शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

कांदा रडवतोय पण...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 00:13 IST

२०१६ मध्ये गृहिणींना रडविणारा कांदा यंदा उत्पादकांना रडवतोय. महाराष्ट्र आणि लगतच्या राज्यांमध्ये कांद्याचे विक्रमी उत्पादन झाल्यामुळे यंदा भाव मोठ्या प्रमाणात घसरले आहेत. आशिया खंडातील सर्वात मोठी कृषी उत्पन्न बाजार समिती असलेल्या कळमना यार्डमध्ये कांद्याचा भाव प्रति किलो पाच रुपये इतका खाली आला आहे.

२०१६ मध्ये गृहिणींना रडविणारा कांदा यंदा उत्पादकांना रडवतोय. महाराष्ट्र आणि लगतच्या राज्यांमध्ये कांद्याचे विक्रमी उत्पादन झाल्यामुळे यंदा भाव मोठ्या प्रमाणात घसरले आहेत. आशिया खंडातील सर्वात मोठी कृषी उत्पन्न बाजार समिती असलेल्या कळमना यार्डमध्ये कांद्याचा भाव प्रति किलो पाच रुपये इतका खाली आला आहे. शेतकऱ्यांना कांद्याचे उत्पादन घेण्यासाठी जितका खर्च आला त्यापेक्षा जास्त खर्च कांदा बाजारपेठेत पोहोचविण्यासाठी येत असल्याने गावागावांत आणि शहरातील चौकाचौकात कांद्याची बेभाव विक्री होत आहे. ४० किलोचा कट्टा २०० रुपयापर्यंत विकला जात असल्याने शेतकºयांच्या डोळ्यात कांद्याने अश्रू आणले आहेत. गतवर्षी कांद्याला जास्त भाव मिळाल्यामुळे शेतकºयांनी मोठ्या प्रमाणात लागवड केली होती. विदर्भासह मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातही शेतकºयांनी कांद्याचे पीक घेतले. मात्र बाजार समितीत आवक वाढल्यामुळे भाव पडले. त्याचा फटका शेतकºयांना बसतो आहे. शेतकºयांना वाहतुकीचा खर्च परवडत नसल्यामुळे त्यांचा साठवणुकीवर जास्त भर आहे. मात्र पावसाळ्यापर्यंत भाव न वाढल्यास शेतकºयांना आणखी कमी भावात कांदे विकावे लागतील असा तर्क आलू-कांदे अडतिया असोसिएशनने मांडला आहे. त्यामुळे कांदे साठवायचे की विकायचे या कोंडीत शेतकरी सापडला आहे. महाराष्ट्रातून गुजरातमध्ये दरवर्षी दररोज २५ ते ३० ट्रक विक्रीसाठी कांदे जायचे. पण यंदा गुजरातमध्येच कांद्याचे विक्रमी उत्पादन झाल्यामुळे तेथील व्यापाºयांनी कांद्याची खरेदी करणे बंद केले आहे. त्यामुळे महाराष्ट्रात अतिरिक्त साठा झाला आहे. इकडे शेतमालाला मिळणाºया बेभावामुळे शेतकºयांनी १ जून पासून संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवारी सेवाग्राम येथे राष्ट्रीय किसान महासंघाची बैठक झाली. तीत गतवर्षी महाराष्ट्रात झालेल्या शेतकरी संपाला आता देशव्यापी स्वरूप देण्याचा संकल्प करण्यात आला. १ ते १० जून या काळात देशातील १२८ प्रमुख शहरात भाजीपाला, अन्नधान्य, दूध व इतर शेतमालाचा पुरवठा बंद करण्यात येणार आहे. यावेळी देशातील ११० शेतकरी संघटनांनंी एकत्र येत संपाची हाक दिली आहे. त्यामुळेच आधीच महागाईने कंबरडे मोडलेल्या सामान्य नागरिकांनाही शेतकरी संपाचाही फटका बसेल. खताचे अनुदान थेट शेतकºयांच्या खात्यात जमा करण्यात यावे, सरसकट सातबारा कोरा करण्यात यावा, सेंद्रीय शेतीसाठी सरकारने अनुदान जाहीर कारावे आणि दुधाला भाव मिळावा आदी प्रमुख मागण्यांसाठी शेतकरी संघटनांनी आंदोलनाचे अस्त्र उगारले आहे. शेतमालाला चार वर्षात रास्त भाव मिळवून देण्यात अपयशी ठरलेल्या सरकारला २०१९ मध्ये रडविण्याचा संकल्प शेतकºयांनी केला असला तरी सामान्य नागरिकावर मात्र जूनच्या १० दिवसात रडकुंडीस येण्याची पाळी येणार, हे निश्चित.

टॅग्स :onionकांदाagricultureशेतीFarmerशेतकरीMarketबाजार