शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
2
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
3
Ahmedabad Plane Crash: विमानात कोणती सीट सर्वात सुरक्षित? विमानाने प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
4
Air India Plane Crash: ५ महिन्यापूर्वी लग्न, पहिल्यांदाच पतीला भेटायला लंडनला चालली होती पण काळाने घात केला
5
विमानातील कुणीही बचावलं असण्याची शक्यता नाही; सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती! पोलीस आयुक्त म्हणाले...
6
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
7
Air India Plane Crash: वडिलांचा व्यवसाय सांभाळण्यासाठी केले होते MBA; विमान अपघातात भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
8
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
9
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
10
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
11
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
12
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
13
Ahmedabad Plane Crash Live Updates: विमान अपघातातील १०० जणांचे मृतदेह मिळाले, २५ जखमींवर उपचार सुरू
14
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
15
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
16
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
17
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
18
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
19
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
20
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो

आता प्राजक्ता माळींचा एपिसोड संपवावा आणि संतोष देशमुख यांना न्याय मिळेल हे पाहावे; झाले हे फार झाले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2024 09:15 IST

कलावंतांनीही बदलत्या राजकीय गणितांची माहिती ठेवलेली बरी! योग्य तो मोबदला घेऊन करमणुकीच्या कार्यक्रमात सहभागी हाेणे यात काही गैर नाही. पण जरा सावध असावे. राजकारण्यांच्या व्यासपीठावर जाताना त्यांच्या राजकारणाशी आपला संबंध नाही, असे म्हणून हात झटकण्याचा पर्याय दरवेळी वापरता येईलच असे नाही...!

बीड जिल्ह्यातील मस्साजाेग गावच्या सरपंचांच्या खुनाचे प्रकरण साधे नाही. बीडसह मराठवाड्यातील राजकारणाला गेल्या तीन-चार दशकांत जे वळण लागत गेले, त्याचा हा परिपाक आहे. त्यात वाळलेले जळलेच तसे ओलेही जळून जाऊ लागले आहे. त्याची धग प्राजक्ता माळी या अभिनेत्रीला लागल्याने चर्चा उसळली. प्राजक्ता माळी यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेने चर्चेचा विषय, रोख बदलला. प्रसिद्धीस आलेल्या (ती मनोरंजन क्षेत्रातील असेल, तर अधिकच) स्त्रीचा उत्कर्ष न सोसून तिचे नाव नको त्या तऱ्हेने नको तिथे जोडले जाण्याची पुरुषी समाजवृत्ती आपल्या हाडीमासी कशी भिनलेली आहे, हे यानिमित्ताने दिसले. त्यामागोमाग प्राजक्ता माळी यांच्या वाट्याला नवे ट्रोलिंग आले, तसेच त्यांच्या बाजूने खमकेपणाने भूमिका घेतलेली समंजस माणसेही समाजमाध्यमांवर व्यक्त झाली. मात्र, संतापाच्या कडेलोटाचे हे पाणी भलत्याच दिशेला वळल्याने (किंवा वळवले गेल्याने)  मूळ घटनेतील क्रौर्य पुसटले नाही का? त्यासाठीच्या रंगमंचाचा बोलविता धनी कोण, असे प्रश्नही विचारले गेले.

हे सारेच राज्यातील एकूणच सामाजिक आणि नैतिक संस्कृतीचे अध:पतन किती वेगाने रसातळाला निघाले आहे, याचे निदर्शनच म्हणायला हवे. प्राजक्ताने मृत संतोष देशमुखविरुद्ध ब्र ही उच्चारला नसला तरी मूळ घटना त्यांच्या खुनाची. मंत्री धनंजय मुंडे यांचा सहकारी कार्यकर्ता वाल्मीक कराड याच्यावर सारा राेख! मस्साजाेगचे हे खून प्रकरण आष्टीचे भाजपचे आमदार सुरेश धस यांनी विधानसभेत मांडले. हल्ली सरळ-साधे कुणाला काही पचत नाही. मोबाइलवरच्या रिल्समध्ये गुंतलेल्या नजरा हव्या तिकडे सहज वळवता येत नाहीत. म्हणून मग मुंडे यांच्यावर राजकीय सूड उगविण्यासाठी या धस महाशयांनी मूळ घटनेच्या आजूबाजूने मोठे नाट्य रचले. वाल्मीक कराड याने मंत्र्यांच्या लाेकप्रियतेसाठी चित्रपटसृष्टीतील कलाकारांना आणून तरुणांची मने कशी रिझवली याची माहिती देताना काही अभिनेत्रींची नावे घेतली. त्यांचे इव्हेंट, त्यासाठीचा पैसा याबाबत संशय उपस्थित केले. प्राजक्ता माळी यांचेही नाव अशिष्ट संदर्भासह या यादीत होते.

