शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी कारवाई...! दिल्ली स्फोटानंतर काश्मीरात 500 ठिकाणी छापे, 600 जण ताब्यात; 'व्हाईट कॉलर टेरर' मॉड्यूलच्या फास आणखी आवळला
2
अल-फलाह विद्यापीठ संशयाच्या कचाट्यात, वेबसाइटवरील खोट्या मान्यतेच्या दाव्याबद्दल चौकशी सुरू; NAAC कडून नोटीस जारी
3
कॅशने घर घेताय? थांबा! होम लोनचा असा करा 'स्मार्ट' वापर! गृहकर्ज फिटेपर्यंत कोट्यधीश व्हाल
4
दिल्ली स्फोट : गाडीतील मृतदेह डॉक्टर उमरचाच; डीएनए जुळला! नक्की कशी पार पडली फॉरेन्सिक प्रक्रिया?
5
"प्रत्येक काश्मीरी दहशतवादी नाही", दिल्ली स्फोटावर मुख्यमंत्री उमर अब्दुल्लांची प्रतिक्रिया
6
जगात सर्वात शक्तिशाली सैन्य असणाऱ्या देशांची यादी जारी; अमेरिका टॉपवर, भारताचा कितवा नंबर?
7
Rashmika Mandanna : रश्मिका मंदानाचं 'फिटनेस सीक्रेट'; बिझी शेड्यूलमध्ये स्वत:ला अभिनेत्री कसं ठेवते फिट?
8
Delhi Blast: दिल्लीत बॉम्बस्फोट घडवणाऱ्यांना धडा शिकवला जाणार, अमित शहांची गुप्तचर अधिकाऱ्यांसोबत बैठक
9
रस्त्यावर फक्त माणसाचा पायच दिसला, पण तो व्यक्ती कोण?; इंदापूरला हादरवून टाकणारी घटना
10
Exit Poll अंदाजाने सुखावणाऱ्या NDA साठी हा आकडा ठरतोय डोकेदुखी; बिहारच्या निकालात उलटफेर होणार?
11
रुपाली ठोंबरेंना दुसरा धक्का, स्टार प्रचारकांच्या यादीत स्थान नाही; पक्षाने साइडलाइन केले?
12
“अजित पवारांना सत्तेतून बाहेर पडावे लागेल अशी स्थिती निर्माण केली जाणार”: विजय वडेट्टीवार
13
बॉलिवूडच्या या अभिनेत्रीच्या घरी हलला पाळणा, छोट्या परीला घेतलं दत्तक, फोटो शेअर करून दिली खुशखबर
14
बांगलादेशमध्ये पुन्हा हिंसाचार भडकला, शेख हसीना यांच्यावरील निकाल लवकरच येणार
15
मोठा खुलासा...! 8 दहशतवादी, 4 कार अन् 4 शहरे...! दिल्लीच नव्हे, संपूर्ण देशात दहशत माजवण्याचा होता प्लॅन!
16
कोणत्या देवाची उपासना ठरते शीघ्र फलदायी? प्रेमानंद महाराजांनी दिले चपखल उत्तर!
17
"सरकारने पाकिस्तानवर चकार शब्द काढला नाही", दिल्ली बॉम्बस्फोटावरुन काँग्रेसचा केंद्रावर हल्ला
18
59 लाख पेन्शनधारकांना 8व्या वेतन आयोगाचे फायदे मिळणार नाहीत? कर्मचारी संघटनेने केंद्राला पत्र
19
सोन्यानंतर आता चांदीवरही लोन घेता येणार, RBI चा मोठा निर्णय; कसं जाणून घ्या
20
पश्चिम बंगालमध्ये 34 लाख Aadhar धारक ‘मृत’, UIDAI ची निवडणूक आयोगाला माहिती
Daily Top 2Weekly Top 5

कांदा रडवतोय पण...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 00:13 IST

२०१६ मध्ये गृहिणींना रडविणारा कांदा यंदा उत्पादकांना रडवतोय. महाराष्ट्र आणि लगतच्या राज्यांमध्ये कांद्याचे विक्रमी उत्पादन झाल्यामुळे यंदा भाव मोठ्या प्रमाणात घसरले आहेत. आशिया खंडातील सर्वात मोठी कृषी उत्पन्न बाजार समिती असलेल्या कळमना यार्डमध्ये कांद्याचा भाव प्रति किलो पाच रुपये इतका खाली आला आहे.

