शहरं
Join us  
Trending Stories
1
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
2
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
3
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
4
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
5
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
6
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
7
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
8
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
9
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
10
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
11
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
12
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
13
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
14
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
15
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
16
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
17
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
18
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
19
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
20
WTC Final : मिचेल स्टार्कनं अर्धशतकासह रचला इतिहास; हेजलवूडच्या साथीनं ५० वर्षांचा विक्रमही मोडला

नको शाळा, नको पाटी : होम स्कूलिंगची पहाट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2018 06:10 IST

मुक्त विद्यालय ही संकल्पना सध्या भारताच्या शिक्षणक्षेत्रात रुंजी घालत आहे. गेली काही वर्षे यावर चर्चा सुरू आहे. दोनएक वर्षांपूर्वी महाराष्ट्राचे शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केंद्रीय मुक्त विद्यालयाच्या धर्तीवर राज्य मुक्त विद्यालय मंडळ सुरू करण्याची घोषणा केली होती.

- हर्षद माने (शैक्षणिक प्रश्नांचे अभ्यासक)मुक्त विद्यालय ही संकल्पना सध्या भारताच्या शिक्षणक्षेत्रात रुंजी घालत आहे. गेली काही वर्षे यावर चर्चा सुरू आहे. दोनएक वर्षांपूर्वी महाराष्ट्राचे शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केंद्रीय मुक्त विद्यालयाच्या धर्तीवर राज्य मुक्त विद्यालय मंडळ सुरू करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर पुन्हा याविषयी थोडी विचारणा होऊ लागली. मूल तीन वर्षांचे झाले की त्याला शाळेत टाकायचे आणि बालवर्ग ते दहावी असे शालेय शिक्षण पूर्ण करायचे असे ‘शालेय’ संस्कार आपल्यावर इतके रुळले आहेत, की वर्षानुवर्षे आपल्या कित्येक पिढ्यांच्या जगण्याचा ते अविभाज्य भाग झाले आहेत. कुणी शाळेत जायची गरज नाही असे सांगितले तर आपण हसू! शाळेला सुट्टी फक्त आपल्याला ‘सांग सांग भोलानाथ’च्या गाण्यात आणि खरेच शाळेभोवती पाणी साचल्यावर मिळाली आहे.वरवर पाहता, मुक्त शिक्षण केवळ शाळाबाह्य विद्यार्थ्यांसाठी आहे असे तुम्हाला वाटेल. पण कित्येक पालक आपल्या मुलांना शाळेतून काढून मुक्त शालेय शिक्षणाची वाट चोखाळत आहेत. असे का होत आहे? कारण सध्याचे शालेय शिक्षण मुलांच्या नैसर्गिक वाढीस पोषक नाही, आपल्या मुलाच्या विकासात त्याचा उपयोग होत नाही असे त्यांना वाटते. कुणी भारतातल्या आंतरराष्ट्रीय बोर्डाच्या शाळेत लहान मुलांसोबत घडलेल्या खून आणि बलात्काराच्या घटनांनी धास्तावले आहेत. आणि आपल्या मुलाला असे बंदिस्त वातावरणात न शिकवता, आपल्या नजरेखाली आपण अधिक चांगले शिकवू शकतो, असा विश्वास या पालकांना वाटतो.तुमच्या मुलाला आता याचा कसा फायदा होऊ शकेल? पहिली आणि महत्त्वाची गोष्ट शिक्षणाची भाषा. विद्यार्थ्याला मातृभाषेतच शालेय शिक्षण मिळाले पाहिजे, याचे शास्त्रशुद्ध विवेचन अनेक तज्ज्ञांनी दिले आहे. मुक्त शिक्षणामध्ये तोपर्यंत हे मराठी माध्यम-इंग्रजी माध्यम हा भेद राहणार नाही. भाषेचे बंधन त्याला आड येत नाही. पालकांनी मुक्त शिक्षण घेत असताना योग्य मदत घेतली तर मूल मराठी, हिंदी, इंग्रजीच काय पण भारतीय भाषा आणि परदेशी भाषांतही निपुण होऊ शकते.तुम्ही तुमचा जरी विचार केलात तर तुम्हाला कळेल, अनेक गोष्टी आपण अनौपचारिकरीत्याच शिकलो आहोत आणि औपचारिकरीत्या शिकलो त्याचा व्यावहारिक जीवनात उपयोग होतोच असे नाही. मग मूल शिकेल कसे? गणित, विज्ञान ते त्याच्या रोजच्या व्यवहारात शिकू शकेल. भाषेसाठी कित्येक पर्याय आहेत, अगदी परदेशी भाषांसाठीसुद्धा. महाराजांचा इतिहास राजगडावर शिकेल, वाळिंबेंची कादंबरी वाचून भारताचा स्वातंत्र्य इतिहास शिकेल, नेहरू तारांगणात जाऊन खगोलशास्त्र शिकेल, वाचनालयात जाईल, विज्ञान केंद्रात जाईल. अगदी गावात जाऊन शेतीही शिकेल. ज्याला आपण ‘लाइफ स्किल्स’ म्हणतो तेही शिकेल. ‘सॉफ्ट स्किल्स’ शिकेल आणि ‘व्यवसाय स्किल्स’सुद्धा. बरे! पारंपरिक शिक्षणातील सगळे ज्ञान तो घेऊ शकेल तेही, कुठल्याही विशिष्ट बोर्डाच्या पुस्तकांचे बंधन न पाळता आणि हे करताना तो त्याला आवडणारी कला शिकेल किंवा क्रीडा प्रावीण्य मिळवेल.तुमचा मुलगा-मुलगी शालेय जीवनाचे जोखड दूर केल्यास अधिक सुखाने आनंदाने आणि स्वातंत्र्याने जगू शकेल. शाळेत घातले नाही म्हणून तो आळशी होणार नाही, आणि शाळेत जातो म्हणजे त्याचे मडके योग्य घडते आहे असेही नाही. संकल्पना थोडी पचण्यास अवघड आहे खरे, पण तुमच्या मुलाच्या विकासाला शिस्तबद्ध आकार देण्याची प्रचंड ताकद या संकल्पनेत आहे, तेही तुमच्या नजरेसमोर, आणि त्याची कोणतीही फरपट न करता. त्याचे ‘बाल्य’ हरवू न देता!

टॅग्स :Educationशिक्षणSchoolशाळा