हे असेच बॉम्ब फोडून चर्चेत राहण्याची कला साधलेल्या करुणा यांनी यापूर्वी तितकीच अशिष्ट विधाने केली होती. त्यावेळी गप्प राहिलेल्या प्राजक्ता माळी यांचा बांध यावेळी मात्र फुटला, कारण एरवी चर्चेत राहण्यासाठी या कलावंतांना वापरावे लागते ते सोशल मीडियावरच्या व्हिडीओजचे शस्त्र यावेळी दुर्दैवाने त्यांच्यावर उलटले. प्रसिद्धी पावलेल्या स्त्रीला नामोहरम करायचे तर तिचे नाव कुणा धनवान सत्ताधीशाशी जोडणे हा सोपा मार्ग; पण त्याविरोधात जाहीर भूमिका घेण्याचे धैर्य या तरुण अभिनेत्रीने दाखवले. तिने ज्या नेमक्या शब्दांत राज्यातल्या राजकारण-समाजकारणाला लागलेल्या अश्लाघ्य सवयींची चिरफाड केली आणि त्यासोबत क्लिक्स/पेज व्ह्यूजना चटावलेल्या छचोर नव-माध्यमांना आरसा दाखवला, ते निश्चितच अभिनंदनीय! तिच्या या संतापाची तातडीने दखल घेऊन खुद्द मुख्यमंत्री तिला भेटतात, ही ती ज्या क्षेत्रात आहे त्या क्षेत्राचीच पुण्याई म्हणायची! एरवी अशा ट्रोलिंगमुळे आयुष्यातून उठलेल्या स्त्रिया सोडाच; पण अख्ख्या देशाला हादरा देणाऱ्या जळत्या मणिपूरमध्ये सर्वस्व गमावलेल्या अभागी स्त्रियांच्याही वाट्याला सर्वोच्च सत्ताधाऱ्यांचे दुर्लक्षच कसे येते हे अजून तरी विस्मरणात गेलेले नाही. तेव्हा ‘निवडक न्याय’ का असेना, प्राजक्ता माळींना तो मिळाला, हे त्यांचे मोठेच नशीब म्हणायचे! तसे नशीब संतोष यांच्या वाट्याला येते का, हे कळेलच! पण कलावंतांनी काही जाहीर भूमिका घेतली की सत्तासने हलतात, हे यानिमित्ताने सिद्ध झाले आहेच; तर कलावंतांनी आपला शब्द प्रसंगोपात इतरही दुर्दैवी घटना/घटकांसाठी टाकावा अशी अपेक्षा चुकीची कशी?

आणखी एक. कलावंतांनीही बदलत्या राजकीय गणितांची माहिती ठेवलेली बरी! योग्य तो मोबदला घेऊन करमणुकीच्या कार्यक्रमात सहभागी हाेणे यात काही गैर नाही. पण जरा सावध असावे. राजकारण्यांच्या व्यासपीठावर जाताना त्यांच्या राजकारणाशी आपला संबंध नाही, असे म्हणून हात झटकण्याचा पर्याय दरवेळी वापरता येईलच असे नाही! मूळ प्रश्न सार्वजनिक जीवनातील सभ्यता उधळून लावण्याची अहमहमिका हा आहे. सगळी स्वच्छता करायला निघालेल्या मुख्यमंत्र्यांनी निदान स्व-पक्षातल्या नेत्यांच्या तोंडाला आवर घालावा. सुरेश धस यांनी (अखेर) दिलगिरी व्यक्त केल्याने प्राजक्ता माळींचा एपिसोड संपवावा आणि संतोष देशमुख यांना न्याय मिळेल हे पाहावे. झाले हे फार झाले! 

टॅग्स :Prajakta Maliप्राजक्ता माळीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस