्रद्धेतून वाढलेली शिकार, प्रचंड जंगलतोड, जंगलावरील अतिक्रमणे आणि वणव्यांमुळे या घुबडांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. हे थांबावे आणि जनजागृती व्हावी म्हणून पुण्यात गेल्या आठवड्यात जागतिक घुबड परिषद भरविण्यात आली होती. जगभरातील १६ देशांमधील संशोधकांनी या ठिकाणी हजेरी लावली.घुबड संपले, तर आपले काय बिघडले? प्रत्येक ठिकाणी स्वार्थ शोधणाऱ्या माणसाच्या जगात हा प्रश्न उपस्थित केला जाऊ शकतो. शेतात पिकांची प्रचंड नासाडी करणारे उंदीर आणि घूस या घुबडाचे मुख्य अन्न. घुबडाला शेतकऱ्यांचा मित्र म्हटले जाते, ते यामुळेच. उंदराच्या सात जाती, सरपटणाºया चार जाती, चिचुंद्रीच्या तीन आणि काही किडेदेखील घुबडाचे अन्न. जगभरात घुबडाच्या जवळपास २४० जाती आढळतात. त्यातील ३८ प्रकारच्या जाती भारतात आढळतात. यातही ५० टक्क्यांपेक्षा अधिक घुबड एकट्या महाराष्टÑात आढळतात. अंधश्रद्धेतून भारतात दरवर्षी ७८ हजार घुबडांची हत्या होत असल्याची आकडेवारी या परिषदेचे संयोजक आणि इला फाउंडेशनचे संस्थापक डॉ. सतीश पांडे यांनी दिली. हा पक्षी तसा अतिशय देखणा; पण काही कारणांमुळे तो भेसूर वाटतो. घुबडाचे डोळे समोर असतात आणि त्यांची रचना ट्यूबसारखी असते. त्याला तीन पापण्या असतात. मोठ्या डोळ्यांमुळे तो रात्रीसुद्धा स्पष्ट बघू शकतो. दिवसा आराम करतो आणि रात्री तो शिकारीसाठी बाहेर पडत असतो. घुबडाला डोळे हलविता येत नाहीत. आजूबाजूला पाहण्यासाठी तो डोळे नव्हे तर अख्खे डोके गोल फिरवीत असतो. माणसांच्या नजरेत हे भीतीदायक असते. त्याच्या मानेत १४ मणके असतात. त्यामुळेच तो आपली मान २७० अंशांमध्ये फिरवू शकतो. घुबडाची ऐकण्याची क्षमतादेखील अतिशय उत्तम असते. घुबडाच्या पंखांवरील पिसांची रचना अशी असते की, ज्यामुळे उडताना त्याच्या पंखांचा अजिबात आवाज होत नाही. स्वत:च्या रक्षणासाठी घुबड भयावह आवाज काढू शकतात. भीती वाटण्याचे हे आणखी एक कारण.ज्याचे तोंड पाहिल्याने दिवस वाईट जातो, असा समज असलेल्या त्या घुबडावर कोल्हापूरचे संशोधक डॉ. गिरीश जठार यांनी नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळ येथे तीन वर्षे अभ्यास केला. नंतर तब्बल एक महिना मेळघाटात घालविला. या काळात दिवसातून किमान तीन वेळा त्यांना घुबड दिसायचे. म्हणून त्यांचा कुठलाच दिवस वाया गेला नाही. उलट याच घुबडाच्या संशोधनावर त्यांनी पीएच.डी. मिळविली. घुबडाच्या अतिसंकटात असलेल्या आठ जातींपैकी ‘रानपिंगळा’ या जातीचा घुबड जठार यांनी शोधला. महाराष्टÑात घुबडाच्या १२ पेक्षा जास्त जाती आढळणारे तोरणमाळ, मेळघाट आणि तानसा अभयारण्य ही तीनच ठिकाणे आहेत. घुबडाला वाचवायचे असेल, तर त्यांचा अधिवास वाचवायला हवा. हाच विचार करून बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी अर्थात ‘बीएनएचएस’ने तानसा अभयारण्यात विविध उपक्रम हाती घेतले आहेत. स्थानिकांची जैवविविधता समिती स्थापन करून जंगलावरील अतिक्रमण, वणवे रोखण्याचा प्रयत्न केला जात आहे. शिवाय जंगलाशेजारी राहणाºया लोकांचे जंगलावरील अवलंबित्व कमी केले जात आहे. जनजागृतीसाठी दरवर्षी २४ आॅक्टोबर हा रानपिंगळा संवर्धन दिवस साजरा केला जात आहे. जठार यांच्याशिवाय महाराष्टÑात पुण्यात राहणारे पंकज कोपर्डे घुबडाच्या उत्क्रांतीवर अभ्यास करीत आहेत. त्यांनी याच विषयावर पीएच.डी. मिळविली आहे. त्यांच्या अभ्यासानुसार भारतात आढळणाºया लहान आकाराच्या घुबडाची उत्क्रांती साधारण ३० ते ५० लाख वर्षांपूर्वी झाली असावी.देवी लक्ष्मी स्वर्गातून खाली उतरत असताना तिच्याजवळ सर्वात आधी घुबड पोहोचले. त्यामुळे तिने घुबडाला आपले वाहन निवडले, अशी एक आख्यायिका सांगितली जाते. जठार आणि कोपर्डे या दोघांनाही घुबड शकुन ठरले. तसे पाहिल्यास घुबड कोणासाठीच अपशकुन ठरत नाही. शेतकºयांचा मित्र, म्हणजे तो सर्वांचाच मित्र. मग त्याचा अपशकुन कसा?

टॅग्स :environmentपर्यावरण