२०१६ मध्ये गृहिणींना रडविणारा कांदा यंदा उत्पादकांना रडवतोय. महाराष्ट्र आणि लगतच्या राज्यांमध्ये कांद्याचे विक्रमी उत्पादन झाल्यामुळे यंदा भाव मोठ्या प्रमाणात घसरले आहेत. आशिया खंडातील सर्वात मोठी कृषी उत्पन्न बाजार समिती असलेल्या कळमना यार्डमध्ये कांद्याचा भाव प्रति किलो पाच रुपये इतका खाली आला आहे. शेतकऱ्यांना कांद्याचे उत्पादन घेण्यासाठी जितका खर्च आला त्यापेक्षा जास्त खर्च कांदा बाजारपेठेत पोहोचविण्यासाठी येत असल्याने गावागावांत आणि शहरातील चौकाचौकात कांद्याची बेभाव विक्री होत आहे. ४० किलोचा कट्टा २०० रुपयापर्यंत विकला जात असल्याने शेतकºयांच्या डोळ्यात कांद्याने अश्रू आणले आहेत. गतवर्षी कांद्याला जास्त भाव मिळाल्यामुळे शेतकºयांनी मोठ्या प्रमाणात लागवड केली होती. विदर्भासह मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातही शेतकºयांनी कांद्याचे पीक घेतले. मात्र बाजार समितीत आवक वाढल्यामुळे भाव पडले. त्याचा फटका शेतकºयांना बसतो आहे. शेतकºयांना वाहतुकीचा खर्च परवडत नसल्यामुळे त्यांचा साठवणुकीवर जास्त भर आहे. मात्र पावसाळ्यापर्यंत भाव न वाढल्यास शेतकºयांना आणखी कमी भावात कांदे विकावे लागतील असा तर्क आलू-कांदे अडतिया असोसिएशनने मांडला आहे. त्यामुळे कांदे साठवायचे की विकायचे या कोंडीत शेतकरी सापडला आहे. महाराष्ट्रातून गुजरातमध्ये दरवर्षी दररोज २५ ते ३० ट्रक विक्रीसाठी कांदे जायचे. पण यंदा गुजरातमध्येच कांद्याचे विक्रमी उत्पादन झाल्यामुळे तेथील व्यापाºयांनी कांद्याची खरेदी करणे बंद केले आहे. त्यामुळे महाराष्ट्रात अतिरिक्त साठा झाला आहे. इकडे शेतमालाला मिळणाºया बेभावामुळे शेतकºयांनी १ जून पासून संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवारी सेवाग्राम येथे राष्ट्रीय किसान महासंघाची बैठक झाली. तीत गतवर्षी महाराष्ट्रात झालेल्या शेतकरी संपाला आता देशव्यापी स्वरूप देण्याचा संकल्प करण्यात आला. १ ते १० जून या काळात देशातील १२८ प्रमुख शहरात भाजीपाला, अन्नधान्य, दूध व इतर शेतमालाचा पुरवठा बंद करण्यात येणार आहे. यावेळी देशातील ११० शेतकरी संघटनांनंी एकत्र येत संपाची हाक दिली आहे. त्यामुळेच आधीच महागाईने कंबरडे मोडलेल्या सामान्य नागरिकांनाही शेतकरी संपाचाही फटका बसेल. खताचे अनुदान थेट शेतकºयांच्या खात्यात जमा करण्यात यावे, सरसकट सातबारा कोरा करण्यात यावा, सेंद्रीय शेतीसाठी सरकारने अनुदान जाहीर कारावे आणि दुधाला भाव मिळावा आदी प्रमुख मागण्यांसाठी शेतकरी संघटनांनी आंदोलनाचे अस्त्र उगारले आहे. शेतमालाला चार वर्षात रास्त भाव मिळवून देण्यात अपयशी ठरलेल्या सरकारला २०१९ मध्ये रडविण्याचा संकल्प शेतकºयांनी केला असला तरी सामान्य नागरिकावर मात्र जूनच्या १० दिवसात रडकुंडीस येण्याची पाळी येणार, हे निश्चित.

टॅग्स :onionकांदाagricultureशेतीFarmerशेतकरीMarketबाजार